शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

रेल्वे गाड्यांमध्ये चोऱ्या रोखण्यासाठी आरपीएफचे विशेष पथक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 00:55 IST

रेल्वे गाड्यांमध्ये सातत्याने होणाऱ्या चोऱ्या रोखण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने विशेष पथक गठित केले आहे. या पथकातील बंदूकधारी शिपाई दोन रेल्वे विभागांच्या सीमेदरम्यान प्रवाशांची सुरक्षा करतील. विशेषत: लांब पल्ल्यांच्या गाड्यांना सुरक्षा प्रदान केली जाणार आहे.

ठळक मुद्देबंदूकधारी शिपायांची गस्त : लांब पल्ल्याच्या गाड्यांवर लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रेल्वे गाड्यांमध्ये सातत्याने होणाऱ्या चोऱ्या रोखण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने विशेष पथक गठित केले आहे. या पथकातील बंदूकधारी शिपाई दोन रेल्वे विभागांच्या सीमेदरम्यान प्रवाशांची सुरक्षा करतील. विशेषत: लांब पल्ल्यांच्या गाड्यांना सुरक्षा प्रदान केली जाणार आहे. त्याअनुषंगाने रेल्वे सुरक्षा दलाच्या अधीक्षकांचे पत्र बडनेरा रेल्वे स्थानकात धडकले आहे.गत लोकसभा अधिवेशनात रेल्वे गाड्यांमध्ये चोऱ्या आणि प्रवाशांची असुरक्षितता या विषयांवर भावना गवळी, आनंदराव अडसूळ व संजय धोत्रे आदी खासदारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. धावत्या गाड्यांमध्ये दरोडे, चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचा मुद्दा मांडताना, प्रवासी असुरक्षित असल्याची खंतदेखील त्यांनी व्यक्त केली होती. लोकसभेत झालेल्या चर्चेच्या परिणामी रेल्वे विभागाने प्रवाशांच्या सुरक्षेविषयी उपाय योजले आहेत.रेल्वे मालमत्तांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या आरपीएफ यंत्रणेकडे प्रवाशांचीदेखील सुरक्षितता सोपविण्यात आली आहे. अन्य सहकार्यासाठी राज्याचे लोहमार्ग पोलीस असतील. बडनेरा, अमरावती स्थानकावरील रेल्वे सुरक्षा दलाला वरिष्ठांकडून पत्र प्राप्त झाले आहे. त्यानुसार लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्यांमध्ये बंदूकधारी जवान प्रवाशांची सुरक्षा करतील. बडनेरा ते अकोला आणि पुढे अकोला ते भुसावळ अशा दोन टप्प्यांत सशस्त्र जवान धावत्या गाड्यांमध्ये राहतील. तीन ते चार आरपीएफ जवानांचे एक पथक यामध्ये नेमले जाईल. अलीकडे रेल्वेत अल्पवयीन मुलांकडून मोबाइलसह साहित्य लंपास करण्यात आल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. आरपीएफ पथकाला हे मोठे आव्हान आहे. यापूर्वीदेखील आरपीएफकडे प्रवाशांच्या सुरक्षिततेची धुरा होती. आता यात वाढ केली जाणार आहे.अवैध खाद्यपदार्थ विक्रीला बसणार लगामरेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध खाद्यपदार्थ विक्री होते. मात्र, धावत्या रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या बंदूकधारी आरपीएफ पथकामुळे यात बराच फरक पडणार आहे. आरक्षित डब्यात हे पथक सुरक्षा देईल. कोणी प्रवासी विनाआरक्षण आढळल्यास त्याला रोखण्याचे अधिकार बहाल केले आहेत. अवैध खाद्यपदार्थ विक्रेत्यांसह तृतीयपंथीयांचा हैदोसदेखील आता थांबण्याचे संकेत आहेत.रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी यापूर्वीसुद्धा आरपीएफ होते. आता यात अधिक वाढ होणार आहे. प्रवाशांसह रेल्वे मालमत्तांचे संरक्षण करण्यासाठी विशेष पथक गठित केले जाणार आहे.- राजेश बढे,निरीक्षक, रेल्वे सुरक्षा दल, बडनेरा.

टॅग्स :railwayरेल्वे