शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

रेल्वे गाड्यांमध्ये चोऱ्या रोखण्यासाठी आरपीएफचे विशेष पथक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 00:55 IST

रेल्वे गाड्यांमध्ये सातत्याने होणाऱ्या चोऱ्या रोखण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने विशेष पथक गठित केले आहे. या पथकातील बंदूकधारी शिपाई दोन रेल्वे विभागांच्या सीमेदरम्यान प्रवाशांची सुरक्षा करतील. विशेषत: लांब पल्ल्यांच्या गाड्यांना सुरक्षा प्रदान केली जाणार आहे.

ठळक मुद्देबंदूकधारी शिपायांची गस्त : लांब पल्ल्याच्या गाड्यांवर लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रेल्वे गाड्यांमध्ये सातत्याने होणाऱ्या चोऱ्या रोखण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने विशेष पथक गठित केले आहे. या पथकातील बंदूकधारी शिपाई दोन रेल्वे विभागांच्या सीमेदरम्यान प्रवाशांची सुरक्षा करतील. विशेषत: लांब पल्ल्यांच्या गाड्यांना सुरक्षा प्रदान केली जाणार आहे. त्याअनुषंगाने रेल्वे सुरक्षा दलाच्या अधीक्षकांचे पत्र बडनेरा रेल्वे स्थानकात धडकले आहे.गत लोकसभा अधिवेशनात रेल्वे गाड्यांमध्ये चोऱ्या आणि प्रवाशांची असुरक्षितता या विषयांवर भावना गवळी, आनंदराव अडसूळ व संजय धोत्रे आदी खासदारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. धावत्या गाड्यांमध्ये दरोडे, चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचा मुद्दा मांडताना, प्रवासी असुरक्षित असल्याची खंतदेखील त्यांनी व्यक्त केली होती. लोकसभेत झालेल्या चर्चेच्या परिणामी रेल्वे विभागाने प्रवाशांच्या सुरक्षेविषयी उपाय योजले आहेत.रेल्वे मालमत्तांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या आरपीएफ यंत्रणेकडे प्रवाशांचीदेखील सुरक्षितता सोपविण्यात आली आहे. अन्य सहकार्यासाठी राज्याचे लोहमार्ग पोलीस असतील. बडनेरा, अमरावती स्थानकावरील रेल्वे सुरक्षा दलाला वरिष्ठांकडून पत्र प्राप्त झाले आहे. त्यानुसार लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्यांमध्ये बंदूकधारी जवान प्रवाशांची सुरक्षा करतील. बडनेरा ते अकोला आणि पुढे अकोला ते भुसावळ अशा दोन टप्प्यांत सशस्त्र जवान धावत्या गाड्यांमध्ये राहतील. तीन ते चार आरपीएफ जवानांचे एक पथक यामध्ये नेमले जाईल. अलीकडे रेल्वेत अल्पवयीन मुलांकडून मोबाइलसह साहित्य लंपास करण्यात आल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. आरपीएफ पथकाला हे मोठे आव्हान आहे. यापूर्वीदेखील आरपीएफकडे प्रवाशांच्या सुरक्षिततेची धुरा होती. आता यात वाढ केली जाणार आहे.अवैध खाद्यपदार्थ विक्रीला बसणार लगामरेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध खाद्यपदार्थ विक्री होते. मात्र, धावत्या रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या बंदूकधारी आरपीएफ पथकामुळे यात बराच फरक पडणार आहे. आरक्षित डब्यात हे पथक सुरक्षा देईल. कोणी प्रवासी विनाआरक्षण आढळल्यास त्याला रोखण्याचे अधिकार बहाल केले आहेत. अवैध खाद्यपदार्थ विक्रेत्यांसह तृतीयपंथीयांचा हैदोसदेखील आता थांबण्याचे संकेत आहेत.रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी यापूर्वीसुद्धा आरपीएफ होते. आता यात अधिक वाढ होणार आहे. प्रवाशांसह रेल्वे मालमत्तांचे संरक्षण करण्यासाठी विशेष पथक गठित केले जाणार आहे.- राजेश बढे,निरीक्षक, रेल्वे सुरक्षा दल, बडनेरा.

टॅग्स :railwayरेल्वे