शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

सासरी खूप सोसलं, आता माहेरी चाललोय !

By admin | Updated: February 24, 2016 00:19 IST

‘सासरी खूप छळ झाला.. खूप सोसलं..आता सासूरवास संपवून माहेरी चाललोय’, अशा शब्दांत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे मावळते कुलगुरू मोहन खेडकर यांनी

मोहन खेडकर : आता तरी शेलक्या विशेषणांनी संबोधू नकाप्रदीप भाकरे अमरावती‘सासरी खूप छळ झाला.. खूप सोसलं..आता सासूरवास संपवून माहेरी चाललोय’, अशा शब्दांत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे मावळते कुलगुरू मोहन खेडकर यांनी त्यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळातील एकूण घडामोडींवर 'लोकमत'ला मंगळवारी बोलकी प्रतिक्रिया दिली.एरवी कोणत्याही आरोप-प्रत्यारोपांवर, कोणत्याही प्रकरणात कधीच आक्रमक होऊन ‘कमेंट’ न देणारे कुलगुरू कार्यकाळ संपवून निघताना मात्र भरभरून बोललेत. आतापर्यंत दाटलेले सारे मळभ त्यांनी मोकळे केले. ते म्हणाले, माझ्या कार्यकाळात अनेक आंदोलने झालीत, शेकडो आरोप झालेत. मात्र, मी स्थितप्रज्ञ राहिलो. कारण, माझा माझ्या कामावर विश्वास होता. आपल्या कार्यकाळात सर्वात जास्त आंदोलने झालीत. आरोपही सर्वाधिक आपल्यावरच झालेत? या प्रश्नाच्या उत्तरादाखल ते म्हणाले, असे असेलही कदाचित. पण, यापूर्वी विद्यापीठाला ‘अ’ मानांकनसुद्धा मिळाले नाही, हे वास्तव आहे ना, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. मंगळवारी खेडकरांना निरोप देण्यात आला. तत्पूर्वी ते ‘लोकमत’शी भरभरुन बोलले. ‘अ’ मानांकनामुळे १०० - १५० कोटींचे अनुदान विद्यापीठाला मिळेल. त्याचा लाभ निश्चितच विद्यार्थ्यांना होईल, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. कुलगुरुपदाच्या खुर्चीवर बसताना काही गोष्टी अपेक्षित होत्या. मात्र, मला त्यापलीकडे सहन करावे लागले. त्यावर मात करीत ‘अ’ मानांकन मिळविणे, हीच माझ्या स्थितप्रज्ञतेची आणि कार्यकर्तृत्वाची पावती नाही का? मात्र, तसे लिहितानाही कंजूषपणा केला जातो. आता तरी मृणाल खेडकर गुणवाढ प्रकरण, बांधाबांध भत्ता, सक्तीची रजा ही विशेषणे मागे टाकून ‘अ’ श्रेणीने गौरवान्वित अमरावती विद्यापीठ असा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा उल्लेख व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विद्यापीठाची बदनामी कशासाठी?मोहन खेडकरांना ‘टार्गेट’ करून आंदोलने करण्यात आलीत. बदनामी कुणाची, विद्यापीठाचीच ना? विद्यापीठ कुणाचे? मी तर चाललोय.. मग विद्यापीठाची बदनामी कशासाठी? याचा विचार व्हायला हवा, अशी अपेक्षा खेडकरांनी व्यक्त केली. पाच वर्षांत आपण कधीही ‘डीए’ घेतला नाही. दोनदा स्वखर्चाने परदेशात गेलो. मात्र, ही बाजू समोरच आली नाही, असे स्पष्ट करून शेलक्या विशेषणांनी आता तरी विद्यापीठाला हिणवू नका, असे आर्जव त्यांनी केले. ‘मोस्ट शेमफुल डे इन माय लाईफ’कुलगुरुंच्या कार्यालयात एखाद्या विद्यार्थी संघटनेने आंदोलने करावीत; तथापि माझ्या कुटुंबीयांसमोर आणि पोलिसांच्या उपस्थितीत एखाद्या विद्यार्थी नेत्याने शासकीय निवास्थानात घुसखोरी करण्याचा प्रसंग अत्यंत लाजिरवाणा आहे. ही बाब विचारशील समाजासाठी प्रश्नचिन्ह आहे. तसेच इट ईज ‘मोस्ट शेमफुल डे इन माय लाईफ’ असे ते खेदाने म्हणाले.नागपूर हे माहेर !पाच वर्षांपूर्वी नागपूर येथील व्हीएनआयटीमधून मोहन खेडकर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात कुलगुरू म्हणून रुजू झाले होते. ते मंगळवारी रात्री नागपूरसाठी रवाना होणार आहेत. सासरी खूप सोसलंय. आता परत माहेरी चाललोय. कुठलीही खंत नाही, अशा भावना व्यक्त करीत कुलगुरू कक्षाच्या बाहेर पडले. लवकरच ते व्हीएनआयटीतील इलेक्ट्रीकल विभागात ‘प्रोफेसर’ म्हणून रुजू होणार आहेत.