शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
3
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
4
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ महत्वाच्या समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
5
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
6
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
7
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
8
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
9
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
10
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
12
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
13
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
14
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
15
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
16
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
17
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
18
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
19
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
20
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती

सात मृत्यू, ६७१ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:23 IST

अमरावती : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग चांगलाच वाढला आहे. त्यात रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढल्याने जिल्ह्याची चिंता वाढली आहे. बुधवारी सात ...

अमरावती : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग चांगलाच वाढला आहे. त्यात रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढल्याने जिल्ह्याची चिंता वाढली आहे. बुधवारी सात रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने संक्रमितांच्या मृत्यूची संख्या ५४० झाली, तर ६७१ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ३७,१२३ झालेली आहे.

जिल्ह्यात २४ तासांत २,४९६ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात २६.८८ टक्के पॉझिटिव्हिटीची नोंद झाल्याने एकूण परिस्थिती गंभीरच आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतीच असल्याने जिल्ह्याची चिंता वाढली आहे. शहरातदेखील सर्वच परिसरात कोरोनाग्रस्तांची नोंद होत आहे. त्यातही साईनगर, राजापेठ, दस्तूरनगर, अर्जुननगर हे भाग कोरोनाचे हॉट स्पाॅट बनले आहे. या भागात एकप्रकारे ‘कम्युनिटी स्प्रेड’सारखी स्थिती निर्माण झालेली आहे.

उपचारानंतर बरे वाटल्याने बुधवारी २१९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सद्यस्थितीत कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ३०,०६७ वर पोहोचली आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने हे प्रमाण सध्या ८०.९९ वर पोहोचले आहे. जानेवारी महिन्यात हेच प्रमाण ९६ टक्क्यांपर्यंत पोहोचले होते.

बॉक्स

बुधवारी सात मृत्यू

येथील फ्रेजरपुरातील ६५ वर्षीय महिला, फुबगाव येथील ६२ वर्षीय पुरुष, अंबापेठेतील ८५ वर्षीय पुरुष, मांगीलाल प्लॉटमधील ९२ वर्षीय पुरुष, छाया कॉलनीतील ७५ वर्षीय पुरुष, तळेगाव येथील ५३ वर्षीय पुरुष, अचलपूर येथील ५७ वर्षीय पुरुषाचा उपचारदरम्यान मृत्यू झाल्याने संक्रमित मृतांची संख्या ५४० वर पोहोचली आहे.