शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

अखर्चित निधीचा शोध घ्या, शासनाचे विभागप्रमुखांना फर्मान; कोविड काळातील ७०० कोटींच्यावर निधी अखर्चित

By गणेश वासनिक | Updated: September 30, 2023 21:51 IST

अमरावती : राज्य शासनाकडून आर्थिक वर्षामध्ये मिळणारा निधी अनेक विभागांनी पूर्णपणे खर्ची न केल्याने आणि शिल्लक असलेली कोट्यवधीची रक्कम ...

अमरावती : राज्य शासनाकडून आर्थिक वर्षामध्ये मिळणारा निधी अनेक विभागांनी पूर्णपणे खर्ची न केल्याने आणि शिल्लक असलेली कोट्यवधीची रक्कम शासनाने समर्पित करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. परिणामी राज्य शासनाच्या सर्व विभागात पडून असलेल्या रकमेचा शोध घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्य शासन कर्जबाजारी होऊन विकासात्मक कामांसाठी सर्व विभागांना मार्चमध्ये अनुदान देऊन आर्थिक वर्षात खर्चासाठी अवगत करीत असते. अशावेळी संबंधित शासन विभागांना चालू वर्षातील रक्कम खर्ची करून बॅंक खाते रिकामे करावे लागते. मात्र, बहुतांश विभागात वेळेपूर्वी अनुदान खर्च होत नाही. त्यामुळे राज्य शासनाने अखर्चित निधी, अनुदानाचा शोध चालविला आहे. निधीची रक्कम धूळ खात पडलेली असून, अशा विभागांसाठी कठोर पावले उचलण्यात आली आहेत. मध्यंतरी कोविड-१९ च्या वेळी २०२० मध्ये ७०० कोटींच्या घरात असाच निधी खर्च न झाल्याने आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी शासनाच्या कोषागारात जमा केला होता. त्यानंतर हा निधी शासनाने ताब्यात घेऊन विकासकामांसाठी मार्गी लावला. आता शासनाने अखर्चित निधी समर्पित विशेष मोहीम राबविण्यास प्रारंभ केला असून, येत्या काळात कोट्यवधींची रक्कम जमा होईल, असे संकेत आहेत.

राज्याच्या सर्व विभागांना दिल्या सूचनाराज्याच्या वित्त विभागाचे सहसचिव पी. जी. जाधव यांनी सर्व विभागप्रमुखांना १४ सप्टेंबर २०२३ रोजी एका पत्राद्वारे मार्च २०२३ अखेर वितरित निधी अखर्चित असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. आर्थिक वर्ष संपल्यानंतर हा निधी तसाच पडून असल्यामुळे ३१ मार्च २०२२ पूर्वी आहरित केलेला निधी मात्र विविध विभागांत खर्च न झाल्याने बँक खात्यात तसाच पडून आहे. त्यामुळे अशा रकमेचे संपूर्ण विवरण शासनाने मागितले आहे. याबाबतची जबाबदारी त्या खात्याच्या सचिवांकडे साेपविण्यात आली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांना वगळलेशासनाने अखर्चित निधी परत घेण्याची मोहीम हाती घेतली असली, तरी यातून महापालिका, जिल्हा परिषद या प्राधिकरणांना आर्थिक वर्षात निधी खर्च करणे शक्य होत नाही. मात्र, इतर विभागांना अखर्चित निधीबाबत माहिती मागविली आहे. राज्याच्या आहरण व संवितरण अधिकारी हे अखर्चित निधीचा ताळमेळ जुळवीत आहे. या सर्व निधीचा आकडा कोट्यवधींच्या घरात जाणार आहे. असे असले तरी सर्वाधिक निधी हा स्थानिक स्वराज्य संस्थांकडे पडून असल्याचे वास्तव आहे. त्याखालोखाल आदिवासी विकास विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, सिंचन विभागतही अखर्चित निधी पडून असल्याची माहिती आहे

टॅग्स :State Governmentराज्य सरकारAmravatiअमरावती