पान ३
तिवसा : नगरपंचायतींच्या निवडणूक जाहीर होण्यास वेळ असला तरी राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी तिवसा नगरपंचायतीतील १७ प्रभागांसाठी काँग्रेसच्या संभाव्य इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती ६ फेब्रुवारी रोजी घेतल्या.
तिवसा नगरपंचायतीसाठी सन २०१५ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसने १७ पैकी १० जागा मिळविल्या. पाचही वर्षे काँग्रेस बहुमताने सत्तेत राहिली. मात्र, पाच वर्षांत सत्ताकारणात अनेक उलाढाली पाहायला मिळाल्या होत्या. त्याचा परिणाम नगरपंचायत निवडणुकीत होऊ नये, यासाठी काँग्रेसने निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी कामाला सुरुवात केली आहे. तिवसा येथील विश्रामगृहात पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी शनिवारी सायंकाळपर्यंत नगरसेवकांसाठी इच्छुक असलेल्या शेकडोंच्या मुलाखती घेतल्या. उमेदवारांची मते जाणून घेतली. यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष मुकुंद देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप काळबांंडे व माजी नगराध्यक्ष वैभव वानखडे उपस्थित होते.
---------------------