शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
3
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन
4
चढायला गेले एस्केलेटर बंद पडला, बोलायला गेले टेलीप्रॉम्प्टर बिघडला; UNमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काय काय घडलं?
5
संतापजनक अन् ह्रदयद्रावक! आधी दगड कोंबला, फेविक्विकने चिटकवले तोंड; १५ दिवसांचं बाळ फेकले जंगलात
6
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
7
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
8
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
9
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
10
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
11
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
12
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
13
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
14
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
15
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
16
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव
17
‘लजावल इश्क’वरून पाकिस्तानात गदारोळ; यूझर्सनी हा शो ‘बायकॉट’ करण्याचं केलं आवाहन
18
दिल्लीत नवा आदेश! ‘दरवाजे उघडा, डोळे बंद ठेवा’; नोकरशाहीच्या वर्तुळाला थंडीत घाम फुटण्याची वेळ
19
व्हिसाचे संकट, संधीचा व्हिसा! भारत जगात नवे स्थान निर्माण करू शकतो, जर...
20
भारतीय विद्यार्थ्यांच्या अमेरिकन ड्रीमची नौका बुडणार की काय?

रूंदसरी, वरंबा पद्धतीची पेरणी लाभदायक

By admin | Updated: July 3, 2014 23:18 IST

कोरडवाहू क्षेत्रासाठी पाऊस हा एकमेव स्त्रोत आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यासोबत येणाऱ्या पावसाचे प्रमाणदेखील अनिश्चित आहे. ठोकळ मानाने चार महिने पाऊस पडतो. यातील एक महिना कोरडा गेला.

पावसाअभावी उपाययोजना : कोरडवाहू क्षेत्रात पावसाचे पाणी जमिनीत जिरविण्याची गरजगजानन मोहोड - अमरावतीकोरडवाहू क्षेत्रासाठी पाऊस हा एकमेव स्त्रोत आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यासोबत येणाऱ्या पावसाचे प्रमाणदेखील अनिश्चित आहे. ठोकळ मानाने चार महिने पाऊस पडतो. यातील एक महिना कोरडा गेला. त्यामुळे उर्वरित पाऊस कोरडवाहू पिकांसाठी पुरेसा आहे का? यामुळे उत्पन्नात घट होईल काय? असे प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहेत. त्यामुळे पावसाची साठवणूक करण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहे. यासाठी शेतकऱ्यांनी रूंदसरी, वरंबा पद्धत वापरणे महत्त्वाचे ठरते. जिल्ह्यात प्रामुख्याने कपाशी, तूर, मूग, उडीद पिके घेतली जातात. जिल्ह्यातील १५ टक्के क्षेत्र सिंचनाखाली व ८५ टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे.कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्रातर्फे प्रात्याक्षिकहवामानातील बदल, तापमानातील वाढ, अनिश्चित स्वरूपाचा पाऊस, अतिवृष्टी याचा पिकावर विपरीत परिणाम होतो. यावर्षी तर एक महिन्यापासून पाऊसाने दडी मारल्याने खरीपाची पेरणी रखडलीे. त्या स्थितीत ‘मूलस्थानी जलव्यवस्थाना’द्वारा शेतकऱ्यांनी पेरणी करावी, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.जिल्ह्यात शेतकरी मुख्यत्वे करून उपलब्ध असलेल्या यंत्र सामुग्रीचा वापर करून पारंपारिक पध्दतीने शेत करतात. यामध्ये बियाण्यांचे असमान वाटप, जास्तीचे बियाणे, दोन रोपामधील असमान अंतर, कुशल मजुरांची कमतरता, दिवसेंदिवस वाढणारी मजूरी, पेरणीसाठी लागणारा वेळ यासारख्या अनेक समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते. यासाठी डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला यांनी ट्रॅक्टरचलित रूंदसरी व वरंबा टोकनयंत्र विकसीत करून महाराष्ट्र कृषी औद्योगीक विकास महामंडळाद्वारे समोर आणले आहे. सध्याची जिल्ह्यची स्थिती पाहता कृषी विभाग व कृषी विज्ञान घातखेड यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रशिक्षण व प्रात्यक्षिक दाखविण्यात येत आहे. या यंत्राचा उपयोग सोयाबिन, तूर, कपाशी, मूग, उडीद, ज्वारी, हरभरा, गहू यासह अन्य पिकांच्या टोकन पध्दतीने पेरणीसाठी करण्यात येतो.बियाण्याची बचत, उत्पन्नात वाढपारंपारीक पध्दतीने पेरणी केल्यास सोयाबिनचे एकरी ३० किलो बियाणे लागते. परंतु सरी, वरंबा पध्दतीने २२ ते २४ किलो बियाणे लागते. शेतकऱ्यांजवळ हे यंत्र उपलब्ध असेलच असे नाही. त्यांना जवळच्या कृषी विज्ञान केंद्रातून ‘ना नफा ना तोटा’तत्वावर हे यंत्र भाडे तत्वावर मिळते. तरीही शक्य नसल्यास तिफन किंवा पेरणी यंत्राणे पेरणी करून सुध्दा बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर करू शकतात. शेतकऱ्यांनी तीन ते चार तासानंतर पेरणी न केलेले एक तास सोडून द्यावे. त्यानंतर साध्या नांगराने किंवा डवऱ्याने दोरी बांधून रूंद वरंबा सरी तयार करणे महत्वाचे आहे.कोरडवाहूसाठी बीबीएफ वरदायीआंतरराष्ट्रीय पीक संशोधन संस्था हैद्राबाद (इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च इंस्टीट्यूट) ही संस्था जगातील अविकसीत देशामध्ये काम करते. या संस्थेद्वारे प्रथम बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला व हे तंत्रज्ञान लोकप्रिय झाले. पावसाची अनिश्चितता असल्याने पीक जगविणे व उत्पादकता वाढविणे हा या तंत्रज्ञानाचा मुख्य उद्देश आहे. आदर्शग्राम राळेगाव सिध्दी येथे अन्ना हजारे व हिवरे बाजार येथे पोपटराव पवार यांनी याच तंत्रज्ञानाचा वापर करून समृध्दी निर्माण केली आहे. (प्रतिनिधी)