शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

टाळेबंदीतही रस्ते फुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 05:01 IST

जिल्ह्यात आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६१ झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने अमरावती जिल्हा ‘रेड झोन’ म्हणून घोषित केला. त्याकारणाने १७ मे पर्यंत दोन आठवडे लॉकडाऊन कायम राहणार असल्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले. परंतु या आदेशाची पायमल्ली होत आल्याचे सोमवारी अमरावतीकरांच्या वागणुकीतून बघावयास मिळाले.

ठळक मुद्देगर्दीच गर्दी : कसा रोखणार कोरोना? जिल्हा प्रशासन निष्प्रभ

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात ‘कोरोना’ विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने १७ मे पर्यंत टाळेबंदी व संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे. टाळेबंदी कायम असतानाही सोमवारी सकाळी ८ वाजतानंतर हजारो नागरिक घराबाहेर पडून रस्त्यावर आले. शहरातील मुख्य चौकात नागरिकांची प्रचंड गर्दी बघावयास मिळाली. नागरिकांनी संचारबंदीच्या नियमांचीसुद्धा ऐशीतैशी केली, तर ‘फिजिकल डिस्टंसिंग’चाही फज्जा उडाला. शहरातील पोलिसांनी मात्र, बघ्याची भूमिका घेतली.जिल्ह्यात आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६१ झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने अमरावती जिल्हा ‘रेड झोन’ म्हणून घोषित केला. त्याकारणाने १७ मे पर्यंत दोन आठवडे लॉकडाऊन कायम राहणार असल्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले. परंतु या आदेशाची पायमल्ली होत आल्याचे सोमवारी अमरावतीकरांच्या वागणुकीतून बघावयास मिळाले. जणू काही शिथिलताच मिळाल्यागत नागरिक सकाळी घराबाहेर पडले. येथील राजकमल चौक, राजापेठ, जयस्तंभ चौक, पंचवटी चौक, गाडगेनगर, कठोरा नाका चौकासह इतर महत्वाच्या चौकात नागरिकांनी गर्दी केली. तसेच दुचाकीवर विनाकारण शहरात फिरण्यास बंदी असताना एकाच दुचाकीवर दोघे-तिघे बसून मुक्त संचार करताना निदर्शनास आले. शेकडो नागरिक चारचाकी वाहनाने शहरात फिरताना दिसून आले. एकीकडे कोरोना विषाणूचा संसर्ग शहरात झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे नागरिक आपली व कुटुंबीयांची पर्वा न करता बिनधास्त शहरात फिरताना आढळले. जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत बाहेर पडता येते. परंतु विनाकारण हजारो नागरिक घराबाहेर पडल्याने प्रशासनाचे नियंत्रण कुठेय, असा सवाल उपस्थित होत आहे.कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्याकरिता एकीकडे शासन-प्रशासनातर्फे कठोर उपाययोजना राबविण्यात येत आहे. मात्र, नागरिक घराबाहेर पडून आपला जीव धोक्यात घालत आहे. सोमवारी दृष्टीस पडलेल्या गर्दीमुळे हे स्पष्ट दिसून आले आहे. पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त यांनी पुढाकार घेऊन याची खबरदारी घेणे गरजेचे झाले आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात मजुरांची परवानगी मिळविण्याकरिता गर्दीमध्यप्रदेश, बिहार व इतर राज्यांतील जे मजूर अमरावतीत कामानिमित्त आले होते व लॉकडाऊनमुळे अमरावतीत अडकले, त्या मजुरांना मूळ गावी परत जाता यावे, याकरिता प्रशासनाने परवानगी द्यावी, या मागणीकरिता सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज करण्यास शेकडो मजूर गोळा झाले. रांगेत उभे राहून त्यांनी अर्ज दिला. यावेळी ‘फि जिकल डिस्टंसिंग’ ठेवला नव्हता. त्यामुळे कोरोना विषाणूचा धोका वाढला आहे.वैद्यकीय प्रमाणपत्र मिळण्याकरिता गर्दीअमरावतीत अडकलेल्या मजुरांना मूळ गावी जाता यावे, याकरिता त्यांना वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र जिल्हा प्रशासनाने अनिवार्य केले आहे. त्यामुळे शेकडो मजुरांनी सदर प्रमाणपत्र मिळविण्याकरिता येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात सोमवारी सकाळपासूनच गर्दी होती. तेथेसुद्धा फि जिकल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला. शहरात रोज कोरोना पॉझिटिव्हची संख्या वाढत असताना मजूर व नागरिक ठिकाणी गर्दी करीत आहेत.