शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

‘अग्रिम’मध्ये १.५० कोटींची अनियमितता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 23:25 IST

औरंगाबादस्थित स्थानिक निधी लेखापरीक्षकांनी घेतलेल्या आक्षेपानुसार अग्रिम समायोजनामध्ये १.५० कोटींपेक्षा अधिकची अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

ठळक मुद्देरक्कम दडपली : भ्रष्टाचारावर पांघरूण

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : औरंगाबादस्थित स्थानिक निधी लेखापरीक्षकांनी घेतलेल्या आक्षेपानुसार अग्रिम समायोजनामध्ये १.५० कोटींपेक्षा अधिकची अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दीड कोटींची ही आर्थिक अनियमितता सन २०१२-१३ पर्यंतची असून सन २०१६-१७ च्या आर्थिक वर्षापर्यंत ही रक्कम वाढण्याचीच अधिक शक्यता आहे.सन २०१२-१३ च्या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण करीत असताना स्थानिक निधी लेखापरीक्षकांनी २ कोटी २३ लाख ४५ हजार ३८० रूपये अग्रिम शिल्लक असल्याचे म्हटले आहे. अर्थात सन २०१२-१३ अखेर २.२३ कोटींच्या अग्रिमाचे समायोजन झाले नव्हते. त्याचवर्षी केवळ ४६.५४ लाख रूपये अग्रिमाचे समायोजन झाले. तत्पूर्वी ती रक्कम २.६९ कोटींच्या घरात असल्याची नोंद लेखापरीक्षकांनी २४२ व्या क्रमांकाच्या पानावर घेतली आहे. सन १९९५-९६ ते २०११-१२ पर्यंतचे थकीत अग्रिम १ कोटी ८९ लाख ८७ हजार ३६४ रूपये होते. त्यात सन २०१२-१३ मध्ये ८०.१२ लाख रूपये अग्रिम देण्यात आले. त्यानंतर समायोजनानंतरही थकीत अग्रिम २.२३ कोटींवर थांबले. त्यानंतर सन २०१३-१४, २०१४-१५, २०१५-१६ व २०१६-१७ समायोजित अग्रिम किंवा नव्याने दिलेल्या अग्रिमाची आकडेवारी नसली तरी सन २०१७ पर्यंत ती रक्कम ३ ते ३.५० कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. मात्र, लेखापरीक्षणानुसार सन २०१२-१३ अखेर २ कोटी २३ लाख ४५ हजार ३८० रुपये अग्रिम प्रलंबित असल्याची नोंद आहे. तसेच दुसरीकडे सन २०१० ते २०१७ पर्यंत अग्रिमाची एकूण थकबाकी ७५ लाखांच्या आसपास असल्याचा लेखाविभागाचा दावा आहे. त्यामुळे लेखापरीक्षणातील आकडेवारीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. लेखापरीक्षणावर विश्वास ठेवल्यास सन २०१२-१३ नुसारच अग्रिमाची थकबाकी तब्बल १.५० कोटींनी दडपण्यात आली. सन २०१७ अखेर ती रक्कम अधिक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. लेखापरीक्षण अहवालात सन २०१२-१३ अखेर २.२३ कोटींची अग्रिम थकबाकी शिल्लक असताना ७५ लाखांचा आकडा कोठून आला, याचे उत्तर लेखा विभागाला द्यावे लागणार आहे. यासर्व प्रकारावरून लेखा विभागातील गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.स्थायीची मंजुरीही नाहीआकस्मिक खर्च निधीतून अग्रिमाच्या लुटीला थांबविण्याचे कुठलेही प्रयत्न झाले नसल्याचे निरीक्षण आॅडिटमध्ये नोंदविण्यात आले. विशेष म्हणजे वित्त विभागाच्या १५ मे २००९ च्या शासन निर्णयानुसार अधिकाधिक १० हजार अग्रीम देणे अभिप्रेत आहे. मात्र, अमरावती महापालिकेत वारंवार १० हजारांपेक्षा अधिक अग्रिम देण्यात आले. त्याला स्थायी समितीची मंजुरीही घेण्यात आलेली नाही.