शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

अचलपूर बसस्थानकच झाले भंगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 23:06 IST

जिल्ह्यातील अतिशय महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक लौकिक असलेले अचलपूर शहरातील बसस्थानक भंगार अवस्थेला पोहोचले आहे. विशेष म्हणजे, तालुका मुख्यालय असतानाही प्रवाशांसाठी नव्हे, तर बसस्थानक चोरटे, अवैध धंदेवाले, प्रेमीयुगुल, दारूड्यांसाठी कमालीचे उपयोगी ठरत आहे.

ठळक मुद्देएसटी महामंडळाचे दुर्लक्ष : नागरिकांनी फोडली टिनपत्रे, अवैध धंद्यासाठी जागेचा वापर

आॅनलाईन लोकमतअचलपूर : जिल्ह्यातील अतिशय महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक लौकिक असलेले अचलपूर शहरातील बसस्थानक भंगार अवस्थेला पोहोचले आहे. विशेष म्हणजे, तालुका मुख्यालय असतानाही प्रवाशांसाठी नव्हे, तर बसस्थानक चोरटे, अवैध धंदेवाले, प्रेमीयुगुल, दारूड्यांसाठी कमालीचे उपयोगी ठरत आहे.जवळपास एक लाख लोकवस्ती व ‘अ’ वर्ग नगरपालिकेच्या अचलपूर येथील बसस्थानकात एसटी बसचे दुर्मीळ दर्शन झाले असले तरी गाढव, म्हशी, वराह मोठ्या प्रमाणात येतात. मोकाट जनावरांचा येथे नेहमीच येथे ठिय्या असतो. उघड्यावर शौचासाठीही परिसरातील नागरिक याचा वापर करतात. अनेकांच्या म्हशी बांधलेल्या असतात. शिल्लक भागात लहान मुले क्रिकेटचा आनंद घेतात, तर रात्रीला दारू व जुगाराचा अड्डा या ठिकाणी चालतो. म्हशीचे शेणखताचे ढिगारे या ठिकाणी तयार झाले आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांना अकारण डासांचा, दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.अचलपूर मतदारसंघाला दोन राज्यमंत्रिपदे लाभली तरी बसस्थानकाकडे कोणीही लक्ष दिले नाही. संपूर्ण राज्यात आपल्या आगळ्यावेगळ्या आंदोलनाकरिता प्रसिद्ध असलेले व १५ वर्षांपासून अचलपूर विधानसभेचे आमदार प्रहारचे बच्चू कडू यांनी अनेक वेळा बसस्थानक सुस्थितीत आणण्याचा प्रयत्न केला. रक्तदान शिबिरे घेतली, आंदोलने केले; परंतु राज्य परिवहन महामंडळाच्या जाचक अटींमुळे बसस्थानक सावरू शकले नाही.जुळ्या शहरांपैकी अचलपूरची मरगळ झटकण्यासाठी हे बसस्थानक पुन्हा भरभराटीस येणे अत्यावश्यक आहे. येथे एसटी बस येणे महत्त्वपूर्ण आहे. मात्र त्यासाठी पुढाकार घेण्यास कोणीही इच्छुक नाही. बाहेरील प्रवासी अचलपुरात येत नसल्यामुळे भांडवल खेळते व्हायला संधी नाही. त्यामुळे अचलपूरचा विकास खुंटला आहे.तत्कालीन राज्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री विनायकराव कोरडे यांनी ३४ लाख रुपये खर्चून शहराबाहेर बसस्थानक बांधले होते. जुन्या अचलपूरचा विकास होईल, अशी भूमिका त्यामागे होती. काही वर्षे या बसस्थानकाने नागरिकांना सेवा दिली. मात्र, आठ वर्षांपासून या बसस्थानकात हळूहळू एसटी बस येणे बंद झाले. दरम्यान कर्मचारी येथून निघून गेले, तर नळ, पंखे, ट्यूबलाइट, लोखंडी ग्रिल, दरवाजे, टाइल्स, विद्युत वायर चोरट्यांनी काढून नेल्या. या बेवारस वास्तूची देखभाल नसल्यामुळे फरशी, विटासुद्धा चोरट्यांनी काढून नेल्या.या बसस्थानकाच्या जागेवर आदिवासी विद्यार्थी प्रशिक्षण केंद्र बनावे, याकरिता शासनाला प्रस्ताव पाठविला होता. मात्र, शासनाच्या उदासीन धोरणामुळे तो रद्द झाला.- बच्चू कडू, आमदार,अचलपूर मतदारसंघ