शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

दहा एटीएमपैकी केवळ दोन ठिकाणीच सुरक्षा रक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 05:00 IST

शहरात विविध बँकांची सुमारे १५२ एटीएम सेंटर आहेत. शहरात आतापर्यंत दोन वेळा एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला.  विशेष म्हणजे, या एटीएमपैकी एकाही एटीएमला सुरक्षा रक्षक नेमलेला नव्हता तसेच एकाही एटीएममध्ये सायरन सिस्टीम बसवलेली नव्हती. अमरावतीकरांच्या सुदैवाने शहरात अद्याप तरी एकाही ठिकाणाला कुठल्याही अनुचित घटनेचा स्पर्श झालेला नाही. 

प्रदीप भाकरेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरातील सर्व बँकांनी एटीएम सेंटरच्या सुरक्षिततेबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) ठरवून दिलेल्या मानकांना फाटा दिला आहे. गत आठवड्यात तपोवन परिसरातील एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला होता. त्यात चौघांना अटकदेखील करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर एटीएमच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या अनुषंगाने लोकमतने गुरुवारी दुपारी शहरातील १० एटीएमची स्थिती न्याहाळली. त्यात १० पैकी जिल्हा बँक व इर्विन चौक स्थित दोन एटीएमच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक आढळून आले. आरबीआयने एटीएम सेंटरच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षा रक्षक, सायरन, सीसीटीव्ही कॅमेरे, फ्लॅश लाइट्स अशा प्रकारची मानके आखून दिली आहेत. मात्र, अद्याप एकाही बँकेने एटीएम सुरक्षिततेच्या बाबतीत या मानकांची पूर्तता केली नसल्याचे समोर आले आहे. शहरात विविध बँकांची सुमारे १५२ एटीएम सेंटर आहेत. शहरात आतापर्यंत दोन वेळा एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला.  विशेष म्हणजे, या एटीएमपैकी एकाही एटीएमला सुरक्षा रक्षक नेमलेला नव्हता तसेच एकाही एटीएममध्ये सायरन सिस्टीम बसवलेली नव्हती. अमरावतीकरांच्या सुदैवाने शहरात अद्याप तरी एकाही ठिकाणाला कुठल्याही अनुचित घटनेचा स्पर्श झालेला नाही. 

येथे नोंदविले निरीक्षण‘लोकमत’ने राजकमल चाैक, राजापेठ, कंवरनगर मार्गावरील दोन, शंकरनगर, गर्ल्स हायस्कूल, गांधी चौक, गाडगेनगर व इर्विन चौकातील दोन अशा एकूण १० ठिकाणच्या एटीएमची स्थिती जाणून घेतली. पैकी इर्विन चौकातील दोन्ही एटीएम स्थळी सुरक्षारक्षक आढळून आले. तेथील एका ठिकाणी सुरक्षारक्षक असला तरी एटीएमबाहेर ‘एटीएम बंद आहे’ असा फलक झळकला होता. सहा ते सात एटीएममध्ये कागदांचा खच आढळून आला.

अशी आहेत मानकेएटीएम सेंटरच्या सुरक्षिततेसाठी काय खबरदारी घ्यावी, याची मानके आरबीआयने ठरवून दिलेली आहे. यामध्ये एटीएम सेंटरमध्ये सायरन, एटीएमच्या बाहेर फ्लॅश लाईट, फक्त रेकॉर्डिंगच्या उद्देशाने कॅमेरे न बसविता आतील आणि बाहेरील अशा दोन्ही भागांचे चित्रीकरण करणारे कॅमेरे असावेत. स्वयंचलित लॉक होणारे दरवाजे तसेच सुरक्षारक्षकांची नेमणूक या मानकांचा समावेश आहे. अनेकदा बँकांचे एटीएम निर्जन स्थळी किंवा रस्त्यापासून काही अंतरावर असतात. त्यामुळे एटीएमला सायरन सिस्टीम बसविणे गरजेचे आहे, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीमध्ये परिसरातील रहिवासी मदतीला येऊ शकतात.

पोलीस आणि बँक अधिकाऱ्यांची बैठकशहरातील ९५ टक्के एटीएमला सुरक्षा रक्षक नाहीत. या पार्श्वभूमीवर बुधवारी पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी बँकांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये बँकेच्या एटीएम सुरक्षिततेसाठी काय करता येईल, सुरक्षिततेच्या मानकांची अंमलबजावणी का व कशी करावी, याबाबत चर्चा झाली. 

एटीएम सेंटर ही बँकेची मालमत्ता आहे. तिचे संरक्षण करणे याची जबाबदारीही बँकेचीच आहे. आरबीआयनेही त्या संदर्भात काही मानके ठरवून दिलेली आहेत. मात्र, बँकांकडून या मानकांचे पालन केले जात नाही. त्यामुळे एटीएम सुरक्षेबाबत बँक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना काही सूचना करण्यात आल्या आहे.- विक्रम साळी, पोलीस उपायुक्त

काही एटीएमस्थळी समस्या आहेत. संबंधित बँकांना त्याबाबत सूचना दिल्या जातील. एटीएमची जबाबदारी संबंधित बँकांची आहे. - जितेंद्र झा, व्यवस्थापक, अग्रणी बँक 

 

टॅग्स :atmएटीएम