शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा निर्णय न झाल्याने शाळा संभ्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:12 IST

अमरावती : दरवर्षी मार्च महिन्यांत पहिली ते नववीपर्यंत इयत्तांचे पाठ्यक्रम पूर्ण होऊन त्यांचे मूल्यमापन केले जाते. मात्र, यंदाचे ...

अमरावती : दरवर्षी मार्च महिन्यांत पहिली ते नववीपर्यंत इयत्तांचे पाठ्यक्रम पूर्ण होऊन त्यांचे मूल्यमापन केले जाते. मात्र, यंदाचे शैक्षणिक वर्ष संपत आले तरी शालेय शिक्षण विभागाकडून अद्याप मूल्यमापन योजनेविषयी निर्णय जाहीर झालेला नाही. त्यामुळे शाळा शिक्षकांमध्ये संभ्रम आहे.

ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा कशा घ्यायच्या याबाबतचे नियोजन अद्याप केलेले नाही. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये इयत्ता पहिली ते चौथीचे वर्षे प्रत्यक्ष भरलेच नाहीत. तसेच २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवीते आठवीचे वर्ग सुरू करण्यात परवानगी देण्यात आली होती. मात्र, त्यामध्येही विद्यार्थ्यांची उपस्थिती केवळ ५० टक्केच होती. शाळेत विद्यार्थी संख्या वाढत असतांनाच कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाला. त्यामुळे अवघ्या दिड महिन्यातच शाळा बंद कराव्या लागल्या. त्यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करायला वेळ मिळाला नाही. परीक्षांच्या नियोजनास मूल्यमापन पद्धतीवरही शासनाने निर्णय घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीकडून करण्यात आली आहे.

बॉक्स

२६जून २०२१ पासून म्हणजे शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवसापासून पहिली ते चौथीचे विद्यार्थी अद्यापपर्यंत शाळेत आलेले नाही. पाचवी ते नववीचे विद्यार्थी केवळ दीड महिना शाळेत उपस्थित राहीले. त्यांची उपस्थिती फक्त ५० टक्के होती. त्यामुळे शिक्षकांना अध्यापनाचं काम करता आले नाही. मात्र ऑनलाईन पद्धतीने काही प्रमाणात विद्यार्थ्यांना अध्यापन केलेले आहे. काही शाळेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन स्वाध्याय दिले. त्यांची तपासणी देखील केली आहे. त्या आधारावर अंतर्गत मूल्यमापन करून निकाल घोषित करण्याचे प्रशासनाने आदेशित करावे.अशी मागणी प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे.