शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

रिपाइंचे सोशल इंजिनिअरिंग

By admin | Updated: January 28, 2017 00:22 IST

रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (गवई गट) महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढणार आहे.

पत्रपरिषद: राजेंद्र गवई यांची माहितीअमरावती: रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (गवई गट) महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढणार आहे. विशेषत: बौद्धेत्तर उमेदवारांना प्राधान्य देत रिपाइं सोशल इंजिनिअरींग हा उपक्रम राबविणार असल्याची माहिती राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र गवई यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेतून दिली. युती, आघाडीत बिघाडी झाल्यानंतर रिपाइं स्वबळावर निवडणूक लढविणार ही बाब गवर्इंनी स्पष्ट केली. गवर्इंच्या मते, जिल्ह्यात काँग्रेससोबत मैत्री करण्याची तयारी होती. मात्र जागा वाटपात समाधानकारक तोडगा निघाला नाही. त्यामुळे रिपाइं कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तोवर आता स्वबळावर लढणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिल्ह्यात सुमारे १५० उमेदवार रिंगणात राहतील. रिपाइं हा केवळ बौद्धांचा पक्ष आहे, हा कलंक मोडीत काढण्यासाठी बौद्धेत्तर ७० टक्के समाजाला उमेदवारी देण्याचे प्राधान्य आहे. राज्यात काही जिल्ह्यांमध्ये काँग्रेससोबत मैत्री होईल, असे ते म्हणाले. केंद्र सरकारने नोटाबंदी करुन सर्वसामान्यांचे जगणे कठीण केले आहे. याचा परिणाम सर्वच स्तरावर झाला आहे. येत्या निवडणुकांमध्ये नक्कीच भाजपला फटका बसेल, असे संकेत त्यांनी वर्तविले. पदवीधर मतदार संघासाठी अद्यापपर्यत कोणत्याही उमेदवाराला रिपाइंने पांठीबा जाहीर केला नाही. परिस्थितीनुसार पदवीधरसाठी निर्णय घेतल्या जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पत्रपरिषदेला रामेश्वर अभ्यंकर, हिमंत ढोले, भाऊ ढंगारे, नगरसेवक भूषण बनसोड, अर्जुन खंडारे, सविता भटकर, अमोल इंगळे, रमेश आठवले आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)