शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
2
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
3
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
4
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
5
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
6
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
7
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
8
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
9
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
10
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
11
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
12
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
13
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
14
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
15
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
16
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
17
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
18
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
19
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
20
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!

सात महिन्यांची प्रतीक्षा, 17 दिवस गट्टी, पुन्हा सुट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 05:00 IST

शहरात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. दीड शतकी मजल गाठल्यानंतर २००-३०० च्या घरात कोरोनाग्रस्तांचे निदान झाले आहे. त्यामुळे महापालिकेच्या सर्व शाळा २८ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याच्या निर्णयावर महापौरांनी शुक्रवारच्या बैठकीत शिक्कामोर्तब केला. मात्र, तो निर्णय पालकांपर्यंत न गेल्याने त्यांच्या मागे लागून अनेक मुले शाळेत दाखल झाली. पण, प्रशासनाचा निर्णय कळविण्यासाठी फाटकापुढे तैनात करण्यात आलेल्या शिक्षकांनी त्यांना परतविले.

ठळक मुद्देदहावी, बारावी सोडून सर्व शाळांचे वर्ग बंद, विद्यार्थ्यांना ऐनवेळी परतावे लागले, २८ फेब्रुवारीनंतर मोबाईलवर कळविणार अपडेट

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सात महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर २३ जानेवारीपासून पाचवीपासून पुढील शाळा सुरू झाल्या. प्राथमिक शाळेतून माध्यमिक वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी एकमेकांची नावे वहीत लिहून घेतली. पुढील वर्गातील जुने सवंगडी पुन्हा एकत्र आले. जेमतेम १७ दिवस होत नाही तोच शनिवारी त्यांना शाळेच्या फाटकातून परतविले गेले अन् मित्र दूर जाणार, या जाणिवेतून मन खट्टू झाले.शहरात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. दीड शतकी मजल गाठल्यानंतर २००-३०० च्या घरात कोरोनाग्रस्तांचे निदान झाले आहे. त्यामुळे महापालिकेच्या सर्व शाळा २८ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याच्या निर्णयावर महापौरांनी शुक्रवारच्या बैठकीत शिक्कामोर्तब केला. मात्र, तो निर्णय पालकांपर्यंत न गेल्याने त्यांच्या मागे लागून अनेक मुले शाळेत दाखल झाली. पण, प्रशासनाचा निर्णय कळविण्यासाठी फाटकापुढे तैनात करण्यात आलेल्या शिक्षकांनी त्यांना परतविले. काही दिवसांच्या शाळेत दोस्ती जमलेल्या मुलांना आपल्या चिमुकल्या सोबत्याला भेटायचे होते. त्याच्याशी फिजिकल डिस्टन्सिंग ठेवूनच का होईना, बोलायचे होते. शिक्षकांना अभ्यास दाखवायचा होता.  कोरोनाकाळात झालेले अभ्यासाचे नुकसान काही प्रमाणात भरून निघेल, या अपेक्षाने पालकांनी मोठा धोका पत्करून पाल्यांना शाळेत पाठविले. मात्र, कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने सर्व पुन्हा दप्तरबंद झाले आहे.घरी परतणा-या विद्यार्थ्यांची गर्दी शनिवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास वडाळीच्या मनपा शाळा क्रमांक १४ येथे दृष्टीस पडली. शाळा २८ फेब्रुवारीपर्यंत बंद असल्याचे सांगण्याची जबाबदारी येथे वर्गशिक्षक असलेल्या दिव्यांग शिक्षिका ज्योत्स्ना खडसे यांनी पार पाडली. याशिवाय सूचना फलकही लावले होते. वडाळी येथील महापालिका शाळेत ३५ मुले आली होती.

शहरात ४२ शाळा, ६ हजार विद्यार्थीअमरावती महापालिकेंतर्गत शहरात ५० शाळा असून, ९५०० विद्यार्थी संख्या आहे. यामध्ये इयत्ता पाचवी ते आठवीच्या ४२ शाळा असून, ६ हजारांवर विद्यार्थिसंख्या आहे. 

मुले नियमित शाळेत यायला सुरुवात झाली होती. मुलांना शिकवणीची गोडी लागली असतानाच पुन्हा वाढत्या कोरोनामुळे शाळा बंदचा निर्णय धडकल्याने आता ऑनलाईन अभ्यासाक़डे वळावे लागेल.- योगेश पखाले, मुख्याध्यापक

शिक्षकांचा मेसेज शुक्रवारी सायंकाळी प्राप्त झाल्याने मुलाला शाळेत पाठविले नाही. पण, शाळा बंदच्या निर्णयाने दु:ख झाले. माझा मुलगा सातवीत शिकतो. आम्ही रोज कामात व्यस्त राहत असल्याने त्याचा अभ्यास घेऊ शकत नाही. - प्रतिभा मोहोड, पालक, वडाळी.

 

टॅग्स :Schoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्या