शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

'सावली'साठी त्या वृद्धाची पायपीट !

By admin | Updated: March 7, 2016 00:04 IST

पायाचे दुखणे घेऊन जीवनाचा गाडा चालविणारा तो वृध्द सावलीच्या शोधात रस्ता ओलांडून दुभाजकावरील वृक्षाचा आसरा घेतो.

परिचर्या वसतिगृहासमोरील प्रकार : कुटुंबाने नाकारले, समाजाने झिडकारले, मग जायचे कुठे ?अमरावती : पायाचे दुखणे घेऊन जीवनाचा गाडा चालविणारा तो वृध्द सावलीच्या शोधात रस्ता ओलांडून दुभाजकावरील वृक्षाचा आसरा घेतो. सायंकाळी उतरते ऊन्ह अंगावर पडताच पुन्हा रस्ता ओलाडून फुटपाथवर जातो, अशी ही त्या वृद्धाची पायपीट दररोजच सुरू असते. इर्विन चौकातील परिचर्या वसतिगृहासमोर हा प्रकार ये-जा करणाऱ्यांना पहायला मिळत आहे. मात्र, आजपर्यंत त्या वृध्दाला आधार देण्याकरिता प्रशासन किंवा सामाजिक संघटना सरसावल्या नाहीत, ही शोकांतिका अमरावती शहरात पाहायला मिळत आहे. पाच वर्षांपासून इर्विन चौकातच भीक मागणारे राजाराम वसंत बोपशेट्टी (६०) हे बुधवारा परिसरात राहत होते. आई-वडिलांच्या छत्रछायेत जगत असताना राजाराम हे घराच्या आवारात पाय घसरून पडले. त्यांच्या कंबरेचे हाड मोडले, तेव्हापासून त्यांच्या जीवन संकटमय झाले. कंबरेचा हाड मोडले होते. मात्र, परिस्थिती गरीब असल्यामुळे त्यांनी इर्विनमध्ये उपचार सुरू केले. मात्र, कंबरेच्या दुखण्यातून त्यांना अखेर कायमचे अपंगत्व आले. त्यातच आई-वडील वारल्यानंतर दु:खांचे दिवस सुरू झाले. तुटक्या घरात राहणार तरी किती दिवस, असा विचार करून राजाराम यांनी पाच वर्षांपूर्वी भीक मागणे सुरू केले. त्यासाठी इर्विन चौक हा वर्दळीचे ठिकाण त्यांनी निवडले. इर्विन चौकातील अन्नकुटावर जीवनाचा प्रवास सुरू केला. जेवण मिळाले मात्र, छत नाही, छत नाही तर सावली कशी मिळणार, अशी स्थिती राजाराम यांच्यासमोर निर्माण झाली. मात्र, त्याचाही जालीम उपाय त्यांनी शोधला. सकाळी ऊन्ह पडल्यावर दुभाजकावरील वृक्षांची सावली रस्त्यावर पडते. त्यामुळे राजाराम हे पाय घासत हाताच्या साह्याने रस्ता ओलांडून दुभाजकाजवळ जातात, तेथील वृक्षांच्या सावलीत बसतात किंवा कधीकाळी झोपतातदेखील. मात्र, सायंकाळी मावळत्या सूर्याची किरणे अंगावर पडताच पुन्हा रस्ता पाय घासत हाताच्या बळावर पुन्हा रस्ता ओलांडून परिचर्या वसतिगृहासमोरील फुटपाथवर येतात. दरम्यान, त्यांचे जेवण आणून देण्यासाठी एक महिला वृध्द भिकारीसुध्दा सोबतीला असते. ती वृध्दा जालना येथील असल्याचे सांगत असून ती आपले नाव मीरा महाजन सांगते. राजाराम व मीरा हे दोघेही संगतीने जेवणसुध्दा करतात. (प्रतिनिधी) या निराधार वृद्धांची जबाबदारी कुणाची ?अमरावतीची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असताना निराधारांना आधार देणार कोणी नाही. प्रशासन विकास कामासाठी कोट्यवधी रुपये खर्च करतात, त्यातच सामाजिक दायित्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या संस्था विविध उपक्रमांद्वारे निराधारांचे पुनर्वसनसुध्दा करतात. मात्र, शहरात विविध ठिकाणी भीक मागणाऱ्या निराधार वृध्दाकडे कोणी का लक्ष पुरवित नाही, हा प्रश्न अनुत्तरितच राहतो.