अद्यापही मेळघाटसह अन्य तालुक्यांतील ६२७ बस बंद
अमरावती : कोरोना संसर्गामुळे बंद असलेल्या एसटी बस सुरू करण्यात आल्या. जिल्ह्यात शाळा सुरू झाल्या. पण, ग्रामीण भागातील अनेक बसफेऱ्या अद्यापही सुरू केलेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
कोरोनापूर्वी जिल्ह्यातील आठ आगारांतून किमान २ हजार ४९३ बस धावत होत्या. सद्यस्थितीत १ हजार ८६६ बसफेऱ्या सुरू आहेत, तर अद्यापही ६२७ बसफेऱ्या बंद आहेत. या बसच्या भरवशावर असलेल्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ज्या पालकांकडे आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्याची व्यवस्था आहे, तेच पाल्य शाळेत उपस्थित राहत आहेत. पण, ज्यांच्याकडे व्यवस्थाच नाही, त्यांचे मात्र नुकसान होत आहे. धारणी, चिखलदरा, चांदूर रेल्वे व इतर काही तालुक्यांमधील अनेक बसफेऱ्या विद्यार्थी पास काढल्या गेल्या नसल्याने व प्रवाशांकडून प्रतिसाद कमी असल्याने बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
बॉक्स
कोरोनाआधी किती बस धावत होत्या?
जिल्ह्यात कोरोना संसर्गाआधी एकूण २४९३ बस धावत होत्या. कोरोनानंतर १८६६ बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. मानव विकास मिशनच्या जिल्ह्यात धारणी व चिखलदरा या दोन तालुक्यांत ११ बस आहेत. या बस सोडल्या जात असल्या तरी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद फारसा नाही.
बॉक्स
या मार्गावर नाही एकही फेरी
लॉकडाऊनपूर्वी २४९३ बस सुरू होत्या. सध्या १८३३ फेऱ्या सुरू आहेत. त्यामध्ये आठ आगारांचा समावेश आहे. मात्र, चांदूर रेल्वे तालुक्यासह परतवाडा व अन्य आगारांतून विविध मार्गांवर सोडल्या जाणाऱ्या ६२७ फेऱ्या अद्याप सुरू झालेल्या नाहीत.
कोट
शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र, शाळेत जाण्या-येण्यासाठी एसटी बस बंद असल्याने गैरसोईचा सामना करावा लागत आहे. रस्ता खराब असल्याने बस बंद असल्याचे सांगितले जाते.
- चेतन हरसुले, विद्यार्थी, सलोना
कोट
आम्हाला शाळेमध्ये बाहेरगावी जाण्यासाठी दळणवळणाच्या पुरेशा सुविधा नाहीत. ज्यांच्याकडे वाहनांची सुविधा आहे, ती मुले पालकांच्या मदतीने मी शाळेत जाऊ शकतात. परंतु, गरीब मुलांचे मात्र त्यामुळे बसेस सुरू करणे गरजेचे आहे.
- चंचल खडके, विद्यार्थिनी, मोथा
बॉक्स
जिल्ह्यात सुरू झालेल्या शाळांची संख्या
२४९६
विद्यार्थी संख्या
पाचवी ते आठवी १७७८२१
नववी ते बारावी १५५५१८
कोट
शासनाच्या सूचनेप्रमाणे जिल्ह्यात पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. त्याची दखल घेऊन एसटी महामंडळाने बसफेऱ्या वाढविल्या आहेत. मागणीनुसार आणखी गाड्या सोडण्यात येत आहेत. त्याबाबत सूचना दिल्या आहेत. मात्र, अनेक विद्यार्थ्यांनी पासचा वापर केलेला नाही. ही संख्या वाढणे गरजेचे आहे
- श्रीकांत गभणे, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ