शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा निर्णय न झाल्याने शाळा संभ्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:12 IST

अमरावती : दरवर्षी मार्च महिन्यांत पहिली ते नववीपर्यंत इयत्तांचे पाठ्यक्रम पूर्ण होऊन त्यांचे मूल्यमापन केले जाते. मात्र, यंदाचे ...

अमरावती : दरवर्षी मार्च महिन्यांत पहिली ते नववीपर्यंत इयत्तांचे पाठ्यक्रम पूर्ण होऊन त्यांचे मूल्यमापन केले जाते. मात्र, यंदाचे शैक्षणिक वर्ष संपत आले तरी शालेय शिक्षण विभागाकडून अद्याप मूल्यमापन योजनेविषयी निर्णय जाहीर झालेला नाही. त्यामुळे शाळा शिक्षकांमध्ये संभ्रम आहे.

ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा कशा घ्यायच्या याबाबतचे नियोजन अद्याप केलेले नाही. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये इयत्ता पहिली ते चौथीचे वर्षे प्रत्यक्ष भरलेच नाहीत. तसेच २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवीते आठवीचे वर्ग सुरू करण्यात परवानगी देण्यात आली होती. मात्र, त्यामध्येही विद्यार्थ्यांची उपस्थिती केवळ ५० टक्केच होती. शाळेत विद्यार्थी संख्या वाढत असतांनाच कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाला. त्यामुळे अवघ्या दिड महिन्यातच शाळा बंद कराव्या लागल्या. त्यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करायला वेळ मिळाला नाही. परीक्षांच्या नियोजनास मूल्यमापन पद्धतीवरही शासनाने निर्णय घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीकडून करण्यात आली आहे.

बॉक्स

२६जून २०२१ पासून म्हणजे शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवसापासून पहिली ते चौथीचे विद्यार्थी अद्यापपर्यंत शाळेत आलेले नाही. पाचवी ते नववीचे विद्यार्थी केवळ दीड महिना शाळेत उपस्थित राहीले. त्यांची उपस्थिती फक्त ५० टक्के होती. त्यामुळे शिक्षकांना अध्यापनाचं काम करता आले नाही. मात्र ऑनलाईन पद्धतीने काही प्रमाणात विद्यार्थ्यांना अध्यापन केलेले आहे. काही शाळेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन स्वाध्याय दिले. त्यांची तपासणी देखील केली आहे. त्या आधारावर अंतर्गत मूल्यमापन करून निकाल घोषित करण्याचे प्रशासनाने आदेशित करावे.अशी मागणी प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे.