शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
2
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
3
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
4
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
5
Stock Market Today: शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर शेअर बाजार सुस्साट.., बाजारमूल्य १० लाख कोटी रुपयांहून अधिक वाढलं
6
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
7
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
8
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
9
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
10
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
11
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
12
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
13
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
14
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
15
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
16
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
17
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
18
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
19
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
20
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा

रस्त्याची चाळण; किती लावणार ठिगळं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 05:00 IST

संततधार पावसामुळे परतवाडा-अमरावती हा आंतरराज्य महामार्ग पूर्णत: खड्डेमय झाला आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत सर्व खड्डे भरण्याची डेडलाइन असताना, चाळण झालेल्या रस्त्याला ठिगळं लावायची तरी किती, असा प्रश्न व्यक्त होत आहे. त्यातच संथगतीने सुरू असलेले खड्डे भरण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाविरुद्ध संताप व्यक्त करणारे ठरले आहे.

ठळक मुद्देअमरावती मार्गावर जीवघेणा प्रवास : सार्वजनिक बांधकाम विभाग ‘दिन में ढाई कोस’

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : संततधार पावसामुळे परतवाडा-अमरावती हा आंतरराज्य महामार्ग पूर्णत: खड्डेमय झाला आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत सर्व खड्डे भरण्याची डेडलाइन असताना, चाळण झालेल्या रस्त्याला ठिगळं लावायची तरी किती, असा प्रश्न व्यक्त होत आहे. त्यातच संथगतीने सुरू असलेले खड्डे भरण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाविरुद्ध संताप व्यक्त करणारे ठरले आहे.मुसळधार पावसात परतवाडा-अमरावती या मार्गावर दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. खड्डे वाचविण्याच्या प्रयत्नात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कालपर्यंत परतीच्या पावसामुळे माती आणि मुरूम टाकून बुजवलेले खड्डे दोन दिवसांपासून गिट्टी आणि डांबराने बुजविण्याचे कार्य सुरू आहे. विशेष म्हणजे, हा विषय ‘लोकमत’ने वारंवार लावून धरला आहे.काम संथगतीनेपरतवाडा ते आसेगावपर्यंतचा मार्ग अचलपूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतो. या मार्गावर खड्डे बुजवण्याचे कार्य संथगतीने सुरू आहे. जिल्ह्यात सर्वाधिक वर्दळीचा महामार्ग म्हणून ओळख असलेल्या परतवाडा-अमरावती या आंतरराज्य मार्गाची पूर्णत: चाळण झाली आहे.

कामात गती हवीसंपूर्ण रस्त्यावरच खड्डे पडल्याने किती ठिकाणी सार्वजनिक बांधकाम ठिगळ लावणार, हा रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना पडलेला गंभीर प्रश्न आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने ही कामे तीव्र गतीने करण्याची मागणी आता होत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा