शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
2
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
3
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
5
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
6
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
7
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
8
लग्नाचं निमंत्रण दिलं नाही, सहकाऱ्यांनी एचआरकडे केली तरुणीची तक्रार, त्यानंतर घडलं असं काही...
9
"कित्येकांनी बलिदान दिले, शिरांचे ढीग लागले, पण धर्म सोडला नाही"- मोहन भागवत
10
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
11
"डोकं फिरवू नका, मी मंत्री, तुम्ही मलाच न सांगता...", PWD अधिकाऱ्यावर संतापले दयाशंकर सिंह
12
जगाला आपल्या धाकात ठेऊ पाहणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती किती? उत्पन्नाचा खरा स्रोत कोणता?
13
एकावर एक बोनस शेअर देणार 'ही' कंपनी; सोबत डिविडंडही मिळणार; गुंतवणुकदारांना दुप्पट फायदा
14
आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस
15
८८२ कोटींचा खर्च, २०२८ मध्ये होणार पूर्ण; ८ ऑगस्टला सीतामातेच्या जानकी मंदिराचे भूमिपूजन
16
'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
17
वॉशिंग मशिन वापरताना ‘ही’ किरकोळ चूक जीवावर बेतली; तरुणाचा मृत्यू; करायला गेला एक आणि..
18
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
19
Wasim Jaffer: वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, आता विदर्भातील खेळाडूंना शिकवतील फलंदाजीचे धडे!
20
ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट

रस्ता की मत्स्यपालनाचे डबके?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:16 IST

पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष फोटो - हरकुट १६ पी चांदूर बाजार : शहरातील प्रमुख रस्त्यांपैकी एक असलेल्या बस स्थानक ते ...

पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

फोटो - हरकुट १६ पी

चांदूर बाजार : शहरातील प्रमुख रस्त्यांपैकी एक असलेल्या बस स्थानक ते बेलोरा चौक मार्गावर मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे हा रस्ता नागरिकांसाठी कर्दनकाळ बनला आहे. रस्त्यावर मोठ खड्डे तयार झाल्याचे पाहावयास मिळत असून ‘रस्ता की मत्स्यपालनाचे डबके?’ असाच प्रश्न नागरिकांना पडत आहे.

शहरातील मुख्य मार्गापैकी एक बस स्थानक ते बेलोरा चौक मार्ग आहे. या मार्गावरील रस्त्याचे काही वर्षांपूर्वी बांधकाम करण्यात आले. मात्र, काही दिवसांतच या रस्त्यावर मोठे खड्डे पडले. दरवर्षी पावसाळ्यात या मार्गावर वाहतूक करताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते. सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे या रस्त्यावरील खड्ड्यामुळे पावसाचे पाणी साचून राहते. या मार्गावरून जड वाहनांसह दैनंदिन कामाकरिता हजारो नागरिक ये-जा करतात. नागरिक दररोज या मार्गावरून दुचाकी, चारचाकी आणि जड वाहन तसेच सायकलने शहरातील बाजारपेठ, शाळा, महाविद्यालये, बँक, शासकीय कार्यालये, नगर परिषद, पंचायत समिती, रेल्वे स्थानक आदी ठिकाणी दररोज ये-जा करतात. हा रस्ता शहराला जोडणारा मुख्य रस्ता असल्यामुळे मध्यरात्रीपर्यंत या मार्गावरून वाहनांची वर्दळ राहते. शेकडो जड वाहनांची ये-जा सुरूच असते.

वर्षभरापासून या रस्त्यावरून ये-जा करण्यास नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे या रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यांमध्ये पाणी साचून राहिल्याने नगारिकांना येथून ये-जा करण्यास तारेवरची कसरत करावी लागत आहे. हा प्रकार दीड वर्षांपेक्षा अधिकचा काळापासून सुरू आहे. मात्र, आजपर्यंत या रस्त्याची साधी डागडुजीही करण्यात आली नाही. आजघडीला या रस्त्यावरील खड्ड्यामधील पाण्याची स्थिती पाहून ‘रस्ता की मत्स्यपालनाचे डबके?’ असाच प्रश्न नागरिकांना पडत आहे. त्यामुळे या रस्त्याची दुर्दशा केवळ नगर परिषद प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

-----------

काही दिवसांपूर्वीच टाकला होता मलबा

बस स्थानक ते बेलोरा चौक मार्गावर खड्ड्यात पावसाचे पाणी साचते. वाहतूक सुरू असताना खड्ड्यातील पाणी नागरिकांच्या अंगावर उडते. त्यामुळे नगारिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पालिका प्रशासनाने काही दिवसांपूर्वी या खड्ड्यांमध्ये मलबा टाकला होता. परंतु, आजघडीला परिस्थिती ''जैसे थे'' च आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.