शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
2
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
4
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
5
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
6
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
7
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
8
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
9
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
10
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
11
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
12
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
13
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
14
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
15
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
16
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
17
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
18
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
19
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
20
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

टंचाईने ग्रामीण भागाच्या तोंडचे पाणीच पळवले!

By जितेंद्र दखने | Updated: June 7, 2024 20:52 IST

१३ गावांत १७ टँकर, ८३ ठिकाणी ३७ बोअरवेल, ६३ विहिरींचे अधिग्रहण

अमरावती : मेअखेरीस आणि जून महिन्याच्या प्रारंभी जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणी टंचाईची दाहकता वाढली असून, १४ पैकी ११ तालुक्यांत टंचाईची तीव्रता अधिक असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात सूर्य आग ओकत असल्याने पाण्याचे स्रोत आटल्याने पाणीटंचाईची दाहकता वाढली आहे. यामुळे जिल्ह्यातील १३ गावांत १७ खासगी टँकरद्वारे तर ८३ गावांमध्ये ३७ बोअरवेल व ६३ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यामुळे २५ हजारांवर नागरिकांना खासगी टँकर व खासगी अधिग्रहित विहिरींद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून आहेत. 

जिल्ह्यात सूर्य आग ओकत असल्याने पाण्याचे स्त्रोत आटल्याने पाणी टंचाईची दाहकता वाढली आहे. यामुळे जिल्ह्यातील ९६ गावांतील जवळपास ४० हजार नागरिकांना खासगी टँकर व खासगी बोअरवेल आणि अधिग्रहित विहिरींद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून आहेत. परिणामी पाण्यासाठी हजारो ग्रामस्थांना प्रामुख्याने गृहिणींना भटकंती करावी लागत आहे. जिल्ह्यातील दाेन तालुक्यांतील १३ गावांना १७ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापूर, चिखलदरा तालुक्यातील बेला सलोना, मोथा, खडीमल, धरमडोह, आकी, बहादरपूर, गौलखेडा बाजार, आलाडोह, लवादा, गवळीढाणा कोरडा, स्कुलढाणा, कालापांढरी आदी गावांमध्ये १७ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. दुसरीकडे १४ पैकी ११ तालुक्यांतील ८३ गावांची तहान ६३ अधिग्रहित विहिरी आणि ३७ बोअरवेलवरून भागविली जात आहे. तालुका- गावे- बोअरवेल, विहीर संख्याअमरावती-१०-०५-०७तिवसा-०७-०१-०५भातकुली-०१-००-०१चांदूर रेल्वे-०३-००-०३धामणगाव रेल्वे-०२-००-०२नांदगाव खंडेश्र्वर-१७-००-१८अचलपूर-०३-०७-०३मोर्शी-१४-०४-१२वरूड-०२-००-०२धारणी-०८-०६-०४चिखलदरा-१६-१४-०६ पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता टंचाई आराखड्यानुसार वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनात टंचाई निवारणार्थ विविध उपाययोजना तातडीने केल्या जात आहेत. सध्या १३ गावांत १७ टँकरद्वारे तर ८३ गावांमध्ये ३७ बोअरवेल व ६३ विहीर अधिग्रहणाद्वारे नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. टंचाईच्या अनुषंगाने पाणीपुरवठा विभागामार्फत मागणीनुसार तातडीने उपाययोजना केल्या जात आहेत.- सुनील जाधव, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग 

टॅग्स :Amravatiअमरावती