शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
2
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
3
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
4
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
5
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
6
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
7
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
8
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
9
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
10
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
11
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
12
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
13
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
14
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
15
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
16
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...
17
Gold Silver Price 22 August: सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
18
या ₹15 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरला 5 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल! पण कारण काय?
19
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
20
WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकालाच 'हे' सीक्रेट सिक्युरिटी फीचर्स माहीत असायला हवेत!

दहावीच्या निकालास उशीर झाल्यास शाळाच जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:09 IST

राज्य शिक्षण मंडळाच्या पोर्टलवर गुण पाठविण्याची व्यवस्था, २ जुलैनंतरच कळेल - किती टक्के शाळांनी पूर्ण केला टप्पा? अमरावती : ...

राज्य शिक्षण मंडळाच्या पोर्टलवर गुण पाठविण्याची व्यवस्था, २ जुलैनंतरच कळेल - किती टक्के शाळांनी पूर्ण केला टप्पा?

अमरावती : यंदा दहावीच्या परीक्षा न घेता थेट पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, दहावीच्या विद्यार्थ्यांना कशाप्रकारे गुणदान करावे, याचे निकष, नियमावली ठरली आहे. त्याकरिता राज्य शिक्षण मंडळाने प्रत्येक शाळेला पोर्टलवर लिंकद्वारे गुण पाठविण्याची व्यवस्था केली आहे. मात्र, काही शाळांनी दहावीच्या विद्यार्थ्यांचे गुण पाठविले नाहीत. असे असले तरी २ जुलैनंतरच किती शाळांनी ऑनलाईन गुण पाठविले वा नाही, हे स्पष्ट होईल. तथापि, दहावीच्या निकालास उशीर झाल्यास शाळाच जबाबदार असतील, हे वास्तव आहे.

कोरोनामुळे शैक्षणिक क्षेत्रावर विपरीत परिणाम झाला आहे. परीक्षाविनाच विद्यार्थ्यांची ‘ढकलगाडी’ सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. परंतु, शासननिर्देशांनुसार राज्य शिक्षण मंडळाने दहावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यासाठी शाळांना ऑनलाईन गुण पाठविण्याचे कळविले आहे. मात्र, अमरावती जिल्ह्यात ६५ टक्के शाळांनी पोर्टलवर गुणदान पाठविण्याचा टप्पा पूर्ण केल्याची माहिती आहे.

---------------------

६५ टक्के शाळांनीच टप्पा पूर्ण केला

---------

- जिल्ह्यातील दहावीचे विद्यार्थी : ४०६६३

मुले : २७३३५

मुली : २३३२८

------------------

दहावीच्या विद्यार्थ्यांचे गुण शाळांना थेट ऑनलाईन पाठवावे लागतात. त्यामुळे तूर्त किती शाळांनी गुणदान केले, हे सध्या सांगता येणार नाही. मात्र, राज्य शिक्षण मंडळाकडून शाळांना गुण पोर्टलवर पाठविण्यासाठी वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. त्याकरिता २ जुलैपर्यंत कालावधी ठरविण्यात आला आहे.

- तेजराव काळे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), अमरावती.

-------------------

गुणदानाबाबत शिक्षकांच्या अडचणी

ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची कागदापत्रे मिळण्यास उशीर लागत आहे. काही वेळा तांत्रिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. असे असले तरी २ जुलैपर्यंत दहावीच्या विद्यार्थ्यांचे गुणदान बोर्डाकडे पाठविले जाईल.

- एन.एम. तायडे

--------------------

आतापर्यंत ६५ टक्क्यांवर विद्यार्थ्यांच्या गुणदानाची प्रक्रिया पूर्णत्वास आली आहे. पुढील तीन दिवसांत ती वेगाने करण्यात येणार आहे. पोर्टलवर गुणदान करताना फारशी अडचण येत नाही. मात्र, अन्य शाळांतील प्रवेशित विद्यार्थ्यांबाबत समस्या उद्‌भवत आहे.

- सुरेश मोलके

----------------

१) दहावीची परीक्षा न होता थेट गुणदान मिळून पुढील वर्गात प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे कॉपीबहाद्दर विद्यार्थ्यांचे फावले आहे.

२) वर्षभर ऑनलाईन शिक्षण घेऊन दहावीच्या परीक्षांची तयारी चालविली. मात्र, परीक्षा न घेता निकाल लागणार असल्याने गुणवंत विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे.

३) दहावीची परीक्षा झाली नाही. आता अकरावी प्रवेशासाठी सीईटीच्या धर्तीवर परीक्षा घेण्यात येणार असल्याने आतापासूनच विद्यार्थी तयारीला लागले आहेत.