शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
2
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
3
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
4
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
5
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
6
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
7
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
8
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
9
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
12
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
13
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
14
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
15
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
16
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
20
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."

वरुड येथील संत्राबागा सलाईनवर

By admin | Updated: April 12, 2016 00:20 IST

तालुक्यात अत्यल्प पर्जन्यमानामुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

भूजल पातळी खालावली : २१ हजार हेक्टरमधील बागांना धोकावरूड : तालुक्यात अत्यल्प पर्जन्यमानामुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तालुक्यात ९ प्रकल्प असून यावर्षी पावसाळयात १०० टक्के जलसाठा संचयित झाला होता. परंतु आता या प्रकल्पात केवळ १२ ते १५ टक्के जलसाठा आहे. सिंचन विहिरीतील भूजल पातळीसुध्दा खालावल्याने दिवसभर चालणारे पंप केवळ अर्ध्या तासावर आले आहेत. भूजल पातळी ४० ते ५० फुटांवर गेल्याने ताुलक्यातील हजारो हेक्टरमधील बागा ठिंबक सिंचनाव्दारे जगविण्याचा केविलवाणा प्रयत्न संत्रा उत्पादकांनी सुरू केला आहे.तालुक्यात २१ हजार ५०० हेक्टर शेतजमीन संत्रालागवडीखाली आहे. त्यापैकी १७ हजार हेक्टर जमिनीत फळधारणा करणारी आणि पाच वर्षांपर्यंतची पाच हजारांपेक्षा अधिक संत्राझाडे आहेत. गहू, हरभरा, मका, मिरची, पालेभाज्यांसह इतरही बागायती पिके घेण्यात येतात. या पिकांनासुध्दा वेळेवर सिंचनाची आवश्यकता असते. तालुक्यात ९ सिंचन प्रकल्प आहेत. पंरतु १०० टक्के जलसंचयीत प्रकल्पांमध्ये केवळ १५ ते २० टक्केच जलसाठा उरला आहे. मार्चपूर्वीच प्रकल्प सुकायला लागले होते. भूजल पातळीत कमालीची घसरण होऊन बोअरचे पाणी ७०० ते ८०० फुटांवर गेले तर विहिरीची पातळी ४० ते ५० फुटांवर गेली. दिवसभर उपसा करणाऱ्या विहिरी आता केवळ अर्धा तासच उपसा करू लागल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांना रात्री- बेरात्री ओलिताकरिता शेतावर जावे लागते. तालुक्यात ५०० पेक्षा अधिक संत्रा कलमा तयार करणारे नर्सरीधारक आहेत. यावर्षीसुध्दा त्यांनी कोट्यवधी कलमांची लागवड केली आहे. आंबिया बहार आणि मृग बहाराची संत्राफळे टिकवायची कशी? हा प्रश्न निर्माण झाला. तालुक्यातील तीव्र पाणीटंचाईच्या अस्मानी संकटाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत असल्याने पुढच्या काळात लाखो संत्राझाडांसह कोट्यवधी रुपयांच्या संत्राकलमा मृत्यूच्या दाढेत जाण्याची शक्यता आहे. तालुक्यातील प्रकल्पांत केवळ १२ ते १५ टक्के जलसाठा कायम आहे. यंदाही शेतकऱ्यांची स्थिती विदारक होणार, असे जाणकारांचे मत आहे.(तालुका प्रतिनिधी)ड्रायझोनमुळे नवीन विहीर खोदण्यावर बंदीवरुड तालुक्यात भूूगर्भातील पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणावर झाला आहे. भूजल पातळी खोल गेल्याने अतिशोषित भाग भूजल सर्वेक्षण विभागाने घोषित केला. यामुळे नवीन विहिरी, बोअर करण्यावर कायदेशीर बंदी आहे. ऐनवेळी पाण्याचे स्त्रोत कोरडे पडल्यास शेतकऱ्याकडे कोणताही पर्याय उरत नाही. हजारो संत्रा झाडे आणि लाखो संत्रा कलमा मृत्यूच्या सापळयात जाण्याची शक्यता आहे.कलमा उत्पादकांनाही लाखो रुपयांचा फटकावरुड तालुक्यात संत्रा बागांसह ५०० पेक्षा अधिक नर्सरीधारक आहेत. यामध्ये अधिकृत परवानाधारक सुध्दा आहेत. कोट्यवधी रुपयांच्या संत्रा, मोसंबी कलमांचे उत्पादन घेतले जाते. परंतु यंदा भूजलपातळीसुध्दा खालावली आहे. पाण्याच्या संकटामुळे हजारो संत्रा कलमा तसेच हजारो हेक्टरमधील संत्रा बागा सुकण्याच्या मार्गावर आहेत.