शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

जाती-धर्मापल्याड जाऊन ‘तिने’ निभावला शेजारधर्म !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 00:02 IST

जाती-धर्मासाठी एकमेकांचे प्राण घेण्यासाठी, रक्तपातासाठी एका पायावर तयार असलेला एक समूह ....

२० वर्षांचा सहवास : वहिदाच्या सुश्रुषेत विमलाने सोडले प्राण वैभव बाबरेकर । लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जाती-धर्मासाठी एकमेकांचे प्राण घेण्यासाठी, रक्तपातासाठी एका पायावर तयार असलेला एक समूह आणि नेत्रहीन हिंदू दाम्पत्याचा केवळ शेजारधर्म, माणुसकी म्हणून अनेक वर्षे सांभाळ करणारी वहिदा बानो. एकाच समाजात आढळणारी ही दोेन टोेके. पण, जेथे धर्मवेड्यांचा उत्पात चालतो, त्याच समाजात जाती-धर्माच्या भावनेचा कुठलाही स्पर्श न होऊ देता एकमेकांना जिवापाड जपणाऱ्या ‘वहिदा-विमला’देखील सापडतात. एखादी वहिदा एखाद्या अंध विमलाचा मरेपर्यंत सांभाळ करते आणि पुन्हा एकदा निकोप समाज निर्मितीच्या आशा पल्लवीत होतात. ‘ते’ दाम्पत्य नेत्रहीन. फ्रेजरपुरा पोेलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या राहुलनगरात मागील २० वर्षांपासून त्यांचे वास्तव्य आहे. विमलाबाई व मुरारी अवचरकर असे या दाम्पत्याचे नाव. घरात अठराविश्वे दारिद्रय. दृष्टीहीन असल्याने उत्पन्नाचे साधनही नाही. लोकांनीच सामूहिक वर्गणी करून बांधून दिलेल्या झोपडीवजा घरात त्यांचे वास्तव्य. या दाम्पत्याला एक मुलगी. तीदेखील विवाहित. सध्या तिचे वास्तव्य गुजरातेत आहे. त्यामुळे अंध विमलाबाई व मुरारी यांच्या देखभालीचा प्रश्न निर्माण झाला. पण, शेजारीच राहणारी मुस्लिम महिला वहिदा बानो पुढे आली. जाती-धर्माच्या पल्याड जाऊन तिने या दाम्पत्याची काळजी घेणे सुरू केले. विमलाबाई आणि मुरारी यांना जेवणाचा डबा पोहोचविणे, त्यांची इतर देखभालही तीच करीत असे. कित्येक वर्षे हा क्रम चालला. पण, काळच तो. कुणासाठी थांबणार कसा? दोन वर्षांपूर्वी आजाराने ग्रासलेल्या मुरारी अवचरकर यांचे निधन झाले आणि विमलाबाई एकट्या पडल्या. पण, वहिदा बानो यांनी त्यांची साथ सोडली नाही. त्या अधिक आपुलकीने विमलाबार्इंची काळजी घेऊ लागल्या. जाती-धर्म विलग असले तरी त्यांची सलगी सख्ख्या बहिणींसारखीच होती. वहिदा बानो यांनी त्यांचा हा भगिनीधर्म अखेरपर्यंत निभावला. अखेर त्यांच्याच सुश्रुशेत आणि त्यांच्याच आश्रयाने विमलाबार्इंनी काल रविवारी अखेरचा श्वास घेतला. रविवारी दुपारी आजारी असलेल्या विमलाबाई घरात बेशुद्ध पडल्या. ही बाब लक्षात येताच वहिदा बानो यांनी त्यांना तत्काळ जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या अंत्यसंस्काराला त्यांची गुजरातेतील कन्या पोहोचू शकली नाही. अखेर शेजाऱ्यांनीच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केलेत. धर्मांधांनी घ्यावा आदर्श जाती-धर्माच्या नावावर तेढ निर्माण करून स्वत:ची पोळी भाजणाऱ्या धर्मांधांनी या घटनेचा आदर्श घेण्याची आज नितांत गरज आहे. तळागाळातील, आर्थिक विपन्नावस्थेत जीवन जगणाऱ्यांना जाती-धर्माच्या या भिंतींशी काही देणेघेणे नाही. असे नसते तर अशा ‘वहिदा-विमला’ पाहायला मिळाल्या नसत्या.