शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
ईशनंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटंबाचा धक्कादायक खुलासा
3
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
4
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
5
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
6
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
7
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
8
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
9
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
10
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
11
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
12
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
13
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
14
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
15
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
16
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
17
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
18
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
19
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
20
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील एक हजारांवर गावांमध्ये शाळेची घंटा वाजणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:10 IST

अमरावती : कोरोनाची परिस्थिती सुधारल्याने राज्य शासनाने शाळा सुरू करण्यास टप्प्याटप्प्याने परवानगी दिली आहे. पहिल्या टप्प्यात कोरोनामुक्त गावांतील ...

अमरावती : कोरोनाची परिस्थिती सुधारल्याने राज्य शासनाने शाळा सुरू करण्यास टप्प्याटप्प्याने परवानगी दिली आहे. पहिल्या टप्प्यात कोरोनामुक्त गावांतील आठवी ते बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत. यासाठी शालेय शिक्षण विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील १६८७ गावांपैकी १५३६ गावे कोरोनामुक्त झाली आहेत. त्यामुळे अशा गावातील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग असलेल्या गावांमध्ये लवकर शाळेची घंटा वाजण्याची शक्यता आहे. शासनाचा हा निर्णयास जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिली, तर साधारणपणे एक हजारांवर गावांमधील शाळांची घंटा वाजू शकते. शाळा बंद असल्यामुळे मुले एक वर्षापासून घरी बसली आहे. त्यामुळे त्यांच्यावर शारीरिक-मानसिक दुष्परिणाम होत आहेत, शिवाय त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ही बाब लक्षात घेता, यासाठी शासनाने कोरोनामुक्त गावांमध्ये इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी संबंधित क्षेत्रातील ग्रामपंचायती व स्थानिक स्वराज्य संस्थांनी शाळेचे वर्ग सुरू करण्याबाबत पालकांशी चर्चा करून ठराव करावा लागणार आहे. शाळा सुरू करताना मुलांना टप्प्याटप्प्याने शाळेत बोलावण्यात यावे, वर्ग अदलाबदलीच्या दिवशी सकाळी, दुपारी ठरावीक विषयासाठी प्राधान्य द्यावे तसेच सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे. एका बेंचवर एकच विद्यार्थी, दोन बेंचमध्ये सहा फूट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त पंधरा ते वीस विद्यार्थी, सतत हात साबणाने धुणे, मास्कचा वापर,कोणती लक्षणे असलेल्या विद्यार्थ्यांना घरी पाठवून लगेच काेरोना चाचणी करून घेणे, संबंधित शाळेतील शिक्षकांची राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच गावात करणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्‍याबाबत दक्षता घ्यावी, शाळा सुरू करण्यापूर्वी व शाळा सुरू झाल्यानंतर आरोग्य स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांबाबत मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असेही शिक्षण विभागाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे शिक्षण विभाग, जिल्हा प्रशासन यासंदर्भात काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बॉक्स

तालुकानिहाय कोरोनामुक्त गावांची संख्या

अमरावती १२९, भातकुली १२३, मोर्शी १०१, वरूड १०६, अंजगाव सुर्जी ८५, अचलपूर ९४, चांदूर रेल्वे ७९, चांदूर बाजार १२७, चिखलदरा १६५, धारणी १५३, दर्यापूर १०५,धामणगाव रेल्वे ८२, तिवसा ६६, नांदगाव खंडेश्वर १२१ याप्रमाणे कोरोनामुक्त गावांची संख्या आहे.

कोट

शिक्षण विभागाने इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याबाबत निर्णय घेतला आहे. मात्र, याकरिता संबंधित ग्रामपंचायतींचा ठराव, पालकांची समंती आवश्यक आहे. वर्ग सुरू करण्याबाबत वरिष्ठांकडून मिळणाऱ्या मार्गदर्शनानुसार पुढील कारवाई केली जाईल.

- अनिल कोल्हे, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक)