शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

रिमझिम पावसाने पिकांना संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 21:55 IST

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात हलका व मध्यम स्वरूपाचा होत असलेला पाऊस पिकांना पोषक आहे. काही तालुक्यात उशिराने पेरणी झाल्या. या पेरणीचा मेळदेखील साधला गेल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.

ठळक मुद्देरविवारपासून सार्वत्रिक : महाबीजच्या सोयाबीन बियाण्यांचा मात्र दगा, दुबार पेरणीचे सावट

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात हलका व मध्यम स्वरूपाचा होत असलेला पाऊस पिकांना पोषक आहे. काही तालुक्यात उशिराने पेरणी झाल्या. या पेरणीचा मेळदेखील साधला गेल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मात्र, काही भागात महाबीजच्या सोयाबीन बियाण्याची उगवण कमी झाल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागत आहे.यंदाच्या खरिपामध्ये जिल्ह्यात ७.२८ लाख हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. यापैकी सहा लाख हेक्टरमध्ये सद्यस्थितीत पेरणी झाली. यंदा रोहिणी व मृग नक्षत्र कोरडे गेल्यामुळे शेतकºयांची मदार आर्द्रावर होती. या नक्षत्राचा पहिला आठवडा कोरडाच गेल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या होत्या. नंतर मात्र समाधानकारक पाऊस झाल्याने दोन आठवड्यापासून जिल्ह्यात पेरण्यांचा वेग वाढला. सद्यस्थितीत जिल्ह्यात ८० टक्क्यांवर क्षेत्रात खरिपाची पेरणी झालेली आहे.जिल्ह्यात १ जून ते ७ जुलै या कालावधीत २०८ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात २२६.३ मिमी पाऊस पडला. सद्यस्थितीत जिल्ह्यात पावसाने सरासरी पार केलेली आहे. हा पाऊस ११७ टक्के आहे. मागील वर्षी याच तारखेला फक्त १०८ मिमी पाऊस पडला होता.वार्षिक सरासरीच्या तुलनेत सध्या २८ टक्के पाऊस पडला आहे. यामध्ये सर्वाधिक २६० मिमी पाऊस चांदूर रेल्वे तालुक्यात झाला असून, सर्वात कमी १७२ मिमी पाऊस धारणी तालुक्यात कोसळला आहे.नांदगाव खंडेश्वरला सर्वाधिक पाऊसजिल्ह्यात सद्यस्थितीत २२६ मिमी पाऊस पडला. यामध्ये सर्वाधिक २८८ मिमी पाऊस नांदगाव खंडेश्वर तालुक्यात पडला. अमरावती २१६ मिमी, बुलडाणा १८२ मिमी, चांदूर रेल्वे २६० मिमी, धामणगाव रेल्वे २३१ मिमी, तिवसा १९५ मिमी, मोर्शी २२३ मिमी, वरूड २४६ मिमी, अचलपूर २६९ मिमी, चांदूर बाजार २०७ मिमी, दर्यापूर २३६ मिमी, अंजनगाव सुर्जी २०९ मिमी, धारणी १७२ मिमी व चिखलदरा तालुक्यात २३१ मिमी पाऊस पडला.काही भागात सोयाबीनची दुबार पेरणीगतवर्षी बोंडअळीच्या नुकसानामुळे यंदा शेतकऱ्यांचा कल सोयाबीनकडे अधिक आहे. मात्र, अचलपूर, भातकुलीसह काही तालुक्यांमध्ये महाबीजच्या सोयाबीन बियाण्याची उगवण कमी झाल्याने शेतकºयांवर दुबार पेरणीची वेळ आली. याबाबत शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. पावसाला उशिरा सुरवात झाल्यामुळे ६० दिवसांच्या कालावधीतील मूग, उडिदाचे बहुतांश क्षेत्र बाद होऊन सोयाबीनमध्ये रूपांतरित झाल्याने यंदा सोयाबीनची क्षेत्रवाढ होणार आहे.हवामानाची सद्यस्थितीवायव्य बंगालचा उपसागर आणि लगतच्या ओरिसा किनारपट्टीवर असलेल्या चक्राकार वाऱ्याच्या प्रभावामुळे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. संबंधित चक्राकार वारे ७.५ किमी उंचीवर तयार होऊन ते दक्षिणेकडे झुकल्याने दक्षिण व लगतच्या मध्य भारतात बहुतेक ठिकाणी मध्यम ते भारी पाऊस पडत आहेत. पश्चिम किनारपट्टीवर असलेली टर्फ रेषा मजबूत होण्याची शक्यता आहे. मान्सून सक्रिय होण्याची स्थिती पाहता, तीन दिवस मध्य भारतात पाऊस कायम राहणार असल्याचे हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी सांगितले.