शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

४१ गावांतील जलस्रोतांचे नमुने आढळले दूषित; आरोग्य विभागाने दिले उपाययोजनेचे निर्देश

By जितेंद्र दखने | Updated: August 30, 2023 18:44 IST

जुलैमध्ये जिल्ह्यात जलस्रोतांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती.

अमरावती: ग्रामीण भागातील ४१ गावांमधील पाणी दूषित असल्याचे आढळून आले आहे. जुलैमध्ये जिल्ह्यात जलस्रोतांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती.

संबंधित ग्रामपंचायतींना दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून गावांचे पाणी नमुने पुन्हा दूषित आल्यास ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषद आरोग्य अधिकाऱ्यांनी दिला दिला आहे. राष्ट्रीय पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षणाअंतर्गत जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन यंत्रणेकडून जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील काही गावांतील पाणी नमुन्यांची तपासणी केली जाते. लोकांना शुद्ध पाणीपुरवठा होऊन साथीच्या आजाराचा प्रसार थांबविण्यासाठी पाण्याचे नमुने तपासले जातात.

जिल्हा प्रयोगशाळेने आरोग्य यंत्रणेकडे जुलै महिन्याचा पाणी नमुने तपासणीचा अहवाल सादर केला आहे. यात तिवसा तालुक्यातील ७, भातकुली व अमरावती तालुक्यातील प्रत्येकी ६, मोर्शी व वरूड तालुक्यातील प्रत्येकी ४, धारणी तालुक्यातील ३, अचलपूर, धामणगाव रेल्वे, चिखलदरा, चांदूर रेल्वे तालुक्यातील प्रत्येकी २ आणि नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील १ जलस्रोत नमुना दूषित आहे.ब्लिचिंग पावडर नमुनेही पाठविले नाहीत

जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अखत्यारीत येत असलेल्या सात प्राथमिक आरोग्य केंद्रांनी ब्लिचिंग पावडरचे नमुनेसुद्धा पाठविले नाहीत. त्यामुळे या प्राथमिक आरोग्य केंद्रांना जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत लेखी पत्र पाठवून तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आले आहेत.ज्या गावात दूषित पाणी नमुने आढळले आहेत. अशा गावांना तातडीने जलस्रोताचे नियमित टीसीएल पावडरचा वापर करून पाणी शुद्धीकरण करावे तसेच खबरदारीच्या उपाययोजना करून पुन्हा पाणी नमुने पाठविण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत.- मनीषा सूर्यवंशी, जिल्हा साथरोग अधिकारी