शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
3
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
4
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
5
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
6
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
7
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
8
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
9
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
10
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
11
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
12
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
13
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
14
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
15
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
16
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
17
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
18
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
19
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
20
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी

दहा एटीएमपैकी केवळ दोन ठिकाणी सुरक्षा रक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:16 IST

सुरक्षा रक्षकांची वानवा : ना अलार्म, ना सीसीटीव्ही, कचऱ्याचा ढीग, आरबीआयच्या मानकांना ठेंगा फोटो पी १२ भाकरे प्रदीप भाकरे ...

सुरक्षा रक्षकांची वानवा : ना अलार्म, ना सीसीटीव्ही, कचऱ्याचा ढीग, आरबीआयच्या मानकांना ठेंगा

फोटो पी १२ भाकरे

प्रदीप भाकरे

अमरावती : शहरातील सर्व बँकांनी एटीएम सेंटरच्या सुरक्षिततेबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) ठरवून दिलेल्या मानकांना फाटा दिला आहे. गत आठवड्यात तपोवन परिसरातील एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला होता. त्यात चौघांना अटकदेखील करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर एटीएमच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या अनुषंगाने लोकमतने गुरुवारी दुपारी शहरातील १० एटीएमची स्थिती न्याहाळली. त्यात १० पैकी जिल्हा बँक व इर्विन चौक स्थित दोन एटीएमच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक आढळून आले.

आरबीआयने एटीएम सेंटरच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षा रक्षक, सायरन, सीसीटीव्ही कॅमेरे, फ्लॅश लाइट्स अशा प्रकारची मानके आखून दिली आहेत. मात्र, अद्याप एकाही बँकेने एटीएम सुरक्षिततेच्या बाबतीत या मानकांची पूर्तता केली नसल्याचे समोर आले आहे. शहरात विविध बँकांची सुमारे १५२ एटीएम सेंटर आहेत. शहरात आतापर्यंत दोन वेळा एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला. विशेष म्हणजे, या एटीएमपैकी एकाही एटीएमला सुरक्षारक्षक नेमलेला नव्हता तसेच एकाही एटीएममध्ये सायरन सिस्टीम बसवलेली नव्हती.

अशी आहेत मानके

एटीएम सेंटरच्या सुरक्षिततेसाठी काय खबरदारी घ्यावी, याची मानके आरबीआयने ठरवून दिलेली आहे. यामध्ये एटीएम सेंटरमध्ये सायरन, एटीएमच्या बाहेर फ्लॅश लाईट, फक्त रेकॉर्डिंगच्या उद्देशाने कॅमेरे न बसविता आतील आणि बाहेरील अशा दोन्ही भागांचे चित्रीकरण करणारे कॅमेरे असावेत. स्वयंचलित लॉक होणारे दरवाजे तसेच सुरक्षारक्षकांची नेमणूक या मानकांचा समावेश आहे. अनेकदा बँकांचे एटीएम निर्जन स्थळी किंवा रस्त्यापासून काही अंतरावर असतात. त्यामुळे एटीएमला सायरन सिस्टीम बसविणे गरजेचे आहे, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीमध्ये सायरन वाजल्यास परिसरातील रहिवासी मदतीला येऊ शकतात.

.

पोलीस आणि बँक अधिकाऱ्यांची बैठक

शहरातील ९५ टक्के एटीएमला सुरक्षा रक्षक नाहीत. या पार्श्वभूमीवर बुधवारी पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी बँकांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये बँकेच्या एटीएम सुरक्षिततेसाठी काय करता येईल, सुरक्षिततेच्या मानकांची अंमलबजावणी का व कशी करावी, याबाबत चर्चा झाली.

///////////////////

येथे नोंदविले निरीक्षण

‘लोकमत’ने राजकमल चाैक, राजापेठ, कंवरनगर मार्गावरील दोन, शंकरनगर, गर्ल्स हायस्कूल, गांधी चौक, गाडगेनगर व इर्विन चौकातील दोन अशा एकूण १० ठिकाणच्या एटीएमची स्थिती जाणून घेतली. पैकी इर्विन चौकातील दोन्ही एटीएम स्थळी सुरक्षारक्षक आढळून आले. तेथील एका ठिकाणी सुरक्षारक्षक असला तरी एटीएमबाहेर ‘एटीएम बंद आहे’ असा फलक झळकला होता. सहा ते सात एटीएममध्ये कागदांचा खच आढळून आला.

////////////////

काही एटीएमस्थळी समस्या आहेत. संबंधित बँकांना त्याबाबत सूचना दिल्या जातील. एटीएमची जबाबदारी संबंधित बँकांची आहे.

- जितेंद्र झा, व्यवस्थापक, अग्रणी बँक

////////////////////

कोट

एटीएम सेंटर ही बँकेची मालमत्ता आहे. तिचे संरक्षण करणे याची जबाबदारीही बँकेचीच आहे. आरबीआयनेही त्या संदर्भात काही मानके ठरवून दिलेली आहेत. मात्र, बँकांकडून या मानकांचे पालन केले जात नाही. त्यामुळे एटीएम सुरक्षेबाबत बँक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना काही सूचना करण्यात आल्या आहे.

- विक्रम साळी, पोलीस उपायुक्त