शहरं
Join us  
Trending Stories
1
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
2
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
3
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
4
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
5
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
6
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
7
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
8
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
9
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
10
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
11
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
12
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
13
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
14
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
15
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
16
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
17
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
18
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
19
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
20
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर

पहिल्याच दिवशी व्हरांड्यात भरली काजलडोहची शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 23:10 IST

शाळेच्या पहिल्या दिवशी राज्यभरात विद्यार्थ्यांचे भरभरून स्वागत करण्यात आले. मेळघाटच्या काजलडोह येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मात्र विद्यार्थ्यांना पहिला दिवस व्हरांड्यातच बसून काढावा लागल्याचे संतापजनक चित्र उघडकीस आले.

ठळक मुद्देबांधकाम विभाग झोपेतच : वर्गखोल्यांमध्ये रेती, माती, निकृष्ट साहित्य; आदिवासी विद्यार्थ्यांची परवड कायम; पालकांमध्ये संताप

नरेंद्र जावरे।लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : शाळेच्या पहिल्या दिवशी राज्यभरात विद्यार्थ्यांचे भरभरून स्वागत करण्यात आले. मेळघाटच्या काजलडोह येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मात्र विद्यार्थ्यांना पहिला दिवस व्हरांड्यातच बसून काढावा लागल्याचे संतापजनक चित्र उघडकीस आले.शाळा दुरुस्तीच्या नावावर कंत्राटदाराने तीन महिन्यांपासून वर्गखोल्यांमध्ये रेती भरून ठेवली आहे. ती बाहेर न काढल्याने आणि बांधकाम अपूर्ण असल्याने आणखीही काही दिवस या मुलांची शाळा अशीच व्हरांड्यात भरणार आहे.काजलडोह येथे इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत शाळा आहे. गतवर्षी डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत मिळालेल्या निधीतून या शाळेची दुरुस्ती करण्यासाठी धारणी उपविभागामार्फत मंजुरी देण्यात आली होती. परंतु, एक वर्ष लोटूनही शाळा भग्नावस्थेत ठेवण्यात आली. जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी या बांधकामाबाबत नेमके काय केले, हे अनुत्तरित आहे.दरम्यान, राज्यभरात प्रवेशोत्सव साजरा होत असताना, आदिवासी मुलांच्याच वाट्याला असे प्रसंग यावेत, याबद्दल पालक व समाजधुरिणांनी संताप व्यक्त केला आहे.सर्व वर्ग एकत्रकाजलडोह येथील वर्गखोल्यांमध्ये शाळा दुरुस्तीच्या नावावर संबंधित कंत्राटदाराने माती, रेती व अन्य निकृष्ट साहित्य टाकून ठेवले. बांधकाम विभागाचे त्याला अभय आहे. २६ जून रोजी शाळा सुरू होणार असल्याचे माहीत असूनही संबंधित विभागाने कंत्राटदाराकडून वेळेपूर्वी शाळेची दुरुस्ती का करून घेतली नाही, याबद्दल पालकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी पहिली ते सातवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना व्हरांड्यात बसावे लागले. सर्व विद्यार्थी एकत्रच धडे गिरवीत असल्याचा अजब प्रकार काजलडोह शाळेत सुरू आहे.बांधकाम विभागावर कारवाईची मागणीजिल्हा परिषदेच्या शाळा उघडण्याची तारीख निश्चित असताना दुरुस्तीच्या नावावर आदिवासी विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार संतापजनक आहे. त्यामुळे संबंधित जिल्हा परिषद बांधकाम विभागाला जबाबदार धरून कारवाई करण्याची मागणी आदिवासी संघटनांनी केली आहे. संबंधित शाळा दुरुस्तीसाठी नदी-नाल्यांची रेती व चुरा वापरण्यात येत आहे व फरशीसुद्धा दुय्यम दर्जाची आहे. यामुळे संबंधित कंत्राटदारावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.