शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

सात आरोपींना तीन वर्षांचा समश्र कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:14 IST

अमरावती : सोसायटी बैठकीतील झालेल्या किरकोळ वादावरून इसमाला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सात आरोपींना न्यायालयाने तीन वर्षे सश्रम ...

अमरावती : सोसायटी बैठकीतील झालेल्या किरकोळ वादावरून इसमाला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सात आरोपींना न्यायालयाने तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला जोशी (फलके) यांनी बुधवारी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. कुऱ्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तरोडा स्थित हनुमान मंदिराजवळ १३ ऑगस्ट २०१० रोजी ही घटना घडली होती.

विधी सूत्रानुसार, १३ ऑगस्ट २०१० रोजी तरोडा ग्राम पंचायत कार्यालयात सेवा सोसायटीच्या बैठकीत काही नागरिकांनी मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घातला. किरकोळ वादावरून गावातील निखिल जगताप, विकास जगताप व अरुण ठाकरे यांना रात्री ८.३० वाजता परत येत असताना सोसायटी बैठकीतील कारणावरून सात जणांनी गैरकायदेशीर मंडळी जमवून अरुण ठाकरे यांच्यावर लोखंडी सळाख व पाईपने हल्ला केला. त्यांना गंभीर अवस्थेत नागपूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले होते. घटनेची तक्रार जखमी अरुण यांचे भाऊ विनोद भीमराव ठाकरे यांनी कु-हा पोलिसांत नोंदविली. पोलिसांनी आरोपी प्रमोद बापूराव देशमुख (४६), विनोद बापुराव देशमुख (४३), दादाराव तुकाराम बोरकर (४०), श्रावण उकंडराव काळे (३५), विनोद उकंडराव काळे (३३), अनिल श्रीराम सोनटक्के (३०) व मारोती पुंडलिक भिवगडे (२२, सर्व रा. तरोडा, कु-हा) विरुध्द विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला. पोलिसांनी तपासकार्य पूर्ण करून १० जानेवारी २०११ रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

न्यायालयात सुनावणीदरम्यान सरकारतर्फे एकूण १६ साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही पक्षाच्या युक्तिवादानंतर आरोपींचा दोष सिध्द झाल्याने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने सर्व आरोपींना भादंविच्या कलम १४३ अन्वये तीन महिन्यांचा सश्रम कारावास, पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवसांची साधी कैद, कलम १४७ नुसार एक वर्ष सश्रम कारावास, पाच हजार रुपयांचा दंड व दंड न भरल्यास दोन महिने सश्रम कारावास, कलम १४८ अन्वये एक वर्ष सश्रम कारावास व पाच हजार रुपयांचा दंड आणि दंड न भरल्यास दोन महिने सश्रम कारावास, तर भादंविच्या कलम ३०७ अन्वये तीन वर्षांचा सश्रम कारावास, पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने सश्रम कारावास, तर कलम ३२४ अन्वये सहा महिने साधा कारावासाची शिक्षा ठोठावली.

बॉक्स

नुकसान भरपाईचे निर्देश

हल्ल्यात जखमी झालेल्या अरुण ठाकरे यांना उपचाराचा खर्च व मानसिक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे त्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव यांना निर्देश दिले आहेत. याप्रकरणात सरकारतर्फे सहायक सरकारी अभियोक्ता मिलिंद जोशी यांनी युक्तिवाद केला. याप्रकरणाचा तपास कु-हाचे तत्कालीन ठाणेदार एम.एम. पठाण यांनी केला. पैरवी अधिकारी म्हणून जोशी यांनी कामकाज पाहिले.