शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

वरुड येथील संत्राबागा सलाईनवर

By admin | Updated: April 12, 2016 00:20 IST

तालुक्यात अत्यल्प पर्जन्यमानामुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

भूजल पातळी खालावली : २१ हजार हेक्टरमधील बागांना धोकावरूड : तालुक्यात अत्यल्प पर्जन्यमानामुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तालुक्यात ९ प्रकल्प असून यावर्षी पावसाळयात १०० टक्के जलसाठा संचयित झाला होता. परंतु आता या प्रकल्पात केवळ १२ ते १५ टक्के जलसाठा आहे. सिंचन विहिरीतील भूजल पातळीसुध्दा खालावल्याने दिवसभर चालणारे पंप केवळ अर्ध्या तासावर आले आहेत. भूजल पातळी ४० ते ५० फुटांवर गेल्याने ताुलक्यातील हजारो हेक्टरमधील बागा ठिंबक सिंचनाव्दारे जगविण्याचा केविलवाणा प्रयत्न संत्रा उत्पादकांनी सुरू केला आहे.तालुक्यात २१ हजार ५०० हेक्टर शेतजमीन संत्रालागवडीखाली आहे. त्यापैकी १७ हजार हेक्टर जमिनीत फळधारणा करणारी आणि पाच वर्षांपर्यंतची पाच हजारांपेक्षा अधिक संत्राझाडे आहेत. गहू, हरभरा, मका, मिरची, पालेभाज्यांसह इतरही बागायती पिके घेण्यात येतात. या पिकांनासुध्दा वेळेवर सिंचनाची आवश्यकता असते. तालुक्यात ९ सिंचन प्रकल्प आहेत. पंरतु १०० टक्के जलसंचयीत प्रकल्पांमध्ये केवळ १५ ते २० टक्केच जलसाठा उरला आहे. मार्चपूर्वीच प्रकल्प सुकायला लागले होते. भूजल पातळीत कमालीची घसरण होऊन बोअरचे पाणी ७०० ते ८०० फुटांवर गेले तर विहिरीची पातळी ४० ते ५० फुटांवर गेली. दिवसभर उपसा करणाऱ्या विहिरी आता केवळ अर्धा तासच उपसा करू लागल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांना रात्री- बेरात्री ओलिताकरिता शेतावर जावे लागते. तालुक्यात ५०० पेक्षा अधिक संत्रा कलमा तयार करणारे नर्सरीधारक आहेत. यावर्षीसुध्दा त्यांनी कोट्यवधी कलमांची लागवड केली आहे. आंबिया बहार आणि मृग बहाराची संत्राफळे टिकवायची कशी? हा प्रश्न निर्माण झाला. तालुक्यातील तीव्र पाणीटंचाईच्या अस्मानी संकटाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत असल्याने पुढच्या काळात लाखो संत्राझाडांसह कोट्यवधी रुपयांच्या संत्राकलमा मृत्यूच्या दाढेत जाण्याची शक्यता आहे. तालुक्यातील प्रकल्पांत केवळ १२ ते १५ टक्के जलसाठा कायम आहे. यंदाही शेतकऱ्यांची स्थिती विदारक होणार, असे जाणकारांचे मत आहे.(तालुका प्रतिनिधी)ड्रायझोनमुळे नवीन विहीर खोदण्यावर बंदीवरुड तालुक्यात भूूगर्भातील पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणावर झाला आहे. भूजल पातळी खोल गेल्याने अतिशोषित भाग भूजल सर्वेक्षण विभागाने घोषित केला. यामुळे नवीन विहिरी, बोअर करण्यावर कायदेशीर बंदी आहे. ऐनवेळी पाण्याचे स्त्रोत कोरडे पडल्यास शेतकऱ्याकडे कोणताही पर्याय उरत नाही. हजारो संत्रा झाडे आणि लाखो संत्रा कलमा मृत्यूच्या सापळयात जाण्याची शक्यता आहे.कलमा उत्पादकांनाही लाखो रुपयांचा फटकावरुड तालुक्यात संत्रा बागांसह ५०० पेक्षा अधिक नर्सरीधारक आहेत. यामध्ये अधिकृत परवानाधारक सुध्दा आहेत. कोट्यवधी रुपयांच्या संत्रा, मोसंबी कलमांचे उत्पादन घेतले जाते. परंतु यंदा भूजलपातळीसुध्दा खालावली आहे. पाण्याच्या संकटामुळे हजारो संत्रा कलमा तसेच हजारो हेक्टरमधील संत्रा बागा सुकण्याच्या मार्गावर आहेत.