शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

रक्त सांडवू; पण जमिनी देणार नाही!

By admin | Updated: July 30, 2016 00:02 IST

पोटच्या गोळ्याप्रमाणे सांभाळलेली वडिलोपार्जित शेतजमीन मुंबई-नागपूर या सुपर एक्सप्रेस हायवेसाठी अल्प मोबदल्यात अधिग्रहित करण्याचा सपाटा शासनाने सुरू केला आहे.

वीरेंद्र जगताप आक्रमक : महामार्ग जमीन अधिग्रहण मुद्दा सभागृहात गाजला अमरावती : पोटच्या गोळ्याप्रमाणे सांभाळलेली वडिलोपार्जित शेतजमीन मुंबई-नागपूर या सुपर एक्सप्रेस हायवेसाठी अल्प मोबदल्यात अधिग्रहित करण्याचा सपाटा शासनाने सुरू केला आहे. मात्र, प्रत्यक्षात या जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना सरणावर गेल्यानंतर मिळणार काय, असा संतप्त सवाल धामणगाव विधानसभा मतदारसंघाचे अभ्यासू आमदार वीरेंद्र जगताप यांनी विधानसभेत आक्रमकपणे मांडला.त्यामुळे प्रसंगी रक्त सांडवू पण अल्प मोबदल्यात जमिनी देणार नाही़, असा निर्वाणीचा इशारा यावेळी आ. जगताप यांनी दिला. महराष्ट्र समृद्धी कॉरीडोर प्रकल्प म्हणजे मुंबई-नागपूर हा ७१० किलोमीटर लांबीचा सुपर एक्सप्रेस हायवे धामणगाव तालुक्यातील १५, चांदूररेल्वे तालुक्यातील ९ आणि नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील १९ गावांमधून जाणार आहे. यासंदर्भात शुक्रवारी आ़वीरेंद्र जगताप यांनी विधानसभेत नियम २९३ अन्वये लक्ष्यवेधी मांडली. ते म्हणाले, प्रकल्पाकरिता जमीन देण्यास शेतकऱ्यांचा विरोध नाही़ मात्र, जिरायती क्षेत्र ५० हजार व बागायती क्षेत्र १ लाख असा मोबदला शासन शेतकऱ्यांना देणार आहे, हा मोबदला अत्यल्प आहे़ संबंधित प्रकल्पाचा शेतकऱ्यांनी धसका घेतला आहे़ शेतजमीन गेली तर कुटुंबाचे काय होणार, या विवंचतनेत शेतकरी आहेत़ धामणगाव तालुक्यातील भिल्ली येथील ज्ञानेश्वर काळमेघ यांच्या १० एकर शेतातून हा हायवे जाणार असल्याचे ऐकूनच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यात त्यांचा मृत्यू झाला़ याची जबाबदारी सरकारने स्वीकारणे गरजेचे असल्याचे आ़जगताप म्हणाले. (प्रतिनिधी)शासनाने शेतकऱ्यांना बळ द्यावे शासनाने शेतकऱ्यांचे बळी न घेता त्यांना बळ द्यावे. मात्र, शेतकऱ्यांचे कोणत्याच स्तरावर समाधन न करताच जमिनी बळकाविण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे़ आता शेतकऱ्यांचे मुडदे पाडूनच त्यांच्या जमिनी शासनाला मिळू शकतील. मग, रक्त सांडले तरी चालेल, असा शेतकऱ्यांचा निर्धार आहे़ एकीकडे धरणात गेलेल्या पाच गावांचे पुनर्वसन करण्यासाठी २०-२० वर्षे लागतात, तर नवीन घरे निर्माण व्हायला किती वर्षे लागतील, असा सवालही आ. जगताप यांनी सभागृहात उपस्थित केला. -हा तर मुख्यमंत्र्यांचा डाव ३० हजार कोटींची रक्कम खर्चून सन २०१९ पर्यंत हा महामार्ग पूर्ण करण्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस स्वत: मागे राहून शिवसेनेच्या मंत्र्यांकडून कामे करून घेत आहेत. हा मुख्यमंत्र्याचाच डाव आहे़ ज्या शेतकऱ्यांची जमीन या प्रकल्पांत जाणार आहे ते शेतकरी सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहेत. या महामार्गामुळे पुढे सत्तारूढ होणाऱ्या सरकारसमोर कर्जाचा डोंगर उभा राहणार आहे़ त्यामुळे वरूड मतदारसंघातून हा सुपर एक्सप्रेस हायवे न्यावा, अशी मागणी आ़वीरेंद्र जगताप यांनी विधानसभेत केली़ शेतकऱ्यांनी पोटच्या गोळ्याप्रमाणे जपलेली जमीन हिसकावण्याचा शासनाचा प्रयत्न हाणून पाडू, असेही ते यावेळी म्हणाले.सन २०१३ च्या भूसंपादन कायद्याप्रमाणे शासनाने बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा पाचपट भाव व दहा वर्षे जगण्यासाठी पुरेल इतकी रक्कम द्यावी. तसेच नवीन शहरामध्ये विकसित भूखंड द्यावा. विशेषत: या प्रकल्पात शेतकऱ्यांची भागिदारी कायम ठेवून जिरायती क्षेत्रांना प्रती हेक्टर १ लाख रूपये तर बागायती क्षेत्रांना प्रती हेक्टर २ लाख रूपये तसेच सर्व जमिनीचा एकरकमी मोबदला प्रथम शासनाने द्यावा त्यानंतरच शेतकऱ्यांची जमीन घ्यावी.- वीरेंद्र जगताप,आमदार, धामणगाव विधानसभा मतदारसंघ