शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

अंबा-एकवीरा देवी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 05:01 IST

पहाटेपासूनच भाविकांनी अंबा-एकवीरा देवीच्या दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती. श्री अंबादेवी संस्थानात रविवारी पहाटे ४ वाजता संस्थानचे कोषाध्यक्ष रवींद्र कर्वे त्यांच्या पत्नी शुभांगी कर्वे यांच्या हस्ते अंबा देवींची घटस्थापना करण्यात आली. यानंतर दोन तास विधीवत पूजा व आरती झाली. ध्वजारोहणाचा मान सचिव डॉ. अतुल आळशी त्यांच्या पत्नी अनुराधा आळशी यांना मिळाला.

ठळक मुद्देपहाटे ४ वाजता घटस्थापना : भाविकांची अलोट गर्दी, विधीवत पूजा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विदर्भाचे आराध्य दैवत अंबा-एकवीरा देवीच्या मंदिरात रविवारपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला. पहाटे ४ वाजता अंबादेवी मंदिरात व सकाळी ८.३० वाजता एकवीरा देवी मंदिरात विधीवत पूजेनंतर घटस्थापना झाली.पहाटेपासूनच भाविकांनी अंबा-एकवीरा देवीच्या दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती. श्री अंबादेवी संस्थानात रविवारी पहाटे ४ वाजता संस्थानचे कोषाध्यक्ष रवींद्र कर्वे त्यांच्या पत्नी शुभांगी कर्वे यांच्या हस्ते अंबा देवींची घटस्थापना करण्यात आली. यानंतर दोन तास विधीवत पूजा व आरती झाली. ध्वजारोहणाचा मान सचिव डॉ. अतुल आळशी त्यांच्या पत्नी अनुराधा आळशी यांना मिळाला. यावेळी अध्यक्ष विद्या देशपांडे यांच्यासह संस्थेच्या विश्वस्त उपस्थित होते, अशी माहिती विश्वस्त राजेंद्र पांडे यांनी दिली. श्री एकवीरा देवी संस्थानात एकवीरा देवीची घटस्थापना सकाळी ८.३० वाजता संस्थेचे विश्वस्त रवींद्र मराठे यांनी सपत्नीक केली. ध्वजारोहण पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर त्यांच्या पत्नी रंजना बाविस्कर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नवीन अन्नक्षेत्र इमारतीचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष रमेश गोडबोले यांच्या हस्ते झाले. तीन हजार भाविकांना रोज अन्नदान संस्थेतर्फे करण्यात येणार आहे, असे सचिव शैलेश वानखडे म्हणाले.झीरो गारबेजचा पहिला प्रकल्प एकवीरा संस्थानातमहापालिका आयुक्त संजय निपाणे यांचा घनकचऱ्यापासून खतनिर्मिती हा झीरो गारबेजचा पहिला प्रकल्प एकवीरा देवी मंदिरात रविवारपासून राबविण्यात येत आहे. यासाठी विश्वस्त अनिल खरैया व शैलेश वानखडे यांनी पुढाकार घेतला. फुले, कचरा खड्ड्यात टाकून त्यावर प्रक्रिया करून खतनिर्मिती होणार आहे.अंबादेवी मंदिरात अन्नदानयेथील कीर्तन हॉलमध्ये रोेज दीड ते दोन हजार भाविकांना अन्नदान करण्यात येणार आहे. रोज विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून येथे ८९ भजनी महिला मंडळांनी भजन करण्यासाठी नोंदणी केली आहे. श्री संत अच्युत महाराजांचे शिष्य हभप सचिन देव यांचे प्रवचन रविवारी सकाळी पार पडले. रोज या ठिकाणी २४ तास सेवा करण्यासाठी नऊ पुजारी नियुक्त करण्यात आले आहेत. मंदिर परिसरात ४० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा 'वॉच' राहणार आहे. तसेच लाडू, प्रसाद वाटप व इतर सेवेसाठी २० महिला सेवेत राहणार आहेत. दुपारी १२ वाजता भोग आरती व रात्री १०.३० वाजता आरती व पूजेचे नियोजन आयोजन समितीने केले आहे. ती आरती रात्री १२.३० वाजेपर्यंत चालणार असल्याची माहिती राजेंद्र पांडे यांनी दिली. मंदिराबाहेर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे.

टॅग्स :Navratriनवरात्री