शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

उष्मघाताच्या रुग्णांसाठी इर्विनमध्ये दोन स्वतंत्र वार्डची व्यवस्था

By उज्वल भालेकर | Updated: April 20, 2023 19:41 IST

उन्हाचा तडाखा वाढला : आरोग्य प्रशासन सतर्क, नागरिकांना आवाहन

अमरावती : जिल्ह्यात उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला असून, दुपारच्या सुमारास घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. जिल्ह्यातील तापमान हे ४३ अंशांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हामध्ये उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा आरोग्य प्रशासन सतर्क असून, जिल्हा सामान्य रुग्णालयात उष्माघाताच्या रुग्णांसाठी दोन वाॅर्डात स्वतंत्र व्यवस्था करण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

राज्यात सूर्य सर्वत्रच आग ओकत आहे. अशातच नुकताच पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात भरउन्हात हजेरी लावलेल्या सहाशेच्या जवळपास नागरिकांना उष्माघाताचा त्रास, तर १२ नागरिकांचा मृत्यू देखील झाला. त्यामुळे उष्माघातापासून बचावासाठी त्वरित उपाय योजना आवश्यक आहे. माणसाच्या शरीरामध्ये नॉर्मल तापमान हे ३७ अंश डिग्री सेल्सिअस इतके असते. त्यामुळे शरीरातील तापमान यापेक्षा जास्त वाढले तर घाम येतो आणि शरीर थंड होण्याची प्रक्रिया सुरू होते. शरीरातील पाणी संपले तर घाम येणे बंद होऊन तोंडाला कोरडा पडून उष्माघाताची शक्यता वाढते. त्यामुळे उन्हामध्ये बाहेर पडताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. त्याच अनुषंगाने जिल्हा सामान्य रुग्णालयात उष्माघाताच्या महिला रुग्णांसाठी वाॅर्ड क्रमांक एक, तर पुरुष रुग्णांसाठी वाॅर्ड क्र. आठमध्ये स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.उष्माघातापासून अशी घ्या काळजी

उष्माघात होऊ नये यासाठी विशेष कळजी घेणे गरजचे आहे. यामध्ये वाढत्या उन्हामध्ये कष्टाची कामे करणे टाळावी, उष्णता शोषून घेणारे कपडे घालावेत, उन्हामध्ये शेतावर अथवा इतर मजुरीची कामे फार वेळ करू नये, भरपूर प्रमाणात पाणी प्यावे, घराबाहेर पडताना छत्री, टाेपी किंवा चेहऱ्यावर कपडा बांधावा, अशक्तपणा असेल तर त्वरित डॉक्टरांना दाखवावे.उन्हाचा वाढता तडाखा लक्षात घेता, जिल्हा सामान्य रुग्णालयात वाॅर्ड एक व आठमध्ये उष्माघाताच्या रुग्णांसाठी व्यवस्था केली आहे. तसेच उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयातही उष्माघाताच्या रुग्णांसाठी प्रत्येकी दोन बेडची व्यवस्था केली आहे. जिल्ह्यात सध्यातरी उष्माघाताचा एकही रुग्ण आढळलेला नाही.-डॉ. दिलीप सौंदळे, जिल्हा शल्यचिकित्सक

टॅग्स :AmravatiअमरावतीHeat Strokeउष्माघात