शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटात भंगार एसटी; त्याही अनियमित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 23:04 IST

मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्याला जोडणाऱ्या अनेक बसफेऱ्या ऐनवेळी रद्द करण्यासह अनियमित वेळेत धावत असल्याने आदिवासींमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. एसटी महामंडळाचा गलथान कारभार न सुधारल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

ठळक मुद्देआदिवासींमध्ये संताप : आंदोलनाचा इशारा, दळणवळणाची साधने मर्यादित

नरेंद्र जावरे।लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्याला जोडणाऱ्या अनेक बसफेऱ्या ऐनवेळी रद्द करण्यासह अनियमित वेळेत धावत असल्याने आदिवासींमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. एसटी महामंडळाचा गलथान कारभार न सुधारल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.मेळघाटात परतवाडा आगारातर्फे वारंवार भंगार आणि नादुरुस्त बसगाड्या पाठविण्यात येत असल्याचे सर्वश्रुत आहे. मात्र, त्याही आता अनिमित वेळेत किंवा मनात येईल तेव्हा पाठविल्या जात असल्याने आदिवासी प्रवाशांची परवड सुरू आहे. परतवाडा आगारातून टेम्ब्रुसोंडा मार्गे धारणी पाठविण्यात येणारी सकाळी ८:३० वाजताची बस फेरी मनात येईल तेव्हा आगाराच्या मनमानी कारभाराने पाठविण्यात येत आहे. अनियमित धावणाºया या बसफेरीचा फटका तालुक्यातील धारणी येथे उपविभागीय कार्यालयासह आदिवासी प्रकल्प कार्यालयात कामानिमित्त जाणाºया गोरगरीब आदिवासींना बसत आहे. दिवसभर ताटकळत बसूनही एसटी येत नसल्याने निराश मनाने पुन्हा दुसºया दिवशी परतवाडा येऊन धारणी जावे लागत असल्याने आर्थिक फटका व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.परतवाडा आगाराची टेम्ब्रुसोंडा मार्गे धारणीपर्यंत धावणारी ही बस फेरी ३० पेक्षा अधिक आदिवासी पाड्यांना जोडणारी आहे. परसापूर, उपातखेडा, बोराळा, गाडसिम्बा, नागापूर, गौलखेडा बाजार, वडापाटी, तेलखार, धरमडोह, बहाद्दरपूर, चांदपूर, टेम्ब्रुसोंडा, वस्तापूर, कुलंगणा, चिंचखेडा, जामली आर, अंबापाटी, खोंगडा, गिरगुटी, ढाकणा, सावºया, बैराटेकी, बोरीखेडा, गडगामालूर, बिजुधावडी या गावांचा समावेश आहे. या सर्व रस्त्यावरील गावांच्या आदिवासींना ही बसफेरी काम आटपून परत येण्यासाठी योग्य आहे. असे असताना महामंडळाचा हेकेखोरपणा आदिवासींमध्ये संताप व्यक्त करणारा ठरला आहे.धारणी व चिखलदरा तालुक्यात एकूण ३०१ गावे आहेत. त्यातील १५० पेक्षा अधिक गावे अतिशय दुर्गम क्षेत्रात आहेत. ती अद्यापही एसटी किंवा दळवळणाच्या अन्य साधनांनी जोडली गेली नाहीत. आदिवासी बांधव एसटी बस नियमित यावी, यासाठी झगडत असतात. मात्र, प्रशासन त्यांना भाव देत नाही. एका गावातील प्रवासी घेण्यासाठी दुर्गम भागात एसटी न्यायला परवडत नाही, अशी सबब महामंडळाकडून दिली जाते. मात्र, ज्या बसफेºया सुरू आहेत, प्रवासी गाड्या आहेत, त्याही अनियमित असल्याने आदिवासी बांधवांची मोठी कुचंबना होत आहे.स्वातंत्र्याच्या ७२ वर्षांनंतरही मेळघाटातील अनेक गाव, वाड्या व वस्त्यांमध्ये एसटी पोहोचलेली नाही आणि जेथे पोहोचली, तेथे ती नियमितपणे पाठविली जात नाही. त्याचा दुष्परिणाम आदिवासी रुग्णांच्या आरोग्यावर होत आहे. एसटी नसल्याने आजारी व्यक्तींना वेळेवर उपचार मिळत नाहीत. आजही रुग्णांना परतवाडा व अचलपूर शहरात उपचारासाठी यावे लागते, ही मेळघाटची शोकांतिका आहे.परतवाडा-टेम्ब्रुसोंडा धारणी या मार्गावर धावणारी बसफेरी महामंडळाच्या हेकेखोरपणामुळे मनात येईल तेव्हा पाठविली जाते. त्याचा आदिवासींनाच फटका बसत आहे. याची दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा राष्टÑवादी काँग्रेसचे संभुजी खडके यांनी दिला आहे.