शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

व्याघ्र प्रकल्पातील राष्ट्रीय महामार्ग बदलणार; वाघांच्या संरक्षणासाठी केंद्राचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2018 16:49 IST

वन्यप्राण्यांच्या अपघाती मृत्यूंमुळे शासन चिंतेत

अमरावती : राज्यात व्याघ्र प्रकल्पातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गामुळे वाघांसह इतर वन्यप्राण्यांच्या अपघाती मृत्यूंमध्ये वाढ झाल्यानं शासन चिंतेत आहे. वन्यप्राण्यांचे अपघात रोखण्यासाठी व्याघ्र प्रकल्पातील मार्ग बदलण्याचा प्रस्ताव असून, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन समितीनं (एनटीसीए) सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत. विशेषत: महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांकडे लक्ष केंद्रीय करण्यात आलं आहे.एनटीसीएनं देशभरातील व्याघ्र प्रकल्प क्षेत्रसंचालकांकडे जंगलातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांची माहिती मागितली आहे. या मार्गामुळे आतापर्यंत अपघात झालेल्या वन्यप्राण्यांची आकडेवारी नमूद करण्याचे निर्देश क्षेत्रसंचालकांना देण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यातील पेंच, ताडोबा, मेळघाट, बोर अभयारण्य, सह्याद्री, टिपेश्वर आदी व्याघ्र प्रकल्पातील क्षेत्रसंचालकांनी त्याअनुषंगाने सर्वेक्षण सुरू केले आहे. यापूर्वी एनटीसीएच्या सर्वेक्षणानुसार २०१२ ते २०१७ या कालावधीत रस्ते आणि रेल्वे अपघातात तीन ते चार लाख वन्यप्राण्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. वन्यप्राण्यांचे अपघात रोखण्यासाठी व्याघ्र प्रकल्पांचं संवर्धन, संरक्षण करण्यासंदर्भात कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. व्याघ्र प्रकल्पातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग येणाऱ्या काळात बाहेर इतरत्र ठिकाणाहून नेले जातील, याचे हे संकेत मानले जात आहेत. जंगलातून राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग जात असल्यानं वाघांच्या शिकारीसाठी ते धोकादायक असल्याच्या निष्कर्षाप्रत एनटीसीए पोहोचली आहे. परिणामी राज्यातील व्याघ्र प्रकल्पांचा यासंबंधी सर्वेक्षण अहवाल केंद्रीय पर्यावरण, वन मंत्रालयात सादर केला जाणार आहे.

बफर झोनमधील रस्ते धोकादायकताडोबा व्याघ्र प्रकल्पांतर्गत बफर झोन असलेल्या मध्य चांदा विभाग, चंद्रपूर वनविकास महामंडळातून जाणारा रस्ता, तर मूल- चंद्रपूर, बल्लारशा-चंद्रपूर ही रेल्वे लाइन वन्यप्राण्यांसाठी अतिशय धोकादायक असल्याचं मत वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केलं आहे. मेळघाटातून मध्यप्रदेशकडे, नवेगाव बांधमधून रायपूरमार्गे छत्तीसगड, सह्याद्री अभयारण्यातून कोल्हापूर, गोव्याकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग वन्यजीवांसाठी घातक ठरणारा आहे.

व्याघ्र प्रकल्पांबाहेरील पर्यायी मार्ग सुचवावे लागणारव्याघ्र प्रकल्प अथवा जंगलातून जाणारे मार्ग, रस्ते बदलण्याचा प्रस्ताव पाठवताना व्याघ्र प्रकल्पांच्या क्षेत्रसंचालकांना पर्यायी मार्ग सुचवावे लागणार आहेत.. वाघ, बिबट्या आदी वन्यप्राण्यांच्या अपघाती मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन भविष्यात हे मार्ग जंगलातून जाणार नाहीत, याची दक्षता घ्यावी लागणार आहे.

टॅग्स :TigerवाघAmravatiअमरावती