शहरं
Join us  
Trending Stories
1
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
2
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
3
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती
4
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
5
Womens World Cup : लाजिरवाण्या पराभवासह पाक संघ OUT; सेमीसह फायनल भारतात खेळवण्याचा मार्ग मोकळा!
6
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
7
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
8
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
9
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
10
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
11
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
12
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
13
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
14
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
15
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
16
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
17
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
18
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
19
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
20
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!

सात आरोपींना तीन वर्षांचा समश्र कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:14 IST

अमरावती : सोसायटी बैठकीतील झालेल्या किरकोळ वादावरून इसमाला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सात आरोपींना न्यायालयाने तीन वर्षे सश्रम ...

अमरावती : सोसायटी बैठकीतील झालेल्या किरकोळ वादावरून इसमाला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सात आरोपींना न्यायालयाने तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला जोशी (फलके) यांनी बुधवारी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. कुऱ्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तरोडा स्थित हनुमान मंदिराजवळ १३ ऑगस्ट २०१० रोजी ही घटना घडली होती.

विधी सूत्रानुसार, १३ ऑगस्ट २०१० रोजी तरोडा ग्राम पंचायत कार्यालयात सेवा सोसायटीच्या बैठकीत काही नागरिकांनी मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घातला. किरकोळ वादावरून गावातील निखिल जगताप, विकास जगताप व अरुण ठाकरे यांना रात्री ८.३० वाजता परत येत असताना सोसायटी बैठकीतील कारणावरून सात जणांनी गैरकायदेशीर मंडळी जमवून अरुण ठाकरे यांच्यावर लोखंडी सळाख व पाईपने हल्ला केला. त्यांना गंभीर अवस्थेत नागपूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले होते. घटनेची तक्रार जखमी अरुण यांचे भाऊ विनोद भीमराव ठाकरे यांनी कु-हा पोलिसांत नोंदविली. पोलिसांनी आरोपी प्रमोद बापूराव देशमुख (४६), विनोद बापुराव देशमुख (४३), दादाराव तुकाराम बोरकर (४०), श्रावण उकंडराव काळे (३५), विनोद उकंडराव काळे (३३), अनिल श्रीराम सोनटक्के (३०) व मारोती पुंडलिक भिवगडे (२२, सर्व रा. तरोडा, कु-हा) विरुध्द विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला. पोलिसांनी तपासकार्य पूर्ण करून १० जानेवारी २०११ रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

न्यायालयात सुनावणीदरम्यान सरकारतर्फे एकूण १६ साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही पक्षाच्या युक्तिवादानंतर आरोपींचा दोष सिध्द झाल्याने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने सर्व आरोपींना भादंविच्या कलम १४३ अन्वये तीन महिन्यांचा सश्रम कारावास, पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवसांची साधी कैद, कलम १४७ नुसार एक वर्ष सश्रम कारावास, पाच हजार रुपयांचा दंड व दंड न भरल्यास दोन महिने सश्रम कारावास, कलम १४८ अन्वये एक वर्ष सश्रम कारावास व पाच हजार रुपयांचा दंड आणि दंड न भरल्यास दोन महिने सश्रम कारावास, तर भादंविच्या कलम ३०७ अन्वये तीन वर्षांचा सश्रम कारावास, पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने सश्रम कारावास, तर कलम ३२४ अन्वये सहा महिने साधा कारावासाची शिक्षा ठोठावली.

बॉक्स

नुकसान भरपाईचे निर्देश

हल्ल्यात जखमी झालेल्या अरुण ठाकरे यांना उपचाराचा खर्च व मानसिक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे त्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव यांना निर्देश दिले आहेत. याप्रकरणात सरकारतर्फे सहायक सरकारी अभियोक्ता मिलिंद जोशी यांनी युक्तिवाद केला. याप्रकरणाचा तपास कु-हाचे तत्कालीन ठाणेदार एम.एम. पठाण यांनी केला. पैरवी अधिकारी म्हणून जोशी यांनी कामकाज पाहिले.