शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शाळेने ५० टक्के फीसाठी पाठविले घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 22:22 IST

वर्षारंभीच शहरातील सिकची कॉन्व्हेंटने विद्यार्थ्यांना ५० टक्के फी भरण्याचे बजावत घराकडे रवाना केले. नव्या वर्षाचा आनंद सर्वत्र साजरा होत असताना, या चिमुकल्यांना वर्षाची सुरुवात दु:खद अनुभव देऊन गेली आहे.

ठळक मुद्देपालकांचा आरोप : कॉन्व्हेंटच्या अध्यक्षाचा असाही कारभार

लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : वर्षारंभीच शहरातील सिकची कॉन्व्हेंटने विद्यार्थ्यांना ५० टक्के फी भरण्याचे बजावत घराकडे रवाना केले. नव्या वर्षाचा आनंद सर्वत्र साजरा होत असताना, या चिमुकल्यांना वर्षाची सुरुवात दु:खद अनुभव देऊन गेली आहे.नवीन वर्षाला शाळा-महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचा गिफ्ट वस्तू देऊन चिमुकल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले जाते व त्यांना नवीन वर्ष सुखाचे जावो, यासाठी शुभेच्छा दिल्या जातात. मात्र, तसे न होता चिमुकले विद्यार्थी हे शाळेमध्ये पोहोचताच त्यांना शैक्षणिक फी न भरल्यामुळे गेटच्या बाहेरूनच घरी पाठवून दिले गेले. सदरची बाब पालकांच्या लक्षात येताच त्यांनी शाळेमध्ये धाव घेतली. मात्र, तिथे कुणीही उपस्थित नव्हते. यानंतर पालकांनी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. मुख्याध्यापक दीपाली टाले यांनी हजर होत, आम्हाला वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करायचे आहे, असे सांगितले. या प्रकाराने नवीन वर्षाला विविध वस्त्र परिधान करून शाळेत पोहोचणाऱ्या विद्यार्थ्यांचा मात्र हिरमोड झाला.संस्थेच्या अध्यक्षांच्या मनमानी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या मुद्द्यावर चर्चेतून तोडगा काढता आला असता, अशा प्रतिक्रिया काही संतप्त नागरिकांनी याप्रसंगी मुख्याध्यापक टाले यांच्याकडे व्यक्त केल्या.दुपारचे सत्र ठेवले बंदकाही पालक हे शिक्षकांशी वादविवाद करीत होते. त्यामुळे प्रकरण आपल्यावर शेकणार, हे लक्षात येताच शिक्षकांनी नोटीस बोर्डवर सूचना लिहून दुपारची शाळा बंद ठेवत असल्याचे नमूद करून सर्व विद्यार्थ्यांना घरी पाठवून दिले. विद्यार्थ्यांनी सोबत आणलेला जेवणाचा डबा हा शाळेच्या बाहेरच खाऊन घेतला. हे दृश्य पाहून पालकांंनी पुन्हा शाळेच्या आवारात गर्दी केली .शिवसेनेचा इशाराशिवसेना पदाधिकाºयांना ही बाब लक्षात येताच त्यांनी शाळेमध्ये जाऊन सदर शिक्षकांशी चर्चा केली. यावेळी गटशिक्षणाधिकाºयांना बोलावून घेण्यात आले. संस्थेच्या अध्यक्षांवर कारवाई करा, अन्यथा आम्ही शाळा बंद पाडू, असा इशारा शिवसेना तालुकाप्रमुख गोपाल अरबट तसेच रवि कोरडे, सतीश साखरे आदी पालकांनी दिली. यावेळी गटविकास अधिकारी सुधीर अरबट यांनासुद्धा बोलावण्यात आले होते.दरम्यान, गटशिक्षणाधिकाºयांनी विचारणा केली असता, जोपर्यंत पालक फी भरत नाहीत तोपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश नाही, या भूमिकेवर संस्थाध्यक्ष ठाम होते.आम्ही नवीन वर्षदिनी विद्यार्थ्यांना अतिशय उत्साहाने शाळेमध्ये पाठविले होते. मात्र, शिक्षकांनी शैक्षणिक फी न भरल्यामुळे त्यांना घरी परत पाठवून दिले. या घटनेने विद्यार्थ्यांच्या मनावर आघात झाला आहे. याला जबाबदार कोण, याचे उत्तर मिळाले पाहिजे.- राजेश श्रीरावपालकवारंवार सूचना देऊनही पालक शैक्षणिक शुल्काचा भरणा करीत नाहीत. नियमांची पायमल्ली होत असल्याने आज आम्हाला नाइलाजाने हे पाऊल उचलावे लागले. पालकांना दोन दिवसांची मुदत देत आहोत.- अविनाश गायगोलेअध्यक्ष, शाळा समितीसंस्थेच्या अध्यक्षांशी दूरध्वनीद्वारे माहिती घेतली असता, त्यांना पालकसभा बोलावण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, त्यांनी पालकसभा बोलावणार नाही व जोपर्यंत पालक पैसे भरत नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेमध्ये प्रवेश नाही, असे उद्धट भाषेत माझ्याशी बोलणे केले. सदर संस्थेवर पत्रव्यवहार करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल.- प्रकाश घाटे, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, दर्यापूर