शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

पावसाने रस्त्यांची पोलखोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 23:12 IST

शहरात चार दिवसांपासून पावसाची रिपरीप सुरू आसल्याने रस्ते अन् चौकाचौकांची दैना झाली आहे. काँक्रीटचे रस्ते तयार करताना प्रमुख चौकांत काँक्रीटीकरण न झाल्यामुळे या खोलगट भागात पाणी साचले. परिणामी वाहनचालकांची त्रेधा उडाली. काही ठिकाणी रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पहिल्याच पावसाने महापालिकेची पोलखोल केली आहे.

ठळक मुद्देमहापालिका अन् ‘बी अ‍ॅन्ड सी’चा घोळ : चौकाचौकात तुंबले पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरात चार दिवसांपासून पावसाची रिपरीप सुरू आसल्याने रस्ते अन् चौकाचौकांची दैना झाली आहे. काँक्रीटचे रस्ते तयार करताना प्रमुख चौकांत काँक्रीटीकरण न झाल्यामुळे या खोलगट भागात पाणी साचले. परिणामी वाहनचालकांची त्रेधा उडाली. काही ठिकाणी रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पहिल्याच पावसाने महापालिकेची पोलखोल केली आहे.शहरात २४ तासांत २२ मिमी पावसाची नोंद झाली, तर चार दिवसांपासून झड आहे. यात मधेमधे जोराचा पाऊस होत असल्याने शहरातील अनेक खोलगट भागात पाणी साचले आहे. यामध्ये नाल्यांची सफाई झाल्याने पाणी तुंबले नसले तरी यावेळी रस्त्यांचे नवीन संकट ओढावले आहे. रस्त्यांची कामे करताना चौकाचौकांतील काँक्रीटीकरण सोडण्यात आले. त्यामुळे या खोलगट भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने वाहन चालविताना खड्ड्याचा व पाण्याचा अंदाज येत नसल्यामुळे अनेक वाहनचालकांचा तोल गेल्याने वाहनासह पडल्याचे अपघाताच्या घटना घडल्या.अनेक रस्त्यांचे डांबरीकरण उखडल्याने रस्त्यांची चाळण झाली व या खड्ड्यांमध्ये पाणी भरल्याने अंदाज येत नसल्यानेही वाहनचालकांना अपघात होत आहेत.पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची कामे करणे अनिवार्य असताना शहरात सर्वच नियमांना हरताळ फासला गेला आहे. महापालिका की सार्वजनिक बांधकाम विभाग, यामध्ये रस्त्यांची विभागणी झाल्यामुळे दोन्ही विभागांद्वारे रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने भर पावसाळ्यात अमरावतीकरांना त्रास सहन करावा लागत आहे. हे सत्र केव्हा थांबेल, याची नागरिकांना प्रतीक्षा आहे.पावसाळ्यापूर्वीची देखभाल-दुरुस्ती कागदावरचदरवर्षी महापालिकेच्यावतीने पावसाळ्यापूर्वी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची देखभाल-दुरुस्तीची कामे हाती घेतली जातात. मात्र, यंदा पावसाळा दीड महिना उशिराने सुरू झाला असतानाही रस्त्याच्या देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यात आली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शुक्रवारपासून सुरू झालेल्या पावसाने रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये ठिकठिकाणी पाणी साचले आहे. हे खड्डे वाहनचालकांसह पादचाऱ्यांसाठी जीवघेणे ठरणारे आहे. महापालिकेच्या बांधकाम विभागाकडे खड्ड्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी असताना ती का करण्यात आली नाही, हा संशोधनाचा विषय आहे.