शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे गाड्यांमध्ये चोऱ्या रोखण्यासाठी आरपीएफचे विशेष पथक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 00:55 IST

रेल्वे गाड्यांमध्ये सातत्याने होणाऱ्या चोऱ्या रोखण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने विशेष पथक गठित केले आहे. या पथकातील बंदूकधारी शिपाई दोन रेल्वे विभागांच्या सीमेदरम्यान प्रवाशांची सुरक्षा करतील. विशेषत: लांब पल्ल्यांच्या गाड्यांना सुरक्षा प्रदान केली जाणार आहे.

ठळक मुद्देबंदूकधारी शिपायांची गस्त : लांब पल्ल्याच्या गाड्यांवर लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रेल्वे गाड्यांमध्ये सातत्याने होणाऱ्या चोऱ्या रोखण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने विशेष पथक गठित केले आहे. या पथकातील बंदूकधारी शिपाई दोन रेल्वे विभागांच्या सीमेदरम्यान प्रवाशांची सुरक्षा करतील. विशेषत: लांब पल्ल्यांच्या गाड्यांना सुरक्षा प्रदान केली जाणार आहे. त्याअनुषंगाने रेल्वे सुरक्षा दलाच्या अधीक्षकांचे पत्र बडनेरा रेल्वे स्थानकात धडकले आहे.गत लोकसभा अधिवेशनात रेल्वे गाड्यांमध्ये चोऱ्या आणि प्रवाशांची असुरक्षितता या विषयांवर भावना गवळी, आनंदराव अडसूळ व संजय धोत्रे आदी खासदारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. धावत्या गाड्यांमध्ये दरोडे, चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचा मुद्दा मांडताना, प्रवासी असुरक्षित असल्याची खंतदेखील त्यांनी व्यक्त केली होती. लोकसभेत झालेल्या चर्चेच्या परिणामी रेल्वे विभागाने प्रवाशांच्या सुरक्षेविषयी उपाय योजले आहेत.रेल्वे मालमत्तांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या आरपीएफ यंत्रणेकडे प्रवाशांचीदेखील सुरक्षितता सोपविण्यात आली आहे. अन्य सहकार्यासाठी राज्याचे लोहमार्ग पोलीस असतील. बडनेरा, अमरावती स्थानकावरील रेल्वे सुरक्षा दलाला वरिष्ठांकडून पत्र प्राप्त झाले आहे. त्यानुसार लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्यांमध्ये बंदूकधारी जवान प्रवाशांची सुरक्षा करतील. बडनेरा ते अकोला आणि पुढे अकोला ते भुसावळ अशा दोन टप्प्यांत सशस्त्र जवान धावत्या गाड्यांमध्ये राहतील. तीन ते चार आरपीएफ जवानांचे एक पथक यामध्ये नेमले जाईल. अलीकडे रेल्वेत अल्पवयीन मुलांकडून मोबाइलसह साहित्य लंपास करण्यात आल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. आरपीएफ पथकाला हे मोठे आव्हान आहे. यापूर्वीदेखील आरपीएफकडे प्रवाशांच्या सुरक्षिततेची धुरा होती. आता यात वाढ केली जाणार आहे.अवैध खाद्यपदार्थ विक्रीला बसणार लगामरेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध खाद्यपदार्थ विक्री होते. मात्र, धावत्या रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या बंदूकधारी आरपीएफ पथकामुळे यात बराच फरक पडणार आहे. आरक्षित डब्यात हे पथक सुरक्षा देईल. कोणी प्रवासी विनाआरक्षण आढळल्यास त्याला रोखण्याचे अधिकार बहाल केले आहेत. अवैध खाद्यपदार्थ विक्रेत्यांसह तृतीयपंथीयांचा हैदोसदेखील आता थांबण्याचे संकेत आहेत.रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी यापूर्वीसुद्धा आरपीएफ होते. आता यात अधिक वाढ होणार आहे. प्रवाशांसह रेल्वे मालमत्तांचे संरक्षण करण्यासाठी विशेष पथक गठित केले जाणार आहे.- राजेश बढे,निरीक्षक, रेल्वे सुरक्षा दल, बडनेरा.

टॅग्स :railwayरेल्वे