शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

पहिल्याच दिवशी व्हरांड्यात भरली काजलडोहची शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 23:10 IST

शाळेच्या पहिल्या दिवशी राज्यभरात विद्यार्थ्यांचे भरभरून स्वागत करण्यात आले. मेळघाटच्या काजलडोह येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मात्र विद्यार्थ्यांना पहिला दिवस व्हरांड्यातच बसून काढावा लागल्याचे संतापजनक चित्र उघडकीस आले.

ठळक मुद्देबांधकाम विभाग झोपेतच : वर्गखोल्यांमध्ये रेती, माती, निकृष्ट साहित्य; आदिवासी विद्यार्थ्यांची परवड कायम; पालकांमध्ये संताप

नरेंद्र जावरे।लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : शाळेच्या पहिल्या दिवशी राज्यभरात विद्यार्थ्यांचे भरभरून स्वागत करण्यात आले. मेळघाटच्या काजलडोह येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मात्र विद्यार्थ्यांना पहिला दिवस व्हरांड्यातच बसून काढावा लागल्याचे संतापजनक चित्र उघडकीस आले.शाळा दुरुस्तीच्या नावावर कंत्राटदाराने तीन महिन्यांपासून वर्गखोल्यांमध्ये रेती भरून ठेवली आहे. ती बाहेर न काढल्याने आणि बांधकाम अपूर्ण असल्याने आणखीही काही दिवस या मुलांची शाळा अशीच व्हरांड्यात भरणार आहे.काजलडोह येथे इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत शाळा आहे. गतवर्षी डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत मिळालेल्या निधीतून या शाळेची दुरुस्ती करण्यासाठी धारणी उपविभागामार्फत मंजुरी देण्यात आली होती. परंतु, एक वर्ष लोटूनही शाळा भग्नावस्थेत ठेवण्यात आली. जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी या बांधकामाबाबत नेमके काय केले, हे अनुत्तरित आहे.दरम्यान, राज्यभरात प्रवेशोत्सव साजरा होत असताना, आदिवासी मुलांच्याच वाट्याला असे प्रसंग यावेत, याबद्दल पालक व समाजधुरिणांनी संताप व्यक्त केला आहे.सर्व वर्ग एकत्रकाजलडोह येथील वर्गखोल्यांमध्ये शाळा दुरुस्तीच्या नावावर संबंधित कंत्राटदाराने माती, रेती व अन्य निकृष्ट साहित्य टाकून ठेवले. बांधकाम विभागाचे त्याला अभय आहे. २६ जून रोजी शाळा सुरू होणार असल्याचे माहीत असूनही संबंधित विभागाने कंत्राटदाराकडून वेळेपूर्वी शाळेची दुरुस्ती का करून घेतली नाही, याबद्दल पालकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी पहिली ते सातवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना व्हरांड्यात बसावे लागले. सर्व विद्यार्थी एकत्रच धडे गिरवीत असल्याचा अजब प्रकार काजलडोह शाळेत सुरू आहे.बांधकाम विभागावर कारवाईची मागणीजिल्हा परिषदेच्या शाळा उघडण्याची तारीख निश्चित असताना दुरुस्तीच्या नावावर आदिवासी विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार संतापजनक आहे. त्यामुळे संबंधित जिल्हा परिषद बांधकाम विभागाला जबाबदार धरून कारवाई करण्याची मागणी आदिवासी संघटनांनी केली आहे. संबंधित शाळा दुरुस्तीसाठी नदी-नाल्यांची रेती व चुरा वापरण्यात येत आहे व फरशीसुद्धा दुय्यम दर्जाची आहे. यामुळे संबंधित कंत्राटदारावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.