शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजीनामा तर द्यावाच लागेल..."; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा नवा व्हिडिओ आला समोर
2
“२५ वर्षे विधानसभेत, राजीनामा देण्यासारखे घडले काय?”; माणिकराव कोकाटे विरोधकांवर बरसले
3
"राज्याला भिकारी म्हणून त्यांनी कळस गाठलाय"; कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांना विनंती
4
'सभागृहाचं कामकाज संपलं होतं, हे विधान धडधडीत खोटं'; रोहित पवारांनी कोकाटेंचे आणखी दोन व्हिडीओ केले पोस्ट
5
'मी बोलेन तेच...'; राज्यसभेतील 'ते' विधान आणि धनखड यांच्या बैठकीला दांडी, राजीनाम्यानंतर नड्डांनी मौन सोडलं
6
सचिनजींना भेदता आलं नव्हतं 'महाभारत'चं चक्रव्यूह, 'कोण होणार करोडपती'मध्ये दिलेलं चुकीचं उत्तर, पाहा व्हिडीओ
7
कुठे नेऊन ठेवलाय...! डोक्याला फेटा, गळ्यात हार अन् ढोलताशांचा गजर...; विधानभवनात 'राडा' करणाऱ्यांचं जंगी स्वागत
8
मुख्यमंत्री नितीश कुमारांना भारताचे उपराष्ट्रपती बनवा; भाजप आमदाराची मागणी
9
"उपराष्ट्रपतींसह अनेक भूमिकांमध्ये त्यांना..."; जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावर PM मोदींची प्रतिक्रिया
10
खुनी सोनम रघुवंशीवर लवकरच येणार चित्रपट? बॉलिवूडमधल्या 'या' टॉप अभिनेत्याची बारीक नजर
11
“मला रमी खेळताच येत नाही, दोषी असेन तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देईन”: माणिकराव कोकाटे
12
फक्त १०० रुपयांत घर तुमचं! भारतीयांसाठी 'या' देशात घर खरेदी करण्याची सुवर्णसंधी, कशी आहे ऑफर?
13
Virar: 'डिलिव्हरी बॉय'ने लिफ्टमध्येच केली लघवी; आधी दिला म्हणाला नाही, व्हिडीओ दाखवताच...
14
कास्टिंग काऊचची सुरुवात नक्की कशी होते? मराठी अभिनेत्रीने केली इंडस्ट्रीची पोलखोल
15
अखेर 'ते' ब्रिटिश लढाऊ विमान दुरुस्त झाले; केरळहून ब्रिटनच्या दिशेने रवाना
16
आईच्या अपमानाचा बदला! दहा वर्षे घेतला आरोपीचा शोध, समोर येताच केले ठार; सोशल मीडिया पोस्टमुळे सापडले
17
धनखड यांच्यानंतर आता कोण सांभाळणार कामकाज? 19 सप्टेंबरपूर्वी, नव्या उपराष्ट्रपतींची निवड होणं का आवश्यक? जाणून घ्या
18
FASTag ट्रान्सफर करणं झालं सोपं; विना टेन्शन एका बँकेतून दुसर्‍या बँकेत करू शकता शिफ्ट
19
IND vs ENG : इंग्लंडनं खेळली टीम इंडियासारखी 'चाल'; कसोटी क्रिकेटमध्ये असं पहिल्यांदाच घडलं
20
"मी लघवी स्वत:च प्यायलो, त्यांना दिली नाही म्हणून...", ट्रोल करणाऱ्यांना परेश रावल यांची सणसणीत चपराक

विजेची बचत करणे काळाची गरज

By admin | Updated: November 21, 2015 00:10 IST

विजेची बचत करणे ही आजच्या काळाची महत्त्वाची गरज आहे. विजेची बचत करून काटकसरीने विजेचा वापर करावा, ...

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे : मोर्शी येथे एलईडी बल्बचे वितरणअमरावती : विजेची बचत करणे ही आजच्या काळाची महत्त्वाची गरज आहे. विजेची बचत करून काटकसरीने विजेचा वापर करावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी उपस्थित नागरिकांना केले. मोर्शी येथील वीज कार्यालयात एलईडी बल्बचे वितरण करण्यात आले यावेळी ते बोलत होते. यावेळी अनिल बोंडे, उपविभागीय अधिकारी वऱ्हाडे, येथील महावितरण कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. हरिभाऊ बागडे म्हणाले, विजेचा वापर आणि विजेचे उत्पादन यात दिवसेंदिवस तफावत दिसून येत आहे. विजेचे उत्पादन कमी व विजेचा वापर अधिक प्रमाणात होत आहे. दैनंदिनी जीवनात वीज हा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे विजेची बचत करणे हा प्रत्येक नागरिकांसाठी महत्त्वाचा विषय असला पाहिजे. तसेच विजेची गळती थांबली पाहिजे. गावांमध्ये शेतकऱ्यांना वीज कमी प्रमाणात प्राप्त होते. ज्या प्रमाणात वीज प्राप्त होते त्यामध्ये त्यांना शेतात मोटार चालवणे शक्य होत नाही त्याचे कारण हेच की जुन्या मोटारींना वीज अधिक प्रमाणात लागते. त्यासाठी शासनाने सौर ऊर्जेतून वीज तयार करण्याचा मोठा उपक्रम शासनाने हाती घेतला आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सौर ऊर्जेवर चालणारे पंप लावल्यास त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. त्यामुळे त्यांना विद्युत विभागामार्फत पुरविल्या जाणाऱ्या विजेची वाट पहावी लागणार नाही. प्रारंभी बागडे यांच्या हस्ते महादेव चिखले, बाळकृष्ण मानकर, डी. एम. धोटे या वीज ग्राहकांना एलईडी बल्बचे वितरण करण्यात आले. (प्रतिनिधी)