शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

...म्हणून नऊ एकरातील सोयाबीन पिकावर फिरवला ट्रॅक्टर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 19:49 IST

जुलै महिना संपत असतानासुद्धा दमदार पावसाने हजेरी न लावल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पिके सुकू लागली आहेत.

पापळ (अमरावती) - जुलै महिना संपत असतानासुद्धा दमदार पावसाने हजेरी न लावल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पिके सुकू लागली आहेत. परिणामी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पिंप्री निपाणी येथील शेतकरी हमीदखाँ पठाण यांनी गुरुवारी स्वत:च्या नऊ एकर क्षेत्रावरील सोयाबीन पिकावर ट्रॅक्टर चालवून अख्खे शेत नांगरून काढले.

पापळ मंडळ अंतर्गत येणाऱ्या पिंप्री परिसरात २० ते २५ दिवसांपासून पाऊस नसल्याने सोयाबीनचे पीक वाळले. आता पाऊस येऊनसुद्धा सोयाबीन पिकाच्या वाढीसाठी फायदा होणार नाही. त्यामुळे हमीदखाँ यांनी शेत नांगरून टाकले. नऊ एकरांतील सोयाबीन पेरणीस त्यांना ६३ हजार रुपये खर्च आला होता. पिंप्री निपाणी परिसरातील ८० टक्के पीक करपले. या भागाची पाहणी करून संपूर्ण कर्जमाफी व पीकविमा कंपनीला तात्काळ सर्वेक्षणासाठी आदेश द्यावेत, अशी मागणी सरपंच विशाल रिठे, हमीदखाँ पठाण, शाहरूख पठाण, शुभम अतकरी, उमेश रिठे, विलास रिठे, गणेश रिठे, समीर पठाण, कुमार थोरात, सलीम पठाण, विलास वाघमारे, सचिन रिठे, गणेश रिठे या शेतकऱ्यांनी केली आहे. तातडीने सर्वेक्षण न केल्यास उपोषणास बसण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAmravatiअमरावती