शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
3
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
4
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
5
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
6
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
7
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
8
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
9
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
10
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
11
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
12
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
13
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
14
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
15
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
16
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
17
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
18
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
19
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
Daily Top 2Weekly Top 5

रिमझिम पावसाने पिकांना संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 21:55 IST

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात हलका व मध्यम स्वरूपाचा होत असलेला पाऊस पिकांना पोषक आहे. काही तालुक्यात उशिराने पेरणी झाल्या. या पेरणीचा मेळदेखील साधला गेल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.

ठळक मुद्देरविवारपासून सार्वत्रिक : महाबीजच्या सोयाबीन बियाण्यांचा मात्र दगा, दुबार पेरणीचे सावट

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात हलका व मध्यम स्वरूपाचा होत असलेला पाऊस पिकांना पोषक आहे. काही तालुक्यात उशिराने पेरणी झाल्या. या पेरणीचा मेळदेखील साधला गेल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मात्र, काही भागात महाबीजच्या सोयाबीन बियाण्याची उगवण कमी झाल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागत आहे.यंदाच्या खरिपामध्ये जिल्ह्यात ७.२८ लाख हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. यापैकी सहा लाख हेक्टरमध्ये सद्यस्थितीत पेरणी झाली. यंदा रोहिणी व मृग नक्षत्र कोरडे गेल्यामुळे शेतकºयांची मदार आर्द्रावर होती. या नक्षत्राचा पहिला आठवडा कोरडाच गेल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या होत्या. नंतर मात्र समाधानकारक पाऊस झाल्याने दोन आठवड्यापासून जिल्ह्यात पेरण्यांचा वेग वाढला. सद्यस्थितीत जिल्ह्यात ८० टक्क्यांवर क्षेत्रात खरिपाची पेरणी झालेली आहे.जिल्ह्यात १ जून ते ७ जुलै या कालावधीत २०८ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात २२६.३ मिमी पाऊस पडला. सद्यस्थितीत जिल्ह्यात पावसाने सरासरी पार केलेली आहे. हा पाऊस ११७ टक्के आहे. मागील वर्षी याच तारखेला फक्त १०८ मिमी पाऊस पडला होता.वार्षिक सरासरीच्या तुलनेत सध्या २८ टक्के पाऊस पडला आहे. यामध्ये सर्वाधिक २६० मिमी पाऊस चांदूर रेल्वे तालुक्यात झाला असून, सर्वात कमी १७२ मिमी पाऊस धारणी तालुक्यात कोसळला आहे.नांदगाव खंडेश्वरला सर्वाधिक पाऊसजिल्ह्यात सद्यस्थितीत २२६ मिमी पाऊस पडला. यामध्ये सर्वाधिक २८८ मिमी पाऊस नांदगाव खंडेश्वर तालुक्यात पडला. अमरावती २१६ मिमी, बुलडाणा १८२ मिमी, चांदूर रेल्वे २६० मिमी, धामणगाव रेल्वे २३१ मिमी, तिवसा १९५ मिमी, मोर्शी २२३ मिमी, वरूड २४६ मिमी, अचलपूर २६९ मिमी, चांदूर बाजार २०७ मिमी, दर्यापूर २३६ मिमी, अंजनगाव सुर्जी २०९ मिमी, धारणी १७२ मिमी व चिखलदरा तालुक्यात २३१ मिमी पाऊस पडला.काही भागात सोयाबीनची दुबार पेरणीगतवर्षी बोंडअळीच्या नुकसानामुळे यंदा शेतकऱ्यांचा कल सोयाबीनकडे अधिक आहे. मात्र, अचलपूर, भातकुलीसह काही तालुक्यांमध्ये महाबीजच्या सोयाबीन बियाण्याची उगवण कमी झाल्याने शेतकºयांवर दुबार पेरणीची वेळ आली. याबाबत शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. पावसाला उशिरा सुरवात झाल्यामुळे ६० दिवसांच्या कालावधीतील मूग, उडिदाचे बहुतांश क्षेत्र बाद होऊन सोयाबीनमध्ये रूपांतरित झाल्याने यंदा सोयाबीनची क्षेत्रवाढ होणार आहे.हवामानाची सद्यस्थितीवायव्य बंगालचा उपसागर आणि लगतच्या ओरिसा किनारपट्टीवर असलेल्या चक्राकार वाऱ्याच्या प्रभावामुळे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. संबंधित चक्राकार वारे ७.५ किमी उंचीवर तयार होऊन ते दक्षिणेकडे झुकल्याने दक्षिण व लगतच्या मध्य भारतात बहुतेक ठिकाणी मध्यम ते भारी पाऊस पडत आहेत. पश्चिम किनारपट्टीवर असलेली टर्फ रेषा मजबूत होण्याची शक्यता आहे. मान्सून सक्रिय होण्याची स्थिती पाहता, तीन दिवस मध्य भारतात पाऊस कायम राहणार असल्याचे हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी सांगितले.