शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
2
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
3
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
4
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
5
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
6
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
7
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
8
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
9
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
10
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
11
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
12
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
13
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
14
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
15
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट, जम्मूपासून जैसलमेरपर्यंत मोठ्या घडामोडी
16
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
17
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
18
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
19
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
20
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी

दहावीच्या निकालास उशीर झाल्यास शाळाच जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:09 IST

राज्य शिक्षण मंडळाच्या पोर्टलवर गुण पाठविण्याची व्यवस्था, २ जुलैनंतरच कळेल - किती टक्के शाळांनी पूर्ण केला टप्पा? अमरावती : ...

राज्य शिक्षण मंडळाच्या पोर्टलवर गुण पाठविण्याची व्यवस्था, २ जुलैनंतरच कळेल - किती टक्के शाळांनी पूर्ण केला टप्पा?

अमरावती : यंदा दहावीच्या परीक्षा न घेता थेट पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, दहावीच्या विद्यार्थ्यांना कशाप्रकारे गुणदान करावे, याचे निकष, नियमावली ठरली आहे. त्याकरिता राज्य शिक्षण मंडळाने प्रत्येक शाळेला पोर्टलवर लिंकद्वारे गुण पाठविण्याची व्यवस्था केली आहे. मात्र, काही शाळांनी दहावीच्या विद्यार्थ्यांचे गुण पाठविले नाहीत. असे असले तरी २ जुलैनंतरच किती शाळांनी ऑनलाईन गुण पाठविले वा नाही, हे स्पष्ट होईल. तथापि, दहावीच्या निकालास उशीर झाल्यास शाळाच जबाबदार असतील, हे वास्तव आहे.

कोरोनामुळे शैक्षणिक क्षेत्रावर विपरीत परिणाम झाला आहे. परीक्षाविनाच विद्यार्थ्यांची ‘ढकलगाडी’ सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. परंतु, शासननिर्देशांनुसार राज्य शिक्षण मंडळाने दहावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यासाठी शाळांना ऑनलाईन गुण पाठविण्याचे कळविले आहे. मात्र, अमरावती जिल्ह्यात ६५ टक्के शाळांनी पोर्टलवर गुणदान पाठविण्याचा टप्पा पूर्ण केल्याची माहिती आहे.

---------------------

६५ टक्के शाळांनीच टप्पा पूर्ण केला

---------

- जिल्ह्यातील दहावीचे विद्यार्थी : ४०६६३

मुले : २७३३५

मुली : २३३२८

------------------

दहावीच्या विद्यार्थ्यांचे गुण शाळांना थेट ऑनलाईन पाठवावे लागतात. त्यामुळे तूर्त किती शाळांनी गुणदान केले, हे सध्या सांगता येणार नाही. मात्र, राज्य शिक्षण मंडळाकडून शाळांना गुण पोर्टलवर पाठविण्यासाठी वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. त्याकरिता २ जुलैपर्यंत कालावधी ठरविण्यात आला आहे.

- तेजराव काळे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), अमरावती.

-------------------

गुणदानाबाबत शिक्षकांच्या अडचणी

ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची कागदापत्रे मिळण्यास उशीर लागत आहे. काही वेळा तांत्रिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. असे असले तरी २ जुलैपर्यंत दहावीच्या विद्यार्थ्यांचे गुणदान बोर्डाकडे पाठविले जाईल.

- एन.एम. तायडे

--------------------

आतापर्यंत ६५ टक्क्यांवर विद्यार्थ्यांच्या गुणदानाची प्रक्रिया पूर्णत्वास आली आहे. पुढील तीन दिवसांत ती वेगाने करण्यात येणार आहे. पोर्टलवर गुणदान करताना फारशी अडचण येत नाही. मात्र, अन्य शाळांतील प्रवेशित विद्यार्थ्यांबाबत समस्या उद्‌भवत आहे.

- सुरेश मोलके

----------------

१) दहावीची परीक्षा न होता थेट गुणदान मिळून पुढील वर्गात प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे कॉपीबहाद्दर विद्यार्थ्यांचे फावले आहे.

२) वर्षभर ऑनलाईन शिक्षण घेऊन दहावीच्या परीक्षांची तयारी चालविली. मात्र, परीक्षा न घेता निकाल लागणार असल्याने गुणवंत विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे.

३) दहावीची परीक्षा झाली नाही. आता अकरावी प्रवेशासाठी सीईटीच्या धर्तीवर परीक्षा घेण्यात येणार असल्याने आतापासूनच विद्यार्थी तयारीला लागले आहेत.