शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

नववी ते बारावीपर्यंत विद्यार्थ्यांचा शाळा, कॉलेजला ‘नो रिस्पॉन्स’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 23:21 IST

शालेय अभ्यासक्रमांपासून विद्यार्थी वंचित राहू नये, यासाठी शासनाने नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. नियमावलींचे पालन करून शिकवणीचे नियोजन केले आहे. मात्र, कोरोनाची संभाव्य भीती लक्षात घेता ९८ टक्के पालकांनी लस नाही, तर शाळा नाही असा निर्णय घेतल्याचे चित्र आहे. शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्गदर्शनानंतरही पालकांनी शाळांना नकारघंटा कायम आहे. शिक्षकांची कोरोना चाचणी झाली, मुलांचे काय, असा सवाल बहुतांश पालकांनी उपस्थित केला आहे.

ठळक मुद्देकोरोनाची धास्ती, १० हजारांचा पल्ला गाठला नाही

  लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासन आदेशानुसार २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंत शाळा सुरू झाल्या. मात्र पाच दिवसांनंतरही १० हजारांच्या पुढे विद्यार्थी शाळेत उपस्थिती दर्शवू शकले नाही. अनुदानित, विनाअनुदानित, जिल्हा परिषद, नगरपंचायतींच्या एकूण ५४८ शाळांमध्ये १.५५ लाख विद्यार्थी संख्या असल्याची नोंद शिक्षण विभागात आहे. कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे शाळांना पालकांचा ‘नो रिस्पॉन्स’ हे वास्तव आहे.शालेय अभ्यासक्रमांपासून विद्यार्थी वंचित राहू नये, यासाठी शासनाने नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. नियमावलींचे पालन करून शिकवणीचे नियोजन केले आहे. मात्र, कोरोनाची संभाव्य भीती लक्षात घेता ९८ टक्के पालकांनी लस नाही, तर शाळा नाही असा निर्णय घेतल्याचे चित्र आहे. शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्गदर्शनानंतरही पालकांनी शाळांना नकारघंटा कायम आहे. शिक्षकांची कोरोना चाचणी झाली, मुलांचे काय, असा सवाल बहुतांश पालकांनी उपस्थित केला आहे. जीवापेक्षा शिक्षण मोठे नाही, अशा अनेक पालकांनी ‘लोकमत’कडे भावना व्यक्त केल्या आहेत. मुलांना कोरोनाची लागण झाल्यास कुटुंबीयांच्या आराेग्याची काळजी कोण घेणार, असा सूर पालकांमधून उमटत आहे. लस आल्याशिवाय मुलांना शाळेत पाठविणार नाही, असा निर्णय वीरेंद्र गलफट या पालकाने घेतला आहे. हीच स्थिती शहरासह ग्रामीण भागातील पालकांची आहे. त्यामुळे जिल्हाभरात सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस शाळा सुरू होऊनही विद्यार्थी संख्येने १० हजारांचा आकडा पार केलेला नाही, असे उपस्थितीहून दिसून येते. नववी ते बारावीपर्यत महापालिकेच्या माध्यमिक सहा शाळा असून, एकूण ४५० विद्यार्थ्यांपैकी दरदिवशी १४० ते १५० विद्यार्थी उपस्थित होते, अशी माहिती महापालिका शिक्षणाधिकारी अब्दूल राजीक यांनी दिली.  

टॅग्स :SchoolशाळाCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या