शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

शाळा असुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 00:03 IST

शाळा, महाविद्यालयांमध्ये अग्निशमन यंत्रणा बसविणे बंधनकारक आहे. मात्र, शहरातील निम्म्यापेक्षा अधिक शाळा-महाविद्यालयांमध्ये अग्निशमन यंत्रणेचा बोजवारा उडाला असून....

अग्निशमन सयंत्रे निकामी : ‘फायर सेफ्टी आॅडिट’चा बोजवारालोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शाळा, महाविद्यालयांमध्ये अग्निशमन यंत्रणा बसविणे बंधनकारक आहे. मात्र, शहरातील निम्म्यापेक्षा अधिक शाळा-महाविद्यालयांमध्ये अग्निशमन यंत्रणेचा बोजवारा उडाला असून यात महापालिका, जिल्हा परिषदेत अधिकच विदारक स्थिती आहे. एखादवेळी शाळा-महाविद्यालयांमध्ये आग लागल्यास ती आटोक्यात आणणे, अशक्य व्हावे, अशी स्थिती आहे. नवे शैक्षणिक सत्र सुरू होऊन महिनाभराचा कालावधी लोटल्यानंतरही जिल्हा परिषद, महापालिकांसह इतर खासगी शाळांमध्ये अग्निशमन यंत्रणा बसविण्यात आलेली नाही. महाविद्यालयांमध्ये अग्निशमन बंब बसविले असले तरी ते केवळ शोभेची वस्तू ठरले आहेत. उलटपक्षी नव्याने निर्मित शाळा-महाविद्यालयांमध्ये सुसज्ज अग्निशमन यंत्रणा बसविण्यात आली आहे. काही शाळा, महाविद्यालयांमध्ये लावलेली अग्निशमन यंत्रणा कालबाह्य झाली असताना ती पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी संबंधितांकडून पुढाकार घेतला जात नाही, हे वास्तव आहे. राष्ट्रीय इमारत कायद्यानुसार शाळा, महाविद्यालयांमध्ये अग्निशमन यंत्रणा अनिवार्य आहे. मात्र, या कायद्याला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा अपवाद आहेत. सन २००८ नंतर बांधकाम झालेल्या शाळा-महाविद्यालयांच्या इमारतीत अग्निशमन यंत्रणा नसेल, तर अशा शाळा-महाविद्यालयांना अग्निशमन विभागाने नोटीस बजावून अग्निशमन यंत्रणा बसविण्याची कार्यवाही करणे अपेक्षित आहे. मात्र, आग लागल्यानंतरच प्रशासनाला जाग येते, हा आजतागायतचा अनुभव आहे. शाळा, महाविद्यालयांच्या इमारतीत अग्निशमन यंत्रणा असल्याचे प्रतिज्ञापत्र संस्थाचालक, मुख्याध्यापक अथवा प्राचार्यांना शिक्षण विभाग, अग्निशमन विभागाकडे सादर करणे आवश्यक आहे. परंतु बहुतांश शाळा, महाविद्यालयांमध्ये अद्याप प्रवेश प्रक्रियाच सुरू असल्याने अग्निशमन यंत्रणेकडे दुर्लक्ष केले जात आहे. जिल्हा परिषदेच्या १६०२, तर महापालिकांच्या ६६ प्राथमिक व माध्यमिक शाळा आहेत. यापैकी बोटावर मोजण्याइतक्याच शाळांमध्ये अग्निशमन यंत्रणा आहे. शहरातील नामांकित शाळा-महाविद्यालयांमध्ये मात्र अग्निशमन यंत्रणा सुसज्ज असल्याचे ‘लोकमत’च्या प्रत्यक्ष पाहणीदरम्यान दिसून आले.न्यायालयाचे निर्देश गुंडाळलेसन २००४ साली तामिळनाडूच्या कुंभकोणम् येथे शाळेला आग लागल्याने ९४ मुलांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यानंतर शाळा, महाविद्यालयांमध्ये अग्निशमन यंत्रणेचा प्रश्न ऐरणीवर आला. यासंबंधी सन २००९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने शासकीय तसेच खासगी शाळा-महाविद्यालयांमध्ये अग्निशमन साधने आणि व्यवस्थेसंदर्भात राज्य शासनाला निर्देश देण्यात आले होते. त्याअनुषंगाने सर्वच शाळा, महाविद्यालयांमध्ये अग्निशमन सुरक्षा यंत्रणा बसविणे बंधनकारक आहे. मात्र, जिल्हाभरात अग्निशमन सुरक्षा यंत्रणेचा बोजवारा उडाला आहे.अग्निशमन सयंत्र बसविण्यात आले आहे. मात्र, अग्निशमन साहित्य यंत्राची कालमर्यादा रविवारी संपली आहे. ते पुन्हा कार्यान्वित केले जाईल. विद्यार्थी संख्येनुसार साहित्य उपलब्ध आहेत.- स्नेहल विरूळकर,मुख्याध्यापिका, आदर्श प्राथामिक शाळा