शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

रस्ता की मत्स्यपालनाचे डबके?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:16 IST

पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष फोटो - हरकुट १६ पी चांदूर बाजार : शहरातील प्रमुख रस्त्यांपैकी एक असलेल्या बस स्थानक ते ...

पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

फोटो - हरकुट १६ पी

चांदूर बाजार : शहरातील प्रमुख रस्त्यांपैकी एक असलेल्या बस स्थानक ते बेलोरा चौक मार्गावर मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे हा रस्ता नागरिकांसाठी कर्दनकाळ बनला आहे. रस्त्यावर मोठ खड्डे तयार झाल्याचे पाहावयास मिळत असून ‘रस्ता की मत्स्यपालनाचे डबके?’ असाच प्रश्न नागरिकांना पडत आहे.

शहरातील मुख्य मार्गापैकी एक बस स्थानक ते बेलोरा चौक मार्ग आहे. या मार्गावरील रस्त्याचे काही वर्षांपूर्वी बांधकाम करण्यात आले. मात्र, काही दिवसांतच या रस्त्यावर मोठे खड्डे पडले. दरवर्षी पावसाळ्यात या मार्गावर वाहतूक करताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते. सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे या रस्त्यावरील खड्ड्यामुळे पावसाचे पाणी साचून राहते. या मार्गावरून जड वाहनांसह दैनंदिन कामाकरिता हजारो नागरिक ये-जा करतात. नागरिक दररोज या मार्गावरून दुचाकी, चारचाकी आणि जड वाहन तसेच सायकलने शहरातील बाजारपेठ, शाळा, महाविद्यालये, बँक, शासकीय कार्यालये, नगर परिषद, पंचायत समिती, रेल्वे स्थानक आदी ठिकाणी दररोज ये-जा करतात. हा रस्ता शहराला जोडणारा मुख्य रस्ता असल्यामुळे मध्यरात्रीपर्यंत या मार्गावरून वाहनांची वर्दळ राहते. शेकडो जड वाहनांची ये-जा सुरूच असते.

वर्षभरापासून या रस्त्यावरून ये-जा करण्यास नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे या रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यांमध्ये पाणी साचून राहिल्याने नगारिकांना येथून ये-जा करण्यास तारेवरची कसरत करावी लागत आहे. हा प्रकार दीड वर्षांपेक्षा अधिकचा काळापासून सुरू आहे. मात्र, आजपर्यंत या रस्त्याची साधी डागडुजीही करण्यात आली नाही. आजघडीला या रस्त्यावरील खड्ड्यामधील पाण्याची स्थिती पाहून ‘रस्ता की मत्स्यपालनाचे डबके?’ असाच प्रश्न नागरिकांना पडत आहे. त्यामुळे या रस्त्याची दुर्दशा केवळ नगर परिषद प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

-----------

काही दिवसांपूर्वीच टाकला होता मलबा

बस स्थानक ते बेलोरा चौक मार्गावर खड्ड्यात पावसाचे पाणी साचते. वाहतूक सुरू असताना खड्ड्यातील पाणी नागरिकांच्या अंगावर उडते. त्यामुळे नगारिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पालिका प्रशासनाने काही दिवसांपूर्वी या खड्ड्यांमध्ये मलबा टाकला होता. परंतु, आजघडीला परिस्थिती ''जैसे थे'' च आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.