शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

अप्पर वर्धा लगतची ७० गावे तहानलेलीच, शहरालाही दिवसआड पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 06:00 IST

जिल्ह्यात मोर्शी शहरालगत सिंभोरा स्थित अप्पर वर्धा धरणातून सुमारे ७५ हजार ८० हेक्टर क्षेत्रात सिंचननिर्मितीचा दावा केला जातो. १९९४ पासून या धरणातून शहराला पाणीपुरवठा सुरू आहे. आता २१ मार्चअखेर अप्पर वर्धा धरणात ५९.७५ टक्के जलसाठा असतानाही अमरावती शहराला एक दिवसाआड पाणी होत आहे.

ठळक मुद्देधरण उशाशी, कोरड घशाशी : ५९.७५ टक्के जलसाठा; गतवर्षीचा निर्णय कायम

जितेंद्र दखने ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : साडेआठ लाख लोकसंख्येच्या अमरावती शहरासह वरूड, मोर्शी तालुक्यांची तहान भागविणाऱ्या अप्पर वर्धा धरणालगतची ७० गावे मात्र अद्यापही पाण्यासाठी आसुसलेली आहेत.जिल्ह्यात मोर्शी शहरालगत सिंभोरा स्थित अप्पर वर्धा धरणातून सुमारे ७५ हजार ८० हेक्टर क्षेत्रात सिंचननिर्मितीचा दावा केला जातो. १९९४ पासून या धरणातून शहराला पाणीपुरवठा सुरू आहे. आता २१ मार्चअखेर अप्पर वर्धा धरणात ५९.७५ टक्के जलसाठा असतानाही अमरावती शहराला एक दिवसाआड पाणी होत आहे. मोर्शी शहराला दररोज पाणीपुरवठा होत असला तरी तालुक्यातील ७० गावे पाणीपुरवठा योजना वीज देयकाअभावी रखडली. ५५ किलोमीटर अंतरावरील अमरावती शहराला पाणीपुरवठा करणाºया पाइप लाइनशेजारी सुमारे १०८ गावे आहेत. त्यांना प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पेयजलाचे वितरण केले जाते. मात्र, त्यातील लोणी, जरूड व हिवरखेड पाणीपुरवठा योजनेला मर्यादा आहेत. त्यामुळे मोर्शी तालुक्यातील लेहगाव, काटपूर, सावरखेड, वाघोली, शिरखेड या व लगतच्या ६० गावांना अधिग्रहीत विहिरी व टँकरवर अवलंबून राहावे लागते.अमरावती शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी मोर्शी ते अमरावती अशी पाइप लाइन टाकण्यात आली आहे. त्यातून १० टक्के, तर ग्रामीण भागात पाच टक्के अशी पाणीगळती होत असल्याची माहिती, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कोपुलवार यांनी दिली.शासनाच्या दुर्लक्षामुळे काही वर्षांपासून ७० गाव पाणीपुरवठा योजना बंद आहे. त्यावर अवलंबून असलेल्या नागरिकांना उन्हाळ्यासोबतच आताही पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. स्वतंत्र व पर्यायी व्यवस्थेमधून तहान भागविली जाते. पाणीप्रश्न सुटणे महत्त्वाचे आहे.- शरद मोहोडजिल्हा परिषद सदस्यहिवरखेड या ११ गावे पाणीपुरवठा योजनेत जामगाव, बारगाव, खडकासह अन्य गावांचा समावेश होता. अनियमित पाणीपुरवठा व पाणीपट्टी परवडत नसल्याने हिवरखेड वगळता अन्य दहा गावे लाभ घेत नाहीत. पाक प्रकल्पातून या गावांनी पाण्याची स्वतंत्र व्यवस्था केली आहे.- श्रीधर सोलवमाजी झेडपी सदस्य१६ गावे पाणीपुरवठा योजना सध्या बंद आहे. यामुळे लोणी-जरूड या गावांची स्वतंत्र व पर्यायी व्यवस्थेतून तहान भागविली जाते. उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे कायमस्वरूपी पाण्याची सोई होणे गरजेचे आहे.- नितीन टेंभे, सरपंच, लोणी तथा अध्यक्ष, पाणीपुरवठा योजना

टॅग्स :Waterपाणी