शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
5
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
6
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
7
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
8
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
9
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
10
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
11
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
12
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
13
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
14
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
15
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
16
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
17
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
18
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
19
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
20
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'

अप्पर वर्धा लगतची ७० गावे तहानलेलीच, शहरालाही दिवसआड पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 06:00 IST

जिल्ह्यात मोर्शी शहरालगत सिंभोरा स्थित अप्पर वर्धा धरणातून सुमारे ७५ हजार ८० हेक्टर क्षेत्रात सिंचननिर्मितीचा दावा केला जातो. १९९४ पासून या धरणातून शहराला पाणीपुरवठा सुरू आहे. आता २१ मार्चअखेर अप्पर वर्धा धरणात ५९.७५ टक्के जलसाठा असतानाही अमरावती शहराला एक दिवसाआड पाणी होत आहे.

ठळक मुद्देधरण उशाशी, कोरड घशाशी : ५९.७५ टक्के जलसाठा; गतवर्षीचा निर्णय कायम

जितेंद्र दखने ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : साडेआठ लाख लोकसंख्येच्या अमरावती शहरासह वरूड, मोर्शी तालुक्यांची तहान भागविणाऱ्या अप्पर वर्धा धरणालगतची ७० गावे मात्र अद्यापही पाण्यासाठी आसुसलेली आहेत.जिल्ह्यात मोर्शी शहरालगत सिंभोरा स्थित अप्पर वर्धा धरणातून सुमारे ७५ हजार ८० हेक्टर क्षेत्रात सिंचननिर्मितीचा दावा केला जातो. १९९४ पासून या धरणातून शहराला पाणीपुरवठा सुरू आहे. आता २१ मार्चअखेर अप्पर वर्धा धरणात ५९.७५ टक्के जलसाठा असतानाही अमरावती शहराला एक दिवसाआड पाणी होत आहे. मोर्शी शहराला दररोज पाणीपुरवठा होत असला तरी तालुक्यातील ७० गावे पाणीपुरवठा योजना वीज देयकाअभावी रखडली. ५५ किलोमीटर अंतरावरील अमरावती शहराला पाणीपुरवठा करणाºया पाइप लाइनशेजारी सुमारे १०८ गावे आहेत. त्यांना प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पेयजलाचे वितरण केले जाते. मात्र, त्यातील लोणी, जरूड व हिवरखेड पाणीपुरवठा योजनेला मर्यादा आहेत. त्यामुळे मोर्शी तालुक्यातील लेहगाव, काटपूर, सावरखेड, वाघोली, शिरखेड या व लगतच्या ६० गावांना अधिग्रहीत विहिरी व टँकरवर अवलंबून राहावे लागते.अमरावती शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी मोर्शी ते अमरावती अशी पाइप लाइन टाकण्यात आली आहे. त्यातून १० टक्के, तर ग्रामीण भागात पाच टक्के अशी पाणीगळती होत असल्याची माहिती, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कोपुलवार यांनी दिली.शासनाच्या दुर्लक्षामुळे काही वर्षांपासून ७० गाव पाणीपुरवठा योजना बंद आहे. त्यावर अवलंबून असलेल्या नागरिकांना उन्हाळ्यासोबतच आताही पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. स्वतंत्र व पर्यायी व्यवस्थेमधून तहान भागविली जाते. पाणीप्रश्न सुटणे महत्त्वाचे आहे.- शरद मोहोडजिल्हा परिषद सदस्यहिवरखेड या ११ गावे पाणीपुरवठा योजनेत जामगाव, बारगाव, खडकासह अन्य गावांचा समावेश होता. अनियमित पाणीपुरवठा व पाणीपट्टी परवडत नसल्याने हिवरखेड वगळता अन्य दहा गावे लाभ घेत नाहीत. पाक प्रकल्पातून या गावांनी पाण्याची स्वतंत्र व्यवस्था केली आहे.- श्रीधर सोलवमाजी झेडपी सदस्य१६ गावे पाणीपुरवठा योजना सध्या बंद आहे. यामुळे लोणी-जरूड या गावांची स्वतंत्र व पर्यायी व्यवस्थेतून तहान भागविली जाते. उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे कायमस्वरूपी पाण्याची सोई होणे गरजेचे आहे.- नितीन टेंभे, सरपंच, लोणी तथा अध्यक्ष, पाणीपुरवठा योजना

टॅग्स :Waterपाणी