शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

पतंगाचा नाद 'त्या' अभाग्याच्या जिवावर बेतला; ३० तासानंतर पडिक विहिरीत मृतदेहच मिळाला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2021 22:40 IST

Amravati News पतंगाचा नाद एका बालकाच्या जिवावर बेतल्याची हृद्यद्रावक घटना बुधवारी रात्री राजापेठ भागात उघड झाली. बेपत्ता झाल्याच्या ३० तासानंतर त्याचा मृतदेहच एका खचलेल्या व झाडाझुडपांनी वेढलेल्या विहिरीत आढळून आला.

अमरावती : पतंगाचा नाद एका बालकाच्या जिवावर बेतल्याची हृद्यद्रावक घटना बुधवारी रात्री राजापेठ भागात उघड झाली. बेपत्ता झाल्याच्या ३० तासानंतर त्याचा मृतदेहच एका खचलेल्या व झाडाझुडपांनी वेढलेल्या विहिरीत आढळून आला. दरम्यान त्याच्यावर गुरुवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. वैभव श्रीकांत आकोडे (१५, जुना कोंडवाडा, राजापेठ) असे मृताचे नाव आहे. राजापेठ कोंडवाड्यापासून सुमारे १ किमी अंतरावरील जयरामनगर येथील एका विहिरीत ८ डिसेंबर रोजी रात्री ११.३० च्या सुमारास त्याचा मृतदेह आढळून आला.

७ डिसेंबर रोजी दुपारी ४.३० च्या सुमारास सायकल घेऊन घरबाहेर पडलेला वैभव परत न आल्याने त्याच्या आईने राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. रात्री ११.५२ च्या सुमारास गुन्हा दाखल करत राजापेठ पोलिसांनी चौकशीस सुरूवात केली. त्या भागातील एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये वैभव हा सायकलने जयरामनगर भागाकडे जाताना दिसतो. तो धागा पकडून ठाणेदार मनीष ठाकरे यांनी वैभवच्या कुटुंबीयांसह त्या भागाचा कानाकोपरा शोधून काढला. दरम्यान त्या भागात दुपारी काही मुले पतंग उडवत होती, अशी माहिती स्थानिकांनी दिली. दरम्यान, पतंग मिळवण्याच्या नादात धावताना वैभवने त्याची सायकल एका भिंतीलगत उभी करून ठेवली होती. सायंकाळपर्यंत ती तशीच राहिल्याने तेथील एका स्थानिकाने ती आपल्या घरात सुरक्षित ठेवली.

दरम्यान, ८ डिसेंबर रोजी त्यांनी ती सायकल ज्या ठिकाणी होती, त्याच ठिकाणी आणून ठेवली. बुधवारी सायंकाळी ती सायकल वैभवची असल्याचे कुटुंबीयांनी ओळखले. त्यामुळे त्याच भागात शोधकार्य करण्यात आले. दरम्यान, वैभवच्या वडिलांचे सहा वर्षांपूर्वी निधन झाले असून, त्याची आई घरकाम करते. मोठी बहीण आयटीआय शिक्षणासाठी औरंगाबाद गेलेली होती. मंगळवारी दुपारी ५ च्या सुमारास कामावरून परतल्यानंतर वैभव सायकल घेऊन बाहेर गेल्याची माहिती त्याच्या आईला मिळाली होती.

अग्निशमनची मदत

ठाणेदार मनीष ठाकरे यांनी बुधवारी सायंकाळपासून रात्रीपर्यंत त्या भागातील नाले, विहिरी पिंजून काढल्या. जयरामनगरात ज्या ठिकाणी सायकल आढळली, तेथे शोध घेत असताना त्या भागात खचलेली विहीर झाडाझुडुपांनी वेढल्याची माहिती ठाकरे यांना मिळाली. मोठ्या टॉर्च घेऊन त्या विहिरीत डोकावून पाहिले असता, त्यात केवळ मानवी केस आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी ती विहीर लक्ष्य करीत महापालिकेच्या अग्निशमन विभागाची मदत घेतली. अखेर बुधवारी रात्री ११.१५ च्या सुमारास त्यातून मृतदेह हाती लागला. त्या मृतदेहाची ओळख वैभव आकोडे म्हणून पटविण्यात आली. तो गाळात फसला होता.

टॅग्स :Deathमृत्यू