शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

व्याघ्र प्रकल्पातील राष्ट्रीय महामार्ग बदलणार; वाघांच्या संरक्षणासाठी केंद्राचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2018 16:49 IST

वन्यप्राण्यांच्या अपघाती मृत्यूंमुळे शासन चिंतेत

अमरावती : राज्यात व्याघ्र प्रकल्पातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गामुळे वाघांसह इतर वन्यप्राण्यांच्या अपघाती मृत्यूंमध्ये वाढ झाल्यानं शासन चिंतेत आहे. वन्यप्राण्यांचे अपघात रोखण्यासाठी व्याघ्र प्रकल्पातील मार्ग बदलण्याचा प्रस्ताव असून, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन समितीनं (एनटीसीए) सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत. विशेषत: महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांकडे लक्ष केंद्रीय करण्यात आलं आहे.एनटीसीएनं देशभरातील व्याघ्र प्रकल्प क्षेत्रसंचालकांकडे जंगलातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांची माहिती मागितली आहे. या मार्गामुळे आतापर्यंत अपघात झालेल्या वन्यप्राण्यांची आकडेवारी नमूद करण्याचे निर्देश क्षेत्रसंचालकांना देण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यातील पेंच, ताडोबा, मेळघाट, बोर अभयारण्य, सह्याद्री, टिपेश्वर आदी व्याघ्र प्रकल्पातील क्षेत्रसंचालकांनी त्याअनुषंगाने सर्वेक्षण सुरू केले आहे. यापूर्वी एनटीसीएच्या सर्वेक्षणानुसार २०१२ ते २०१७ या कालावधीत रस्ते आणि रेल्वे अपघातात तीन ते चार लाख वन्यप्राण्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. वन्यप्राण्यांचे अपघात रोखण्यासाठी व्याघ्र प्रकल्पांचं संवर्धन, संरक्षण करण्यासंदर्भात कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. व्याघ्र प्रकल्पातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग येणाऱ्या काळात बाहेर इतरत्र ठिकाणाहून नेले जातील, याचे हे संकेत मानले जात आहेत. जंगलातून राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग जात असल्यानं वाघांच्या शिकारीसाठी ते धोकादायक असल्याच्या निष्कर्षाप्रत एनटीसीए पोहोचली आहे. परिणामी राज्यातील व्याघ्र प्रकल्पांचा यासंबंधी सर्वेक्षण अहवाल केंद्रीय पर्यावरण, वन मंत्रालयात सादर केला जाणार आहे.

बफर झोनमधील रस्ते धोकादायकताडोबा व्याघ्र प्रकल्पांतर्गत बफर झोन असलेल्या मध्य चांदा विभाग, चंद्रपूर वनविकास महामंडळातून जाणारा रस्ता, तर मूल- चंद्रपूर, बल्लारशा-चंद्रपूर ही रेल्वे लाइन वन्यप्राण्यांसाठी अतिशय धोकादायक असल्याचं मत वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केलं आहे. मेळघाटातून मध्यप्रदेशकडे, नवेगाव बांधमधून रायपूरमार्गे छत्तीसगड, सह्याद्री अभयारण्यातून कोल्हापूर, गोव्याकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग वन्यजीवांसाठी घातक ठरणारा आहे.

व्याघ्र प्रकल्पांबाहेरील पर्यायी मार्ग सुचवावे लागणारव्याघ्र प्रकल्प अथवा जंगलातून जाणारे मार्ग, रस्ते बदलण्याचा प्रस्ताव पाठवताना व्याघ्र प्रकल्पांच्या क्षेत्रसंचालकांना पर्यायी मार्ग सुचवावे लागणार आहेत.. वाघ, बिबट्या आदी वन्यप्राण्यांच्या अपघाती मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन भविष्यात हे मार्ग जंगलातून जाणार नाहीत, याची दक्षता घ्यावी लागणार आहे.

टॅग्स :TigerवाघAmravatiअमरावती