शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

खासदारांच्या निलंबनाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन

By उज्वल भालेकर | Updated: December 26, 2023 20:07 IST

देशाच्या लोकशाही इतिहासात पहिल्यांदाच संसदेच्या दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षांच्या १४६ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे.

अमरावती : देशाच्या लोकशाही इतिहासात पहिल्यांदाच संसदेच्या दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षांच्या १४६ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. संसदेतील विरोधकांचा आवाज दाबण्याचा डाव केंद्रातील भाजप सरकारचा आहे. त्यामुळे या निलंबनाविरोधात राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने मंगळवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सत्याग्रह आंदोलन करून केंद्रातील भाजप सरकारचा निषेध नोंदविला. केंद्र सरकारचे हिवाळी अधिवेशन सुरू असून १३ डिसेंबरला चार युवकांनी सभागृहात प्रवेश केला होता. संसदेच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही मोठी चूक असून यावरच विरोधी पक्षातील नेत्यांनी गृहमंत्री अमित शाह यांनी यावर स्पष्टीकरण देण्याची मागणी सभागृहात केली होती. तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या निर्यातबंदीसारख्या प्रश्नावर खा. सुप्रिया सुळे व अमोल कोल्हे यांनी प्रश्न उपस्थित करताच त्यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली. 

सरकारला जाब विचारणाऱ्या लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहातील १४६ खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. सभागृहात विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे सत्ताधारी पक्षाने देणे अपेक्षित असताना, संसदेतून विरोधकच संपविण्याचा डाव केंद्र सरकारने आखल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. तसेच सभागृहात विरोधक नसताना देशातील तीन फौजदारी कायदे, निवडणूक आयुक्तांच्या निवड समितीतून सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना हटवणे, देशद्रोहाच्या कायद्यातील सुधारणा, असे कायदे संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आले. त्यामुळे ही घटन लोकशाहीविरोधी असून याविरोधात राष्ट्रवादी कॉँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सत्याग्रह आंदोलन करून केंद्र सरकारच्या लोकशाही विरोधी धोरणांचा निषेध नोंदविला यावेळी डॉ. हेमंत देशमुख, प्रदीप राऊत, प्रवीण काशीकर, धनंजय तोटे, वर्षा गधफणे, मन्सूर बेग, मंगेश भटकर, अमित गावंडे, प्रा. अनिल राऊत, संजीवनी काळे, सतीश देशमुख, रोशन कडू, दिलीप वराडे, सुनील वासनकर, शकूर बेग, आरिफ शेख, आसिफ खान, रवी खडसे, संघरत्न नन्नवरे, गौरव वाटाणे, सतीश चरपे, निखिल पानसे, नितीन राऊत उपस्थित होते.

टॅग्स :AmravatiअमरावतीNCPराष्ट्रवादी काँग्रेस