शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
3
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
4
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
5
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
6
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
7
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
8
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
9
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
10
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
11
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
12
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
13
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
14
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
15
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
16
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
17
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
18
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
19
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
20
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?

शाळा सुरू, एसटी बंद, विद्यार्थ्यांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:14 IST

अद्यापही मेळघाटसह अन्य तालुक्यांतील ६२७ बस बंद अमरावती : कोरोना संसर्गामुळे बंद असलेल्या एसटी बस सुरू करण्यात आल्या. जिल्ह्यात ...

अद्यापही मेळघाटसह अन्य तालुक्यांतील ६२७ बस बंद

अमरावती : कोरोना संसर्गामुळे बंद असलेल्या एसटी बस सुरू करण्यात आल्या. जिल्ह्यात शाळा सुरू झाल्या. पण, ग्रामीण भागातील अनेक बसफेऱ्या अद्यापही सुरू केलेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

कोरोनापूर्वी जिल्ह्यातील आठ आगारांतून किमान २ हजार ४९३ बस धावत होत्या. सद्यस्थितीत १ हजार ८६६ बसफेऱ्या सुरू आहेत, तर अद्यापही ६२७ बसफेऱ्या बंद आहेत. या बसच्या भरवशावर असलेल्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ज्या पालकांकडे आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्याची व्यवस्था आहे, तेच पाल्य शाळेत उपस्थित राहत आहेत. पण, ज्यांच्याकडे व्यवस्थाच नाही, त्यांचे मात्र नुकसान होत आहे. धारणी, चिखलदरा, चांदूर रेल्वे व इतर काही तालुक्यांमधील अनेक बसफेऱ्या विद्यार्थी पास काढल्या गेल्या नसल्याने व प्रवाशांकडून प्रतिसाद कमी असल्याने बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

बॉक्स

कोरोनाआधी किती बस धावत होत्या?

जिल्ह्यात कोरोना संसर्गाआधी एकूण २४९३ बस धावत होत्या. कोरोनानंतर १८६६ बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. मानव विकास मिशनच्या जिल्ह्यात धारणी व चिखलदरा या दोन तालुक्यांत ११ बस आहेत. या बस सोडल्या जात असल्या तरी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद फारसा नाही.

बॉक्स

या मार्गावर नाही एकही फेरी

लॉकडाऊनपूर्वी २४९३ बस सुरू होत्या. सध्या १८३३ फेऱ्या सुरू आहेत. त्यामध्ये आठ आगारांचा समावेश आहे. मात्र, चांदूर रेल्वे तालुक्यासह परतवाडा व अन्य आगारांतून विविध मार्गांवर सोडल्या जाणाऱ्या ६२७ फेऱ्या अद्याप सुरू झालेल्या नाहीत.

कोट

शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र, शाळेत जाण्या-येण्यासाठी एसटी बस बंद असल्याने गैरसोईचा सामना करावा लागत आहे. रस्ता खराब असल्याने बस बंद असल्याचे सांगितले जाते.

- चेतन हरसुले, विद्यार्थी, सलोना

कोट

आम्हाला शाळेमध्ये बाहेरगावी जाण्यासाठी दळणवळणाच्या पुरेशा सुविधा नाहीत. ज्यांच्याकडे वाहनांची सुविधा आहे, ती मुले पालकांच्या मदतीने मी शाळेत जाऊ शकतात. परंतु, गरीब मुलांचे मात्र त्यामुळे बसेस सुरू करणे गरजेचे आहे.

- चंचल खडके, विद्यार्थिनी, मोथा

बॉक्स

जिल्ह्यात सुरू झालेल्या शाळांची संख्या

२४९६

विद्यार्थी संख्या

पाचवी ते आठवी १७७८२१

नववी ते बारावी १५५५१८

कोट

शासनाच्या सूचनेप्रमाणे जिल्ह्यात पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. त्याची दखल घेऊन एसटी महामंडळाने बसफेऱ्या वाढविल्या आहेत. मागणीनुसार आणखी गाड्या सोडण्यात येत आहेत. त्याबाबत सूचना दिल्या आहेत. मात्र, अनेक विद्यार्थ्यांनी पासचा वापर केलेला नाही. ही संख्या वाढणे गरजेचे आहे

- श्रीकांत गभणे, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ