शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
6
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
7
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
8
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
9
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
10
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
11
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
12
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
13
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
14
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
15
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
16
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
17
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

‘अग्रिम’मध्ये १.५० कोटींची अनियमितता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 23:25 IST

औरंगाबादस्थित स्थानिक निधी लेखापरीक्षकांनी घेतलेल्या आक्षेपानुसार अग्रिम समायोजनामध्ये १.५० कोटींपेक्षा अधिकची अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

ठळक मुद्देरक्कम दडपली : भ्रष्टाचारावर पांघरूण

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : औरंगाबादस्थित स्थानिक निधी लेखापरीक्षकांनी घेतलेल्या आक्षेपानुसार अग्रिम समायोजनामध्ये १.५० कोटींपेक्षा अधिकची अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दीड कोटींची ही आर्थिक अनियमितता सन २०१२-१३ पर्यंतची असून सन २०१६-१७ च्या आर्थिक वर्षापर्यंत ही रक्कम वाढण्याचीच अधिक शक्यता आहे.सन २०१२-१३ च्या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण करीत असताना स्थानिक निधी लेखापरीक्षकांनी २ कोटी २३ लाख ४५ हजार ३८० रूपये अग्रिम शिल्लक असल्याचे म्हटले आहे. अर्थात सन २०१२-१३ अखेर २.२३ कोटींच्या अग्रिमाचे समायोजन झाले नव्हते. त्याचवर्षी केवळ ४६.५४ लाख रूपये अग्रिमाचे समायोजन झाले. तत्पूर्वी ती रक्कम २.६९ कोटींच्या घरात असल्याची नोंद लेखापरीक्षकांनी २४२ व्या क्रमांकाच्या पानावर घेतली आहे. सन १९९५-९६ ते २०११-१२ पर्यंतचे थकीत अग्रिम १ कोटी ८९ लाख ८७ हजार ३६४ रूपये होते. त्यात सन २०१२-१३ मध्ये ८०.१२ लाख रूपये अग्रिम देण्यात आले. त्यानंतर समायोजनानंतरही थकीत अग्रिम २.२३ कोटींवर थांबले. त्यानंतर सन २०१३-१४, २०१४-१५, २०१५-१६ व २०१६-१७ समायोजित अग्रिम किंवा नव्याने दिलेल्या अग्रिमाची आकडेवारी नसली तरी सन २०१७ पर्यंत ती रक्कम ३ ते ३.५० कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. मात्र, लेखापरीक्षणानुसार सन २०१२-१३ अखेर २ कोटी २३ लाख ४५ हजार ३८० रुपये अग्रिम प्रलंबित असल्याची नोंद आहे. तसेच दुसरीकडे सन २०१० ते २०१७ पर्यंत अग्रिमाची एकूण थकबाकी ७५ लाखांच्या आसपास असल्याचा लेखाविभागाचा दावा आहे. त्यामुळे लेखापरीक्षणातील आकडेवारीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. लेखापरीक्षणावर विश्वास ठेवल्यास सन २०१२-१३ नुसारच अग्रिमाची थकबाकी तब्बल १.५० कोटींनी दडपण्यात आली. सन २०१७ अखेर ती रक्कम अधिक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. लेखापरीक्षण अहवालात सन २०१२-१३ अखेर २.२३ कोटींची अग्रिम थकबाकी शिल्लक असताना ७५ लाखांचा आकडा कोठून आला, याचे उत्तर लेखा विभागाला द्यावे लागणार आहे. यासर्व प्रकारावरून लेखा विभागातील गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.स्थायीची मंजुरीही नाहीआकस्मिक खर्च निधीतून अग्रिमाच्या लुटीला थांबविण्याचे कुठलेही प्रयत्न झाले नसल्याचे निरीक्षण आॅडिटमध्ये नोंदविण्यात आले. विशेष म्हणजे वित्त विभागाच्या १५ मे २००९ च्या शासन निर्णयानुसार अधिकाधिक १० हजार अग्रीम देणे अभिप्रेत आहे. मात्र, अमरावती महापालिकेत वारंवार १० हजारांपेक्षा अधिक अग्रिम देण्यात आले. त्याला स्थायी समितीची मंजुरीही घेण्यात आलेली नाही.