शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
3
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
4
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
5
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
6
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
7
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
8
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
9
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
10
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
11
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
12
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव
13
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
14
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
15
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
16
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
17
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
18
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
19
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
20
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."

रस्ता की मत्स्यपालनाचे डबके?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:16 IST

पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष फोटो - हरकुट १६ पी चांदूर बाजार : शहरातील प्रमुख रस्त्यांपैकी एक असलेल्या बस स्थानक ते ...

पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

फोटो - हरकुट १६ पी

चांदूर बाजार : शहरातील प्रमुख रस्त्यांपैकी एक असलेल्या बस स्थानक ते बेलोरा चौक मार्गावर मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे हा रस्ता नागरिकांसाठी कर्दनकाळ बनला आहे. रस्त्यावर मोठ खड्डे तयार झाल्याचे पाहावयास मिळत असून ‘रस्ता की मत्स्यपालनाचे डबके?’ असाच प्रश्न नागरिकांना पडत आहे.

शहरातील मुख्य मार्गापैकी एक बस स्थानक ते बेलोरा चौक मार्ग आहे. या मार्गावरील रस्त्याचे काही वर्षांपूर्वी बांधकाम करण्यात आले. मात्र, काही दिवसांतच या रस्त्यावर मोठे खड्डे पडले. दरवर्षी पावसाळ्यात या मार्गावर वाहतूक करताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते. सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे या रस्त्यावरील खड्ड्यामुळे पावसाचे पाणी साचून राहते. या मार्गावरून जड वाहनांसह दैनंदिन कामाकरिता हजारो नागरिक ये-जा करतात. नागरिक दररोज या मार्गावरून दुचाकी, चारचाकी आणि जड वाहन तसेच सायकलने शहरातील बाजारपेठ, शाळा, महाविद्यालये, बँक, शासकीय कार्यालये, नगर परिषद, पंचायत समिती, रेल्वे स्थानक आदी ठिकाणी दररोज ये-जा करतात. हा रस्ता शहराला जोडणारा मुख्य रस्ता असल्यामुळे मध्यरात्रीपर्यंत या मार्गावरून वाहनांची वर्दळ राहते. शेकडो जड वाहनांची ये-जा सुरूच असते.

वर्षभरापासून या रस्त्यावरून ये-जा करण्यास नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे या रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यांमध्ये पाणी साचून राहिल्याने नगारिकांना येथून ये-जा करण्यास तारेवरची कसरत करावी लागत आहे. हा प्रकार दीड वर्षांपेक्षा अधिकचा काळापासून सुरू आहे. मात्र, आजपर्यंत या रस्त्याची साधी डागडुजीही करण्यात आली नाही. आजघडीला या रस्त्यावरील खड्ड्यामधील पाण्याची स्थिती पाहून ‘रस्ता की मत्स्यपालनाचे डबके?’ असाच प्रश्न नागरिकांना पडत आहे. त्यामुळे या रस्त्याची दुर्दशा केवळ नगर परिषद प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

-----------

काही दिवसांपूर्वीच टाकला होता मलबा

बस स्थानक ते बेलोरा चौक मार्गावर खड्ड्यात पावसाचे पाणी साचते. वाहतूक सुरू असताना खड्ड्यातील पाणी नागरिकांच्या अंगावर उडते. त्यामुळे नगारिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पालिका प्रशासनाने काही दिवसांपूर्वी या खड्ड्यांमध्ये मलबा टाकला होता. परंतु, आजघडीला परिस्थिती ''जैसे थे'' च आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.