शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

पावसाने रस्त्यांची पोलखोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 23:12 IST

शहरात चार दिवसांपासून पावसाची रिपरीप सुरू आसल्याने रस्ते अन् चौकाचौकांची दैना झाली आहे. काँक्रीटचे रस्ते तयार करताना प्रमुख चौकांत काँक्रीटीकरण न झाल्यामुळे या खोलगट भागात पाणी साचले. परिणामी वाहनचालकांची त्रेधा उडाली. काही ठिकाणी रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पहिल्याच पावसाने महापालिकेची पोलखोल केली आहे.

ठळक मुद्देमहापालिका अन् ‘बी अ‍ॅन्ड सी’चा घोळ : चौकाचौकात तुंबले पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरात चार दिवसांपासून पावसाची रिपरीप सुरू आसल्याने रस्ते अन् चौकाचौकांची दैना झाली आहे. काँक्रीटचे रस्ते तयार करताना प्रमुख चौकांत काँक्रीटीकरण न झाल्यामुळे या खोलगट भागात पाणी साचले. परिणामी वाहनचालकांची त्रेधा उडाली. काही ठिकाणी रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पहिल्याच पावसाने महापालिकेची पोलखोल केली आहे.शहरात २४ तासांत २२ मिमी पावसाची नोंद झाली, तर चार दिवसांपासून झड आहे. यात मधेमधे जोराचा पाऊस होत असल्याने शहरातील अनेक खोलगट भागात पाणी साचले आहे. यामध्ये नाल्यांची सफाई झाल्याने पाणी तुंबले नसले तरी यावेळी रस्त्यांचे नवीन संकट ओढावले आहे. रस्त्यांची कामे करताना चौकाचौकांतील काँक्रीटीकरण सोडण्यात आले. त्यामुळे या खोलगट भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने वाहन चालविताना खड्ड्याचा व पाण्याचा अंदाज येत नसल्यामुळे अनेक वाहनचालकांचा तोल गेल्याने वाहनासह पडल्याचे अपघाताच्या घटना घडल्या.अनेक रस्त्यांचे डांबरीकरण उखडल्याने रस्त्यांची चाळण झाली व या खड्ड्यांमध्ये पाणी भरल्याने अंदाज येत नसल्यानेही वाहनचालकांना अपघात होत आहेत.पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची कामे करणे अनिवार्य असताना शहरात सर्वच नियमांना हरताळ फासला गेला आहे. महापालिका की सार्वजनिक बांधकाम विभाग, यामध्ये रस्त्यांची विभागणी झाल्यामुळे दोन्ही विभागांद्वारे रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने भर पावसाळ्यात अमरावतीकरांना त्रास सहन करावा लागत आहे. हे सत्र केव्हा थांबेल, याची नागरिकांना प्रतीक्षा आहे.पावसाळ्यापूर्वीची देखभाल-दुरुस्ती कागदावरचदरवर्षी महापालिकेच्यावतीने पावसाळ्यापूर्वी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची देखभाल-दुरुस्तीची कामे हाती घेतली जातात. मात्र, यंदा पावसाळा दीड महिना उशिराने सुरू झाला असतानाही रस्त्याच्या देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यात आली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शुक्रवारपासून सुरू झालेल्या पावसाने रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये ठिकठिकाणी पाणी साचले आहे. हे खड्डे वाहनचालकांसह पादचाऱ्यांसाठी जीवघेणे ठरणारे आहे. महापालिकेच्या बांधकाम विभागाकडे खड्ड्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी असताना ती का करण्यात आली नाही, हा संशोधनाचा विषय आहे.