शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

'त्या' वसतिगृहाची सुरक्षा वाऱ्यावर

By admin | Updated: September 11, 2016 00:12 IST

पांढरी खानमपूर येथील सामाजिक न्याय विभागाच्या मुलींच्या शासकीय निवासी शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीचे अपहरण व अत्याचाराचा प्रयत्न प्रथमच घडला.

अंजनगाव सुर्जी : पांढरी खानमपूर येथील सामाजिक न्याय विभागाच्या मुलींच्या शासकीय निवासी शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीचे अपहरण व अत्याचाराचा प्रयत्न प्रथमच घडला. तरी येथील सुरक्षिततेच्या बाबतीतील ढिसाळपणा या विद्यार्थिनीच्या जीवावर बेतला. ज्या पद्धतीने या विद्यार्थिनीला केवळ एका अर्जाच्या आधारे, आई-वडील वगळून व त्यांच्याशी मोबाईल संपर्क न होता एका अनोळखी व्यक्तीच्या स्वाधीन करण्यात आले, ही पद्धत अतिशय चुकीची व हलगर्जीपणाची आहे. पांढरी गावापासून दीड कि.मी अंतरावर लोकवस्ती नसलेल्या या निर्जन जागेवरच्या वसतिगृहात १३५ मुली राहतात. सुरक्षेचा आढावा घेऊन समाजकल्याण विभागाने येथील नियमांची आचारसंहिता लेखी पद्धतीने राबविणे आवश्यक आहे. पांढरीच्या या निवासी वसतिगृहात महिला अधीक्षकाचे पद आहे. पण या अधीक्षकाकडे दर्यापूरचा अतिरिक्त प्रभार आहे आणि या महिला अधीक्षक दर्यापूर येथेच राहतात. पांढरी येथील प्रशासन व सुरक्षा व्यवस्था सुरक्षा रक्षकाच्या भरवशावर सोडून देण्यात आली आहे. तब्बल १३५ मुली असलेल्या या वसतिगृहात शासनातर्फे जबाबदार महिला अधिकारी राहत नाही, ही शोकांतिका आहे. टोलेजंग इमारत असलेल्या या वसतिगृहाच्या पश्चिम दिशेच्या कंपाऊंडला पडलेले मोठे छिद्र तात्पुरती डागडुजी करून बंद करण्यात आले आहे. याठिकाणी विद्युत प्रवाह खंडीत झाल्यास जनरेटरची कोणतीही व्यवस्था नाही. सर्वात महत्वाचे हे की मुलींचे वसतीगृह असून सुद्धा याठिकाणी सी. सी. टी. व्ही. कॅमेरे बसविलेले नाहीत. (तालुका प्रतिनिधी)