शहरं
Join us  
Trending Stories
1
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
2
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?
3
IPL 2025 Qualifier 1 Race : आता MI चे कट्टर चाहतेही करतील CSK ला चीअर; कारण...
4
हे वागणं बरं नव्हं... खासदारांनी नाराजीचा सूर आळवत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरले धारेवर 
5
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट
6
टायपिंगमधून सुटका! तुम्ही जो विचार कराल तो दिसेल स्क्रीनवर; मनातील विचारांनी मोबाइलही चालवता येणार
7
तीन वर्षांच्या मुलाला अंधार असलेल्या खोलीत नेले अन्...; उल्हासनगरात डान्स टीचरचा अल्पवयीन मुलावर अत्याचार
8
अंबा एक्सप्रेसची ओव्हरहेड वायर तुटली! विदर्भ एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले
9
EPF News: 7 कोटींपेक्षा जास्त लोकांसाठी गुड न्यूज! केंद्र सरकारने पीएफवरील व्याजाची केली घोषणा
10
मोठी कारवाई! मराठवाड्यातील चार जिल्ह्यात ४ कोटी ४८ लाखांचा माल जप्त, ४६४ जणांना अटक
11
'...तर कमी लोक मेले असते', पहलगाममध्ये कुंकू पुसलं गेलेल्या महिलांबद्दल भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान
12
नाव ऐकून गुन्हेगारांना भरायची धडकी! नागपूरचे माजी पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांचे मुंबईत निधन
13
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
14
जिथं संधी मिळते तिथं तो 'बेस्ट'च देतो! टेस्टमधून डावललेल्या श्रेयस अय्यरनं पुन्हा दाखवली आपली ताकद
15
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
16
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
17
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
18
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
19
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
20
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा

अप्पर वर्धा लगतची ७० गावे तहानलेलीच, शहरालाही दिवसआड पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 06:00 IST

जिल्ह्यात मोर्शी शहरालगत सिंभोरा स्थित अप्पर वर्धा धरणातून सुमारे ७५ हजार ८० हेक्टर क्षेत्रात सिंचननिर्मितीचा दावा केला जातो. १९९४ पासून या धरणातून शहराला पाणीपुरवठा सुरू आहे. आता २१ मार्चअखेर अप्पर वर्धा धरणात ५९.७५ टक्के जलसाठा असतानाही अमरावती शहराला एक दिवसाआड पाणी होत आहे.

ठळक मुद्देधरण उशाशी, कोरड घशाशी : ५९.७५ टक्के जलसाठा; गतवर्षीचा निर्णय कायम

जितेंद्र दखने ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : साडेआठ लाख लोकसंख्येच्या अमरावती शहरासह वरूड, मोर्शी तालुक्यांची तहान भागविणाऱ्या अप्पर वर्धा धरणालगतची ७० गावे मात्र अद्यापही पाण्यासाठी आसुसलेली आहेत.जिल्ह्यात मोर्शी शहरालगत सिंभोरा स्थित अप्पर वर्धा धरणातून सुमारे ७५ हजार ८० हेक्टर क्षेत्रात सिंचननिर्मितीचा दावा केला जातो. १९९४ पासून या धरणातून शहराला पाणीपुरवठा सुरू आहे. आता २१ मार्चअखेर अप्पर वर्धा धरणात ५९.७५ टक्के जलसाठा असतानाही अमरावती शहराला एक दिवसाआड पाणी होत आहे. मोर्शी शहराला दररोज पाणीपुरवठा होत असला तरी तालुक्यातील ७० गावे पाणीपुरवठा योजना वीज देयकाअभावी रखडली. ५५ किलोमीटर अंतरावरील अमरावती शहराला पाणीपुरवठा करणाºया पाइप लाइनशेजारी सुमारे १०८ गावे आहेत. त्यांना प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पेयजलाचे वितरण केले जाते. मात्र, त्यातील लोणी, जरूड व हिवरखेड पाणीपुरवठा योजनेला मर्यादा आहेत. त्यामुळे मोर्शी तालुक्यातील लेहगाव, काटपूर, सावरखेड, वाघोली, शिरखेड या व लगतच्या ६० गावांना अधिग्रहीत विहिरी व टँकरवर अवलंबून राहावे लागते.अमरावती शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी मोर्शी ते अमरावती अशी पाइप लाइन टाकण्यात आली आहे. त्यातून १० टक्के, तर ग्रामीण भागात पाच टक्के अशी पाणीगळती होत असल्याची माहिती, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कोपुलवार यांनी दिली.शासनाच्या दुर्लक्षामुळे काही वर्षांपासून ७० गाव पाणीपुरवठा योजना बंद आहे. त्यावर अवलंबून असलेल्या नागरिकांना उन्हाळ्यासोबतच आताही पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. स्वतंत्र व पर्यायी व्यवस्थेमधून तहान भागविली जाते. पाणीप्रश्न सुटणे महत्त्वाचे आहे.- शरद मोहोडजिल्हा परिषद सदस्यहिवरखेड या ११ गावे पाणीपुरवठा योजनेत जामगाव, बारगाव, खडकासह अन्य गावांचा समावेश होता. अनियमित पाणीपुरवठा व पाणीपट्टी परवडत नसल्याने हिवरखेड वगळता अन्य दहा गावे लाभ घेत नाहीत. पाक प्रकल्पातून या गावांनी पाण्याची स्वतंत्र व्यवस्था केली आहे.- श्रीधर सोलवमाजी झेडपी सदस्य१६ गावे पाणीपुरवठा योजना सध्या बंद आहे. यामुळे लोणी-जरूड या गावांची स्वतंत्र व पर्यायी व्यवस्थेतून तहान भागविली जाते. उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे कायमस्वरूपी पाण्याची सोई होणे गरजेचे आहे.- नितीन टेंभे, सरपंच, लोणी तथा अध्यक्ष, पाणीपुरवठा योजना

टॅग्स :Waterपाणी