शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

शिवसेना संपर्क अभियनातून जाणल्या व्यथा

By admin | Updated: May 15, 2017 00:17 IST

विदर्भातील शेतकऱ्यांचे प्रश्न, समस्या जाणून घेण्यासाठी शिवसेनेने संपर्क अभियान राबविले आहे.

मुंबई आमदारांची वारी : उद्धव ठाकरेंना आज शेतकरी प्रश्नांचा अहवाल होणार सादरलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विदर्भातील शेतकऱ्यांचे प्रश्न, समस्या जाणून घेण्यासाठी शिवसेनेने संपर्क अभियान राबविले आहे. त्यानुसार रविवारी मुंबईचे आ. संजय पोतनीस यांच्या नेतृत्वातील चमुने अमरावती, बडनेरा मतदार संघातील शेतकऱ्यांच्या भेटी घेवून त्यांच्याकडून समस्या जाणून घेतल्या.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसोबत थेट संपर्क साधण्यासाठी शिवसेना संपर्क अभियानाला प्रारंभ केला आहे. या अभियानाचा अकोला येथे सोमवारी १५ मे रोजी समारोप होणार आहे. त्यानुसार विदर्भात शेतकऱ्यांचे प्रश्न, समस्या जाणून घेण्यासाठी गठित सेना आमदारांकडे विविध विधानसभा मतदार संघांची जबाबदारी सोपविण्यात आली होती. आ. राजू पोतनीस यांनी बडनेरा मतदार संघातील भातकुली, अंजनगाव बारी आदी गावांना भेटी देवून शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. शेतकऱ्यांचे प्रश्न, कर्जपुरवठा, बँकांचे धोरण, थकबाकी, पीक परिस्थिती, गुरांसाठी चारा, मुला-मुलींच्या शिक्षणाची परिस्थिती, कौटुंबिक समस्या आदींवर सेना आमदारांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना भर दिला. शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या धोरणाबाबत काय वाटते, हे सेना आमदार पोतनीस उद्धव ठाकरे यांना अहवाल रुपात सादर करतील. गत दोन दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार सेना नेते, आमदारांची चमू विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. सेनेचे नेते गावखेड्यात पोहचून शेतकऱ्यांशी संवाद साधताना सेनेबद्दल त्यांची मानसिकता तपासून पाहत आहेत. दरम्यान आ. पोतनीस यांनी अंजनगाव बारी, भातकुली आदी भागाचा दौरा आटोपून येथील शासकीय विश्रामभवनात स्थानिक निवडक सेना नेते, पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन शिवसेना संपर्क अभियानाची भूमिका मांडली. यावेळी मुंबईचे नगरसेवक राजू पेडणीकर, अरविंद भोसले यांच्यासह महानगर प्रमुख सुनील खराटे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रशांत वानखडे, वर्षा भोयर, मनीषा टेंभरे, वर्षा खारोडे, पराग गुडधे, ललित झंझाड, प्रवीण हरमकर, राजेंद्र तायडे आदी उपस्थित होते. दरम्यान, एक चमु मोर्शी, वरुड तर धामणगाव, नांदगाव खंडेश्वर तालुक्यात शेतकऱ्यांच्या भेटीसाठी दाखल झाली होती.