शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

शहीद गोवारी चोविसावा स्मृतिदिन;  दोन तपानंतरही झोळी रिकामीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 11:43 IST

 उच्च न्यायालयाने चार महिन्यांपूर्वी गोवारी जमात ही आदिवासी असल्याचा ऐतिहासिक निर्णय दिला तरी त्याची अंमलबजावणी प्रशासनाने केली नाही.

ठळक मुद्देसरकार कधी उचलणार सकारात्मक पाऊल?

मोहन राऊत/

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: उच्च न्यायालयाने चार महिन्यांपूर्वी गोवारी जमात ही आदिवासी असल्याचा ऐतिहासिक निर्णय दिला तरी त्याची अंमलबजावणी प्रशासनाने केली नाही. चोविसाव्या शहीद गोवारी स्मृति दिनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या हक्काच्या सवलतींचा आराखडा राज्यातील ही गोवारी जमात शोधत आहे.२३ नोव्हेंबर १९९४ रोजी गोवारी जमातीला आर्थिक-सामाजिक आरक्षणाच्या मागणीसाठी नागपूर विधानभवनावर धडकलेल्या ११४ निष्पाप गोवारींचे बळी गेले. या घटनेला शुक्रवारी २४ वर्षे पूर्ण होत आहे. यानिमित्त विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने गोवारी बांधव नागपुरात येतात आणि अन्यायाचे स्मरण करून गोवारी स्मारकासमोर श्रद्धांजली वाहतात.दुरुस्ती अध्यादेशाची प्रतिक्षागोवारी जमात आदिवासी असून, गोंडगोवारी ही जमातच अस्तित्वात नाही, असा स्पष्ट निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने १४ आॅगस्ट रोजी दिली. राज्य शासनाने त्वरित दुरुस्ती करावी, असे म्हटले. यानंतर आदिवासी गोवारी समन्वय समितीने केंद्र व राज्यातील सत्ताधाऱ्यांशी चर्चा केली. मात्र, चार महिने लोटूनही राज्य शासनाने दुरुस्ती केली नाही. या दुरुस्ती अध्यादेशाची प्रतीक्षा विदर्भातील गोवारी समाज करीत आहे.

टाटाचे सर्वेक्षणनागपूर खंडपीठाचा निकाल येण्यापूर्वी राज्य शासनाने १० जूनला परिपत्रक काढून मुंबईच्या टाटा समाज विज्ञान संस्थेच्या दहा सदस्यीय समितीने गोवारींची परंपरा, संस्कृती या अंगाने गोंदिया ते बुलडाणापर्यंत सर्वेक्षण केले. या समितीचे उपसचिव आपला अहवाल याच महिन्यात सादर करणार आहेत.गरिबीत खितपत पडलेल्या समाजाला पाठबळाची आवश्यकता असताना, शासनाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी केलेली नाही. त्यासाठी १५ डिसेंबरपासून राज्यातील गोवारी समाज लोकशाही पद्धतीने अन्न व देहत्याग आंदोलन करणार आहे.- शालिक नेवारे, राज्य समन्वयक, आदिवासी गोवारी समन्वय समिती, नागपूर

टॅग्स :Governmentसरकार