शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
2
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
4
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
5
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
6
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
7
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
8
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
9
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
10
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
11
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
12
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
13
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
14
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
15
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
16
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
17
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
18
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
19
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
20
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं

एमआयडीसीवर जप्तीची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 22:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : नागपूर महामार्गालगतच्या नवीन पंचतारांकित महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) निर्मितीसाठी शेतकऱ्यांच्या तोकड्या भावाने ताब्यात ...

ठळक मुद्देशेतकऱ्यांचे भूसंपादन मोबदला प्रकरण : टेबल, खुर्च्या, संगणक, आलमारी आदी साहित्य घेतले ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नागपूर महामार्गालगतच्या नवीन पंचतारांकित महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) निर्मितीसाठी शेतकऱ्यांच्या तोकड्या भावाने ताब्यात घेतलेल्या जमिनींचा वाढीव दराने मोबदला देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी येथील एमआयडीसी कार्यालयावर शुक्रवारी जप्तीची कारवाई करण्यात आली. स्थानिक दिवाणी वरिष्ठ न्यायालयाच्या आदेशानुसार बेलीफने टेबल, खुर्च्या, संगणक, आलमारी आदी कार्यालयीन साहित्य ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईमुळे एमआयडीसी कार्यालय परिसरात एकच खळबळ उडाली, हे विशेष.राज्य शासनाने नांदगाव पेठ येथे पंचतारांकित एमआयडीसी निर्मितीसाठी सन १९९७ मध्ये पंचक्रोशीतील हजारो शेतकºयांच्या जमिनींचे भूसंपादन केले. त्यावेळी एकरी ७०० रुपये दराने शासनाने भूसंपादनाचा निर्णय घेतला. मात्र, शेतकºयांचा विरोध असतानाही बळजबरीने शेतकºयांच्या जमिनी ताब्यात घेण्याची एकतर्फी प्रक्रिया राबविली. परंतु, जमिनीला तोकडा भाव दिल्याप्रकरणी शासनाच्या विरोधात ४० शेतकऱ्यांनी सन २०१५ मध्ये न्यायालयात धाव घेतली. शेतकऱ्यांनी कोर्टात अपील दाखल केले. त्यानुसार येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने शेतकऱ्यांना भूसंपादनाचा वाढीव मोबदला देण्याबाबत सन- २०१५ मध्ये एमआयडीसीला आदेशीत केले. परंतु, एमआयडीसीने वरिष्ठ न्यायालयाच्या आदेशाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाचा नागपूर खंडपीठात धाव घेतली. उच्च न्यायालयानेदेखील शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देण्यासंदर्भात एमआयडीसीला आदेशित केले.दरम्यान, एमआयडीसी आणि शेतकऱ्यांमध्ये लोकअदालतीच्या माध्यमातून १० फेब्रुवारी २०१८ रोजी वाढीव मोबदल्यासाठी तडजोड झाली. तीन महिन्याच्या आत वाढीव मोबदला शेतकऱ्यांना दिला जाईल, असे एमआयडीसीने न्यायालयात लेखी कबुलीपत्र सादर केले. परंतु, एमआयडीसीने भूसंपादनाचे शेतकऱ्यांना वाढीव मोदबला देण्याविषयी कोणतीही कार्यवाही केली नाही. दरम्यान, कोर्टाने वाढीव मोबदल्यासंदर्भात एमआयडीसीला मुदतीच्या आत वाढीव मोबदला देण्याविषयी अवगत केले. त्याकरिता दोनदा नोटीस बजावली. तथापि, एमआयडीसीने दिवाणी वरिष्ठ न्यायालयाच्या आदेशाची दखल घेतली नाही. त्यामुळे ४० अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी कोर्टानेच पुढाकार घेतला. स्वतंत्रपणे बेलीफ पाठवून येथील एमआयडीसी कार्यालयावर जप्तीची कार्यवाही केली.पहिल्या टप्प्यात न्यायालयाने नलिनी गढीकर (सावर्डी), विनोद बजाज (सावर्डी), पंचफुला धारगावे (सावर्डी), पांडुरंग इंगोले (अमरावती) व प्रल्हाद तागडे (सावर्डी) या शेतकऱ्यांना वााढीव मोबदला मिळण्यासाठी जप्तीची कार्यवाही केली आहे.१२५० शेतकऱ्यांचे वाढीव मोबदल्याचे प्रकरणनांदगाव पेठ एमआयडीसीत भूसंपादन झालेल्या एकूण १२५० शेतकºयांची प्रकरणे वाढीव मोबदल्यासाठी प्रलंबित आहेत. यात वाघोली, सावर्डी, माहुली जहागीर, तुळजापूर, डवरगाव, धामणा, नारायणपूर, सालोरा, पिंपळविहीर आदी गावांतील शेतकºयांचा समावेश आहे.भूसंपादनाचे प्रकरण जुने आहे. सध्या मी बाहेरगावी असल्याने जप्तीबाबत मी काही सांगू शकत नाही. न्यायालयीन कारवाई कोणत्या प्रकारची झाली, हे माहिती नाही.- सुधाकर फुकेप्रादेशिक अधिकारी, वरिष्ठ नगररचनाकार एमआयडीसी, अमरावती.स्थानिक वरिष्ठ दिवाणी न्यायालयाच्या आदेशानुसार साहित्य जप्त करण्यात आले आहे. वकिलांच्या समक्ष ही कारवाई केली असून, ताब्यात घेतलेले साहित्य न्यायालयात सुरक्षितपणे ठेवले जाईल.- एच.एम. डफरबेलीफ, दिवाणी न्यायालय, अमरावती.फुटाण्याच्या भावात आमच्या जमिनी ताब्यात घेण्यात आल्यात. न्यायालयाने वाढीव मोबदला देण्यासंदर्भात आदेश देऊनही सातत्याने टाळाटाळ करण्यात आली. अखेर न्यायालयाला जप्तीची कारवाई केल्याशिवाय पर्याय उरला नाही.- विनोद बजाज, अन्यायग्रस्त शेतकरी