शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

शाळा-महाविद्यालये आजपासून सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2022 05:01 IST

कोरोना संसर्ग व ओमायक्रॉनचे संकट कमी होत असल्याने शाळा, महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, पहिली ते चाैथीपर्यंत ऑफलाईन शिक्षण बंद असणार आहे. परंतु, ऑनलाईन शिक्षणास परवानगी देण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नव्या आदेशानुसार जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय, खासगी व्यवस्थापनाच्या पाचवी ते बारावीपर्यंत शाळा, पदवी व पदव्युत्तर ११८ महाविद्यालये कोरोना नियमांचे पालन करून सुरू होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोविड प्रतिबंधक उपाययोजनेच्या अनुषंगाने बंद करण्यात आलेल्या पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा आणि पदवी, पदव्युत्तर महाविद्यालये ७ फेब्रुवारीपासून सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी ५ फेब्रुवारी रोजी आदेश जारी केला आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या गर्दीने गजबजणार आहेत. कोरोना संसर्ग व ओमायक्रॉनचे संकट कमी होत असल्याने शाळा, महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, पहिली ते चाैथीपर्यंत ऑफलाईन शिक्षण बंद असणार आहे. परंतु, ऑनलाईन शिक्षणास परवानगी देण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नव्या आदेशानुसार जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय, खासगी व्यवस्थापनाच्या पाचवी ते बारावीपर्यंत शाळा, पदवी व पदव्युत्तर ११८ महाविद्यालये कोरोना नियमांचे पालन करून सुरू होणार आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाचे आदेश निर्गमित झाले आहेत.

कोरोना नियमांचे पालन अनिवार्यकोविड व ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करावे लागणार आहे. विद्यार्थ्यांना मास्क,शारीरिक अंतर व गर्दी होणार नाही, याची काळजी शाळांना घ्यावी लागणार आहे. महापालिका क्षेत्र, तसेच ग्रामीण भागातील सर्व प्रकारच्या शासकीय, निमशासकीय व खासगी शाळांतील इयत्ता पाचवी ते बारावीचे वर्ग ऑफलाईन सुरू होणार आहे. वर्ग खोल्या सॅनिटाईज कराव्या लागतील. जिल्ह्यात २८९७ शाळांची संख्या असून, ४४९२२६ विद्यार्थी संख्या आहे.

सार्वजनिक सुटी जाहीर, सोमवारी शाळा बंदभारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१( सन १९८१ चाअधिनियम २६) च्या कलम २५ खाली शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवार राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात  आली आहे. त्यामुळे सोमवारी शाळांना सुटी असणार आहे. 

शासनाने शाळा सुरू करण्याचा घेतलेला निर्णय विद्यार्थ्यांसह पालकांच्या आनंदात भर घालणाराच आहे. अनेक दिवसांपासून घरात कंटाळलेल्या विद्यार्थ्यांना मनमोकळेपणाने मित्रांसोबत खेळण्या-बागडण्यास मिळणार असल्याने त्यांची कुपित झालेली मानसिकता बदलेल. जीवनशैलीत बदल होऊन त्याच्यातील उत्साह वाढेल.- डॉ. श्रीकांत देशमुख, मानसोपचारतज्ज्ञ

शाळा सुरू करण्याचा निर्णय अतिशय उत्तम आहे. आता कोरोना असो वा कोणतेही संकट, शाळा बंद करणे हा उपाय नाही. विद्यार्थी अभ्यास विसरले आहेत. आता तर शिक्षक शिकवणे विसरतील, हे वास्तव आहे. त्यामुळे नियमित शाळा सुरू करण्याचा निर्णय विद्यार्थी व एकूणच शैक्षणिक क्षेत्राच्या हिताचा आहे. तो अमलात येत असल्याने आनंद होत आहे.  - वैशाली परतेकी, शिक्षिका.

कोरोनाकाळात शाळा बंद करण्याचा निर्णय हा विद्यार्थ्यांसाठी नुकसानदायक ठरला. प्राथमिक शिक्षक संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानाबाबत अवगत केले होते. याची दखल घेत जिल्हा प्रशासनाने शाळा सुरू करण्याचा घेतलेला निर्णय चांगला आहे. पहिली ते चौथीचे वर्ग लवकरच सुरू व्हावेत.- योगेश पखाले, शिक्षक

 

टॅग्स :Schoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्या