शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

शासन मदतनिधीत सामाईक सातबाऱ्याचा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:14 IST

(लोगो विशेष) अमरावती : नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीटसह एनडीआरएफच्या मदतीपासून जिल्ह्यातील किमान ५० हजारांवर शेतकरी वंचित आहेत. ...

(लोगो विशेष)

अमरावती : नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीटसह एनडीआरएफच्या मदतीपासून जिल्ह्यातील किमान ५० हजारांवर शेतकरी वंचित आहेत. हा निधी मिळण्याला संयुक्त सातबाराचा अडसर येत असल्याने शेतकऱ्यांनी खातेफोड करणे व महसूल विभागाने यासाठी अभियान राबविणे गरजेचे आहे.

जिल्ह्यात पाच वर्षांपासून सातत्याने दुष्काळ व नैसर्गिक आपत्तीचे संकट असल्याने शासनाच्यावतीने एनडीआरएफच्या निकषाने, तर कधी निकषापेक्षा जास्त मदतनिधी शासनाद्वारे उपलब्ध होत आहे. हा निधी मात्र संयुक्त सात-बारा असल्याने बाधित कुटुंबांना मिळू शकलेला नाही. बहुतेक कुटुंबे विभक्त झालेली आहेत. मात्र, वडिलोपार्जित शेतीच्या सातबाऱ्याची फोड झालेली नाही. त्यामुळे शासन मदतनिधी मिळाल्यास तो फक्त ज्याच्या नावाने सात-बारा आहे त्यालाच लाभ मिळाला. अन्य लाभार्थी शेतकरी मात्र वंचित राहिले आहेत.

बरेचदा सामाईक क्षेत्र असल्यामुळे मदतनिधी द्यायचा तरी कुणाला, असा प्रश्न शासन यंत्रणेसमोर निर्माण होतो. प्रसंगी वादही निर्माण होतात. यासाठी एका व्यक्तीच्या नावे संमतिपत्र आवश्यक आहे, असा तोडगा महसूल विभागाने काढला आहे. सर्वसंमतीने व शपथपत्राद्वारे एका व्यक्तीला अधिकार देऊन व त्या व्यक्तीच्या बँक खातेक्रमांक पटवाऱ्याला देऊन यावर मदत जमा करण्याचे प्रकार होत आहेत. अनेकदा संयुक्त बँक खाते असल्यानेही शासनमदत मिळू शकलेली नाही. अशावेळी महसूल विभागाला दोघांच्याही स्वाक्षरीने लिहून दिल्यानंतर एका जणाच्या खात्यात निधी जमा झालेला आहे.

बॉक्स

पोटहिस्साद्वारे सातबारा हा पर्याय

तहसीलदारांकडे पोटहिस्सासंदर्भात संबंधित सर्व व्यक्तींच्या स्वाक्षरीसह अर्ज केल्यानंतर सात-बारा विभक्त करता येतात. त्यानंतर पोटहिस्साधारकांच्या नावे सात-बाराची नोंद झाल्यानंतर त्या खातेदारांना शासनमदत मिळू शकते. याशिवाय राजस्व अभियानातदेखील सात-बाऱ्याची फोड करता येत असल्याची माहिती महसूल विभागाने दिली.

कोट

तहसीलदारांकडे पोटहिस्सासंदर्भात अर्ज करून सात-बारा फोड करता येते. हा एक सोपा व सहज पर्याय उपलब्ध आहे. याशिवाय वेळोवेळी असणाऱ्या राजस्व अभियानातही सातबाऱ्याची फोड करता येते.

रणजित भोसले

उपजिल्हाधिकारी(महसूल)

बॉक्स

सातबारा, शेतकरी, धारणक्षेत्राची तालुकास्थिती (हेक्टर)

तालुका खातेदार धारण क्षेत्र ५ एकराआतील ५ एकरावरील भूमिहीन

अमरावती ३९०७९ ५८९१२ ३२१४२ ३८९३ २२००५

भातकुली ३३४२४ ४८९२४ २१६३१ ८९१९ १५००७

नांदगाव ४११४७ ५८५८५ ३०६७१ ९७६९ १६३१५

चांदूर रेल्वे २३४६९ ४३२६९ ५१२४ १८०६७ ९१५३

धामणगाव २८९४५ ५४५९९ १८७४९ १०१९६ १०४३०

तिवसा २९२४१ ४१,४८६ २२५२१ ०० ७८६९

मोर्शी ४७००० ५६७२२ ३३३८४ ७४०५ १८०२१

वरूड ३९६३३ ५४३८५ १७३११ २२४२० ४३१७६

अचलपूर ३७०८७ ५३६७४ २९७२८ ११३९० १९८२५

चांदूर बाजार ५२०३२ ६१०४१ १३६१८ ३८४४४ १९३०६

दर्यापूर ५५०१९ ४१६९७ ३८१५४ १४४३४ ३०४४९

अंजनगाव ३४७९६ २६४६१ २३८६२ ७४६४ १७१८८

धारणी २०५२२ ४६२७२ १३५०९ ७०१३ ५५८१

चिखलदरा ११४१६ २७९४८ ६४८९ ५६८१ ४०७७

एकूण ४९२७१० ६५२९७७ ३०४२२४ १६३९०७ २३५४००

पाईंटर

एकूण खातेदार : ४,९२,७१०

शेतकऱ्यांचे धारणक्षेत्र :६,५२,२७७ हेक्टर

एका शेतकऱ्यामागे सरासरी धारणक्षेत्र :१.३२ हेक्टर

पाच एकरांतील शेतकरीसंख्या : ३,०४,२२४

पाच एकरावरील खातेदार : १,६३,९०६

जिल्ह्यातील भूमिहीन मजूर : २,३५,४००