शहरं
Join us  
Trending Stories
1
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
2
आता कोणत्या देशावर हल्ला करणार अमेरिका?; ८०० सैन्य अधिकाऱ्यांची अचानक बैठक, चर्चांना उधाण
3
Kolhapur: अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरी-video
4
Petal Gahlot : अभिमानास्पद! भारताच्या लेकीकडून 'ड्रामेबाज' पाकिस्तानी पंतप्रधानांची पोलखोल; कोण आहेत पेटल गहलोत?
5
Indusind बँकेत १० वर्षांपासून सुरू होता अकाऊंटिंगच्या अनियमिततेचा खेळ; माजी CFO चा गौप्यस्फोट
6
एक ओव्हर आणि मग गायब, फायनलपूर्वी हार्दिक पांड्याला झालं काय? टीम इंडियाचं टेन्शन वाढलं
7
Corona Virus : बापरे! कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनने पुन्हा वाढवलं जगाचं टेन्शन; 'ही' लक्षणं दिसताच सावधान
8
अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं?
9
नवरात्री २०२५: कोकणस्थांकडे अष्टमीला असते उकडीच्या मुखवट्याची महालक्ष्मी; काय आहे वैशिष्ट्य?
10
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांची 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
11
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
12
विना इनक्रिमेंट १ लाखांपेक्षा अधिक वाढली सॅलरी; रुपया आणि डॉलर्सचा काय आहे याच्याशी संबंध?
13
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
14
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
15
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
16
ऑक्टोबरमध्ये शुक्र-शनीची युती; काही राशींना वाट्याला 'राजयोग' तर काहींना 'कर्माचे भोग'
17
अभिषेक शर्मा-अभिषेक बच्चनच्या नावात शोएब अख्तरचा गोंधळ; अभिनेता स्पष्टच म्हणाला- "तुझा आदर करतो, पण..."
18
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
19
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."
20
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स

जाती-धर्मापल्याड जाऊन ‘तिने’ निभावला शेजारधर्म !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 00:02 IST

जाती-धर्मासाठी एकमेकांचे प्राण घेण्यासाठी, रक्तपातासाठी एका पायावर तयार असलेला एक समूह ....

२० वर्षांचा सहवास : वहिदाच्या सुश्रुषेत विमलाने सोडले प्राण वैभव बाबरेकर । लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जाती-धर्मासाठी एकमेकांचे प्राण घेण्यासाठी, रक्तपातासाठी एका पायावर तयार असलेला एक समूह आणि नेत्रहीन हिंदू दाम्पत्याचा केवळ शेजारधर्म, माणुसकी म्हणून अनेक वर्षे सांभाळ करणारी वहिदा बानो. एकाच समाजात आढळणारी ही दोेन टोेके. पण, जेथे धर्मवेड्यांचा उत्पात चालतो, त्याच समाजात जाती-धर्माच्या भावनेचा कुठलाही स्पर्श न होऊ देता एकमेकांना जिवापाड जपणाऱ्या ‘वहिदा-विमला’देखील सापडतात. एखादी वहिदा एखाद्या अंध विमलाचा मरेपर्यंत सांभाळ करते आणि पुन्हा एकदा निकोप समाज निर्मितीच्या आशा पल्लवीत होतात. ‘ते’ दाम्पत्य नेत्रहीन. फ्रेजरपुरा पोेलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या राहुलनगरात मागील २० वर्षांपासून त्यांचे वास्तव्य आहे. विमलाबाई व मुरारी अवचरकर असे या दाम्पत्याचे नाव. घरात अठराविश्वे दारिद्रय. दृष्टीहीन असल्याने उत्पन्नाचे साधनही नाही. लोकांनीच सामूहिक वर्गणी करून बांधून दिलेल्या झोपडीवजा घरात त्यांचे वास्तव्य. या दाम्पत्याला एक मुलगी. तीदेखील विवाहित. सध्या तिचे वास्तव्य गुजरातेत आहे. त्यामुळे अंध विमलाबाई व मुरारी यांच्या देखभालीचा प्रश्न निर्माण झाला. पण, शेजारीच राहणारी मुस्लिम महिला वहिदा बानो पुढे आली. जाती-धर्माच्या पल्याड जाऊन तिने या दाम्पत्याची काळजी घेणे सुरू केले. विमलाबाई आणि मुरारी यांना जेवणाचा डबा पोहोचविणे, त्यांची इतर देखभालही तीच करीत असे. कित्येक वर्षे हा क्रम चालला. पण, काळच तो. कुणासाठी थांबणार कसा? दोन वर्षांपूर्वी आजाराने ग्रासलेल्या मुरारी अवचरकर यांचे निधन झाले आणि विमलाबाई एकट्या पडल्या. पण, वहिदा बानो यांनी त्यांची साथ सोडली नाही. त्या अधिक आपुलकीने विमलाबार्इंची काळजी घेऊ लागल्या. जाती-धर्म विलग असले तरी त्यांची सलगी सख्ख्या बहिणींसारखीच होती. वहिदा बानो यांनी त्यांचा हा भगिनीधर्म अखेरपर्यंत निभावला. अखेर त्यांच्याच सुश्रुशेत आणि त्यांच्याच आश्रयाने विमलाबार्इंनी काल रविवारी अखेरचा श्वास घेतला. रविवारी दुपारी आजारी असलेल्या विमलाबाई घरात बेशुद्ध पडल्या. ही बाब लक्षात येताच वहिदा बानो यांनी त्यांना तत्काळ जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या अंत्यसंस्काराला त्यांची गुजरातेतील कन्या पोहोचू शकली नाही. अखेर शेजाऱ्यांनीच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केलेत. धर्मांधांनी घ्यावा आदर्श जाती-धर्माच्या नावावर तेढ निर्माण करून स्वत:ची पोळी भाजणाऱ्या धर्मांधांनी या घटनेचा आदर्श घेण्याची आज नितांत गरज आहे. तळागाळातील, आर्थिक विपन्नावस्थेत जीवन जगणाऱ्यांना जाती-धर्माच्या या भिंतींशी काही देणेघेणे नाही. असे नसते तर अशा ‘वहिदा-विमला’ पाहायला मिळाल्या नसत्या.