शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
5
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
6
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
7
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
8
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
9
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
10
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
11
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
12
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
13
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
14
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
15
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
17
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
18
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
19
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

शाळेत शिपाई नाही, विद्यार्थीच करतात झाडलोट

By admin | Updated: December 22, 2016 00:40 IST

सर्व शिक्षा अभियानांतर्गत प्राथमिक शिक्षण सक्तीचे केलेले असले तरी तालुकयातील एकाही शाळेत शिपाई नसल्याने त्यांची कामे विद्यार्थ्यांना करावी लागत आहे.

सक्तीच्या शिक्षणाची माती : मूळ उद्देशालाच हरताळ, नियमात बदल हवा सुनील देशपांडे अचलपूर सर्व शिक्षा अभियानांतर्गत प्राथमिक शिक्षण सक्तीचे केलेले असले तरी तालुकयातील एकाही शाळेत शिपाई नसल्याने त्यांची कामे विद्यार्थ्यांना करावी लागत आहे. तर लिपिक नसल्याने कारकुनी कामे शिक्षकांना करावी लागत आहेत. त्यामुळे सक्तीचे शिक्षण कुणासाठी आणि कशासाठी असा प्रश्न उपस्थित होत आहे. केंद्र शासनाने सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केला असला तरी अचलपूर तालुक्यातील एकाही शाळेत शिपाई नाही. अनेक ठिकाणी तर विद्यार्थीच शाळा उघडतात. घंटा वाजवितात. शाळा स्वच्छ करतात, वर्गखोल्यांची झाडलोट करतात, असे चित्र आहे. तालुक्यात जि.प.च्या १२९ शाळा असून त्यात अंदाजे १८ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यातील बहुतांश विद्यार्थी गोरगरीब, शेतमजूर, अल्पभूधारक शेतकऱ्यांची मुले आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या नागरिकांच्या मुलांवर शिपायांची कामे करायची वेळ आली आहे. हेच का गोरगरीबांसाठी सक्तीचे शिक्षण, असे जनतेचे म्हणणे आहे. एकीकडे शाळांच्या स्वच्छतेसाठी कर्मचारी नाहीत आणि दुसरीकडे कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी विविध अटी शासनाने लादलेल्या असताना देखील ही स्थिती आहे. अशा स्थितीत शाळेत विद्यार्थी येणार कोठून आणि आले तरी ते नियमानुसार आखलेल्या आकड्यांच्या चौकटीत बसतील काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. प्राथमिक शिक्षणात संबंधित विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया मजबुत व्हावयास हवा. परंतु, तसे होताना दिसत नाही. १२ ते १५ वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी मोठी गर्दी राहात असे. पण, मागील काही वर्षांपासून जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या रोडावली आहे. ती वाढावी यासाठी शासनाकडून वेळोवेली शिक्षणाशीी संबंधीत योजना राबविल्या जात आहेत. प्राथमिक शाळा सेवाशर्ती नियमावली १९८१ मध्ये वर्ग १ ते ४ साठी केवळ चार शिक्षकच मंजूर करण्यात आले आहेत. ज्या शाळेत ५०० पेक्षा कमी विद्यार्थी असतील तेथे विद्यार्थ्यांच्या संरक्षणाची कोणतीच सोय नाही. या शाळेच्या आत व बाहेर स्वच्छतेसाठी, झाडलोट करण्यासाठी तसेच बालकांशी निगडित समस्यांसाठी शिपाईच काय तर लिपिकाचीसुद्धा तरतूद नाही. ५०० पेक्षा जास्त विद्यार्थी असतील तर मात्र शिपायाची सोय असते. म्हणजेच कमी विद्यार्थी असल्यास शाळा स्वच्छ राहिली काय किंवा नाही, अथवा शिक्षकांवर लिपिकाच्या कामाचा बोजा पडला तरी चालेल, अशी शासनाची भूमिका आहे. यामुळे विद्यार्थ्यांचेच शैक्षणिक नुकसान होत आहे. शासनाने ही बाब गांभीर्याने घेऊन उपाययोजना करावी, अशी मागणी आहे. मागणीला जोर वर्ग एक ते चारसाठी विनाअट माध्यमिक शाळांप्रमाणे प्राथमिक शाळेलाही स्वतंत्र मुख्याध्यापक, कार्यालयीन कामासाठी कनिष्ठ लिपिक व शिपाई नियुक्त करावा, अशी मागणी जोर धरत आहे. ज्या शाळांची पटसंख्या १००च्या वर आहे त्या शाळांमध्ये शिपाई व लिपिक ही दोन पदे आवश्यकत आहेत. झाडलोट किेंवा शिपायाची कामे आम्ही किंवा शिक्षक विद्यार्थ्यांकडून करून घेत नाही. खिचडी शिजविणाऱ्यांना मोबदला देऊन ती कामे करावी लागतात. - रावसाहेब मोरे, तालुका, कास्ट्राईब शिक्षक संघटना