शहरं
Join us  
Trending Stories
1
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
2
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
3
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
4
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
5
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
6
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
7
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
8
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
9
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
10
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
11
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
12
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
13
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
14
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
15
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
16
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
17
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
18
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
19
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
20
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!

शेतकºयांसाठी काँग्रेस आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 22:27 IST

कर्जमाफीच्या मुद्यावर शेतकºयांसह काँग्रेस पदाधिकारी आक्रमक होत शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.

ठळक मुद्देसरसकट कर्जमाफीची मागणी : बॅरिकेटस् तोडून जिल्हाकचेरीवर धडक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कर्जमाफीच्या मुद्यावर शेतकºयांसह काँग्रेस पदाधिकारी आक्रमक होत शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. बंदोबस्तासाठी लावलेले बॅरिके टस्सुद्धा कार्यकर्त्यांनी फेकून दिले. पालिसांचा विरोध धुडकावत कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील दोन्ही प्रवेशव्दारातून जबरीने आत प्रवेश केल्याने पोलिसांची तारांबळ उडाली होती. जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना शेतकºयांना फसवी कर्जमाफी नको, तर सरसकट कर्जमाफी देऊन सातबारा संपूर्ण कोरा करावा यासह अन्य मागण्यांचे निवेदन सोपविले.जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमेटीच्या वतीने काढण्यात आलेल्या या मोर्चाचे नेतृत्व आमदार वीरेंद्र जगताप, आ.यशोमती ठाकूर, जि.प.अध्यक्ष नितीन गोंडाणे, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, यशवंतराव शेरेकर माजी आमदार केवलराम काळे, नरेशचंद्र ठाकरे, पुष्पा बोंडे यांनी केली. इर्विन चौकातून शेतकºयांच्या विविध प्रश्नांसाठी धडक मोर्चा काढला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण करून निघालेला हा मोर्चा दुपारी २ वाजतादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ रोखण्यात आला. आमदार व पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी बॅरिकेटस तोडून थेट जिल्हाधिकारी कार्यालयाचे दोन्ही मुख्यप्रवेशव्दारातून सभागृहात शिरकाव केला. याठिकाणी राज्य व केंद्रातील भाजप सरकारविरोधात तीव्र घोषणा बाजी करीत जिल्हाकचेरी दणाणून सोडली. जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्यासमोर शेतकºयांच्या लोकप्रतिनिधींनी व्यस्था मांडल्यात. ३० जूनपर्यंतचे सर्व थकबाकीदारांना सरसकट कर्जमाफी द्यावी, यासह अदी मागण्या केल्यात.यावेळी जिल्हापरिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे, माजी अध्यक्ष सतीश उईके, सभापती जयंत देशमुख, विक्रम ठाकरे, प्रकाश साबळे, गिरीष कराळे, सतीश हाडोळे, प्रकाश काळबांडे, अनंत साबळे, भागवत खांदे , श्याम देशमुख, मोहन सिंगवी, प्रवीण घुईखेडकर, सुधाकर भारसाकळे, बाळासाहेब हिंगणीकर, मोहन पाटील, बिट्टू मंगरोळे, प्रमोद दाळू, राजु कुरेशी, सुरेश आडे, श्रीराम नेहर, किशोर किटुकले, महेंद्र गैलवार, राहुल येवले, किशोर देशमुख, राजाभाऊ जुनघरे, अभिनंदन पेंढारी, वैभव वानखडे, सागर देशमुख, समीर जवंजाळ, संजय मार्डीकर, अभिजित बोके, बापुराव गायकवाड, अनिकेत देशमुख, किशोर चांगोले, अलका देशमुख, संगीता तायडे, पूजा येवले, उषा उताने, दयाराम काळे, श्रीपाल पाल यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.शेतकºयांची सध्याची आर्थिक अवस्था लक्षात घेता शेतकºयांच्या प्रश्नावर काढलेल्या मोर्चात सहभागी झालेली बैलगाडी अन ग्रामिण भागातून काही शेतमजूर डबळे वाजवित मोर्चात सहभागी झाल्याने सर्वाचेच लक्ष वेधून घेत होते.पोलीस अन् कार्यकर्त्यांत बाचाबाचीशेतकºयांच्या प्रश्नांसाठी काँग्रेस पक्षाच्यावतीने काढण्यात आलेला मोर्चा मुख्य डाक घरासमोरील मार्गावर पोलिसांनी बॅरीकेड्स लावून रोखला. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाकडे काँग्रेस कार्यकर्त्यांनी धाव घेण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांचे प्रयत्न हाणून पाडला. यावेळी काँग्रेस नेते व पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली.सरसकट कर्जमाफी हवीच, निर्वाणीचा इशाराशेतकरी निसर्गाच्या अवकृपेमुळे दुबार पेरणी करीत आहे. त्यात पाल्यांचे शिक्षणाकरिता व मुलीच्या विवाहाकरिता शेतकºयांजवळ पैसा राहिलेला नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. तसेच महाराष्ट्र शासनाने केलेल्या फसव्या कर्जमाफीच्या अनुषंगाने शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहे. त्याअनुषंगाने अमरावती जिल्ह्यात ज्या शेतकºयांना सरसकट कर्जमाफी करून संपूर्ण सातबारा कोरा केल्याशिवाय काँग्रेस शांत बसणार नसल्याचा इशारा यावेळी शासनाला दिला आहे.