शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

प्रभागातील प्रत्येक जागेसाठी वेगळी मतपत्रिका

By admin | Updated: January 7, 2017 00:16 IST

बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमध्ये मतदान यंत्रावर लावण्यात येणाऱ्या विविध जागांच्या मतपत्रिका मतदारांच्या चटकन लक्षात येण्यासाठी ...

आयोगाचे निर्देश : महापालिकेची सार्वत्रिक निवडणूकअमरावती : बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमध्ये मतदान यंत्रावर लावण्यात येणाऱ्या विविध जागांच्या मतपत्रिका मतदारांच्या चटकन लक्षात येण्यासाठी प्रत्येक प्रभागातील प्रत्येक जागेसाठी वेगवेगळ्या रंगाच्या मतपत्रिका लावण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक जागेच्या मतपत्रिकेचा रंग निश्चित करण्यात आला आहे. अमरावतीसह राज्यातील १० महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका फेब्रुवारीमध्ये प्रस्तावित आहेत. १३ मे २०१६ व ३० आॅगस्ट २०१६ अन्वये महापालिकांमध्ये (बृहन्मुंबई वगळून) एक सदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी बहुसदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्यात आली आहे.त्या अनुषंगाने मतपत्रिका व इतर बाबींकरिता नव्याने आदेश पारित करण्यात आले आहे. प्रत्येक प्रभागातील ‘अ’ जागेची मतपत्रिका पांढऱ्या रंगाची असेल. ‘ब’ जागेची मतपत्रिका फिक्या गुलाबी रंगाची, ‘क’ जागेची मतपत्रिका फिका पिवळा रंग, ‘ड’ जागेची मतपत्रिका फिक्या निळ्या रंगाची असेल तर प्रत्येक प्रभागातील ‘इ’ जागेची मतपत्रिका फिक्या हिरव्या रंगाची असेल. अमरावती महापालिकेत २१ प्रभागात चार सदस्य तर एसआरपीएफ या एकमेव प्रभागात तीन सदस्य राहणार आहेत. महापालिका सदस्यपदाच्या निवडणुकीकरिता प्रत्येक प्रभागातील प्रत्येक सदस्यपदाच्या जागेला प्रभागाच्या क्रमांकासोबत यथास्थिती अ, ब, क, ड किंवा इ अशा रितीने क्रमांक देण्यात येईल. उदा. प्रभाग क्र. ९ मध्ये ३ जागा असतील तर त्या प्रभागातील जागांना ९ अ, ९ ब आणि ९ क असे संबोधण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)स्वतंत्र अनामत रक्कमनामनिर्देशनपत्र सादर करणे - महानगरपालिका सदस्यपदाच्या प्रत्येक जागेसाठी स्वतंत्र अनामत रक्कम भरणे आवश्यक राहील. एका जागेसाठी एका व्यक्तीकडून जास्तीत जास्त चार नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येतील. एकाच जागेसाठी नामनिर्देशनपत्र स्वीकारताना अनामत रक्कम एकदाच स्वीकारण्यात येईल.-तर पहिले नामांकन वैधबहुसदस्यीय प्रभाग पद्धतीत एक उमेदवार एका प्रभागातील एकाच जागेवर निवडणूक लढवू शकेल. तथापि अन्य प्रभागातील जागेवर त्या उमेदवाराने निवडणूक लढविण्यास बंदी असणार नाही. एका उमेदवाराने एकाच प्रभागातील एकापेक्षा अधिक जागांसाठी नामनिर्देशनपत्र दाखल केल्यास छाननीच्या वेळी कोणत्या जागेची निवडणूक लढवायची आहे याविषयी उमेदवाराची लेखी इच्छा विचारात घेण्यात यावी. उमेदवाराने अशी इच्छा व्यक्त न केल्यास प्रथमत: प्राप्त झालेले वैध नामनिर्देशनपत्र विचारात घेतले जाईल.