शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

रस्ता की मत्स्यपालनाचे डबके?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:16 IST

पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष फोटो - हरकुट १६ पी चांदूर बाजार : शहरातील प्रमुख रस्त्यांपैकी एक असलेल्या बस स्थानक ते ...

पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

फोटो - हरकुट १६ पी

चांदूर बाजार : शहरातील प्रमुख रस्त्यांपैकी एक असलेल्या बस स्थानक ते बेलोरा चौक मार्गावर मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे हा रस्ता नागरिकांसाठी कर्दनकाळ बनला आहे. रस्त्यावर मोठ खड्डे तयार झाल्याचे पाहावयास मिळत असून ‘रस्ता की मत्स्यपालनाचे डबके?’ असाच प्रश्न नागरिकांना पडत आहे.

शहरातील मुख्य मार्गापैकी एक बस स्थानक ते बेलोरा चौक मार्ग आहे. या मार्गावरील रस्त्याचे काही वर्षांपूर्वी बांधकाम करण्यात आले. मात्र, काही दिवसांतच या रस्त्यावर मोठे खड्डे पडले. दरवर्षी पावसाळ्यात या मार्गावर वाहतूक करताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते. सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे या रस्त्यावरील खड्ड्यामुळे पावसाचे पाणी साचून राहते. या मार्गावरून जड वाहनांसह दैनंदिन कामाकरिता हजारो नागरिक ये-जा करतात. नागरिक दररोज या मार्गावरून दुचाकी, चारचाकी आणि जड वाहन तसेच सायकलने शहरातील बाजारपेठ, शाळा, महाविद्यालये, बँक, शासकीय कार्यालये, नगर परिषद, पंचायत समिती, रेल्वे स्थानक आदी ठिकाणी दररोज ये-जा करतात. हा रस्ता शहराला जोडणारा मुख्य रस्ता असल्यामुळे मध्यरात्रीपर्यंत या मार्गावरून वाहनांची वर्दळ राहते. शेकडो जड वाहनांची ये-जा सुरूच असते.

वर्षभरापासून या रस्त्यावरून ये-जा करण्यास नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे या रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यांमध्ये पाणी साचून राहिल्याने नगारिकांना येथून ये-जा करण्यास तारेवरची कसरत करावी लागत आहे. हा प्रकार दीड वर्षांपेक्षा अधिकचा काळापासून सुरू आहे. मात्र, आजपर्यंत या रस्त्याची साधी डागडुजीही करण्यात आली नाही. आजघडीला या रस्त्यावरील खड्ड्यामधील पाण्याची स्थिती पाहून ‘रस्ता की मत्स्यपालनाचे डबके?’ असाच प्रश्न नागरिकांना पडत आहे. त्यामुळे या रस्त्याची दुर्दशा केवळ नगर परिषद प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

-----------

काही दिवसांपूर्वीच टाकला होता मलबा

बस स्थानक ते बेलोरा चौक मार्गावर खड्ड्यात पावसाचे पाणी साचते. वाहतूक सुरू असताना खड्ड्यातील पाणी नागरिकांच्या अंगावर उडते. त्यामुळे नगारिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पालिका प्रशासनाने काही दिवसांपूर्वी या खड्ड्यांमध्ये मलबा टाकला होता. परंतु, आजघडीला परिस्थिती ''जैसे थे'' च आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.